शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

रामटेकच्या पुढे रेल्वे जाणार काय?

By admin | Updated: December 30, 2014 00:54 IST

कोळसा, मॅगनिज, डोलामाईट यासारख्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर - रामटेक रेल्वे सुरू केली. मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही ही रेल्वे लाईन पुढे गेली नाही.

दीपक गिरधर - रामटेककोळसा, मॅगनिज, डोलामाईट यासारख्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर - रामटेक रेल्वे सुरू केली. मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही ही रेल्वे लाईन पुढे गेली नाही. परिणामी रामटेकचा पर्यटनाच्या बाबतीत पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही. केवळ १५ किमी तारसापर्यंत रेल्वेरुळ जोडल्यास रामटेकला महत्त्व मिळू शकते. परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने विस्तारीकरण झाले नाही. रामटेक परिसर हा खनिज संपदेने आणि निसर्ग सौंदर्याने समृद्ध असा आहे. या तालुक्यातील मनसर आणि नगरधन भागात मॅगनिजच्या खाणी आहेत. कन्हान, गोंडेगाव या भागात विपूल प्रमाणात दगडी कोळसा आहे. देवलापारच्या जंगली भागात मोठ्या प्रमाणात डोलामाईट आणि बॉक्साईट आढळते. या खनिज संपदेवर डोळा ठेवून स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी नागपूर-रामटेक रेल्वे सुरू केली. रामटेकच्या निसर्ग सौंदर्यावर इंग्रज अधिकारी जाम खूश होते. त्यामुळेच सुटीचा काळ ते रामटेक आणि शेजारच्या जंगली भागात येऊन घालवायचे, असा इतिहास सापडतो. त्यासाठी ते रेल्वेचा वापर करायचे. त्याकाळी इंग्रजांसाठी रेल्वेची कदाचित तेवढीच उपयुक्तता असेल. अलीकडे रामटेक हे पर्यटनाच्या नकाशावर आलेले राज्यातील प्रमुख ठिकाण आहे. येथील निसर्ग सगळ्यांनाच भुरळ घालतो. धार्मिक, सांस्कृतिक, इको-टुरिझम अशा सर्वच प्रकारचे पर्यटन एकाच ठिकाणी मिळेल असे रामटेक हे देशातील एकमेव केंद्र आहे. देश - विदेशातील पर्यटक म्हणूनच रामटेककडे आकर्षित होतात. रामटेकजवळील मनसरच्या उत्खननाबाबत इंग्लंडमधील हंस बेकर या उत्खनन तज्ज्ञाने अहवाल सादर केला आहे. महाकवी कालिदासांनी रामगिरीवर ‘मेघदूत’ हे अजरामर काव्य लिहिले. त्यामुळे राज्यातील मुख्य अशी साहित्यभूमीसुद्धा आहे. इतकी वैशिष्ट्ये एकाच ठिकाणी असणारे रामटेक हे म्हणूनच विरळे आहे. पर्यटकांना रामटेकला येणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. रामटेक रेल्वेचे विस्तारीकरण झाल्यास मुंबईपासून कोलकात्यापर्यंतची वाहतूक रामटेकमार्गे वळविली जाऊ शकते. यासाठी रामटेकपासून केवळ १५ किमी अंतरावर असलेल्या तारसापर्यंत रेल्वे टॅ्रक टाकावा लागणार आहे. रामटेक आणि परिसराची ही गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. रामटेकच्या विस्तारीकरणाबाबत गोटेगावपर्यंत सर्व्हेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु सर्वेक्षण झालेच नाही. मुकुल वासनिक रामटेकचे खासदार असताना या विस्तारीकरणाच्या चर्चांना वेग आला होता. त्या चर्चाही आता शांत झाल्या. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी अद्याप तरी रामटेकसाठी काहीही केले नाही. विरोधाच्या लाटेवर स्वार होऊन ते लोकसभेत पोहोचले, म्हणून त्यांनी काहीच करू नये असे नाही. रामटेक रेल्वेच्या विस्तारीकरणाचा आवाज त्यांनी बुलंद करणे आवश्यक आहे. कर्मधर्म संयोगाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे महाराष्ट्राचेच असल्याने निश्चित या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. आर. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनीदेखील रामटेक रेल्वे विस्तारीकरणाचा प्रश्न उचलून धरावा, अशी इथल्या नागरिकांची अपेक्षा आहे.