शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

प्रवाशांच्या समस्या सुटतील काय?

By admin | Updated: June 29, 2016 02:59 IST

रेल्वे हे प्रवासाचे स्वस्त माध्यम आहे. दररोज नागपुरातून हजारो प्रवासी प्रवास करतात. परंतु पावलोपावली रेल्वे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागतो.

भारतीय यात्री केंद्र : प्रवाशांच्या समस्यांकडे वेधले लक्षनागपूर : रेल्वे हे प्रवासाचे स्वस्त माध्यम आहे. दररोज नागपुरातून हजारो प्रवासी प्रवास करतात. परंतु पावलोपावली रेल्वे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागतो. अवैध व्हेंडर, अस्वच्छता, गाडीत टीसीची संख्या कमी, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय, तृतीयपंथीयांचा हैदोस अशा एक ना अनेक समस्यांचा सामना रेल्वे प्रवाशांना करावा लागतो. त्यामुळे भारतीय यात्री केंद्राची स्थापना करून प्रवाशांच्या समस्यांसाठी मागील ३९ वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. रेल्वे प्रवाशांना न्याय देण्यासाठी भारतीय यात्री केंद्राने आजपर्यंत अनेकदा आंदोलने केली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत भारतीय यात्री केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत व्यासपीठ’मध्ये व्यक्त केले.‘लोकमत व्यासपीठ’मध्ये चर्चा करण्यासाठी भारतीय यात्री केंद्राचे महासचिव बसंत कुमार शुक्ला, हरीराम गुप्ता, डॉ. जय छांगानी, डॉ. प्रिया छांगानी, रितु बजाज, रत्ना अवस्थी, पूजा नागरे, जगजितसिंग चंडोक, दिलीप फत्तेपुरीया, दिनेश त्रिवेदी, पंकज गुप्ता, सरोज त्रिवेदी, ज्योती अवस्थी उपस्थित होत्या. पूर्वी रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एकही संस्था अस्तित्वात नव्हती. त्यामुळे १९७७ साली भारतीय यात्री केंद्राची स्थापना करण्यात आली. ज्योती अवस्थी यांनी प्रवासात महिलांना अनेक अडचणी येत असून असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे सांगितले. गाडीत टीसींची संख्या कमी असल्यामुळे तक्रार करण्यासाठी महिलांजवळ मार्ग उरत नसल्याचे त्यांनी सांगितले. पूजा नागरे यांनी रेल्वे तिकिटाच्या मागे हेल्पलाईन क्रमांक टाकणे गरजेचे असल्याचे सांगितले. रितु बजाज यांनी रेल्वेगाड्यात निकृष्ट भोजन मिळत असून झुरळ तसेच असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करणे महत्त्वाचे असल्याचा उल्लेख केला. पंकज गुप्ता यांनी प्लॅटफार्मवर अस्वच्छता असल्यामुळे प्रवाशांना त्रास होत असल्याची माहिती दिली. दिनेश त्रिवेदी यांनी अवैध व्हेंडर, तृतीयपंथींकडून टीसी वसुली करीत असल्याचे सांगितले. दिलीप फत्तेपुरीया यांनी व्हीआयपी कोट्याचे निकष ठरविण्याची मागणी केली. जगजितसिंग चंडोक यांनी भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. जय छांगानी यांनी रेल्वेने मागणी केल्यास नि:शुल्क सेवा पुरविण्याचा मानस व्यक्त केला. (प्रतिनिधी)