शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या समस्या सुटतील काय?

By admin | Updated: June 29, 2016 02:59 IST

रेल्वे हे प्रवासाचे स्वस्त माध्यम आहे. दररोज नागपुरातून हजारो प्रवासी प्रवास करतात. परंतु पावलोपावली रेल्वे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागतो.

भारतीय यात्री केंद्र : प्रवाशांच्या समस्यांकडे वेधले लक्षनागपूर : रेल्वे हे प्रवासाचे स्वस्त माध्यम आहे. दररोज नागपुरातून हजारो प्रवासी प्रवास करतात. परंतु पावलोपावली रेल्वे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागतो. अवैध व्हेंडर, अस्वच्छता, गाडीत टीसीची संख्या कमी, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय, तृतीयपंथीयांचा हैदोस अशा एक ना अनेक समस्यांचा सामना रेल्वे प्रवाशांना करावा लागतो. त्यामुळे भारतीय यात्री केंद्राची स्थापना करून प्रवाशांच्या समस्यांसाठी मागील ३९ वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. रेल्वे प्रवाशांना न्याय देण्यासाठी भारतीय यात्री केंद्राने आजपर्यंत अनेकदा आंदोलने केली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत भारतीय यात्री केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत व्यासपीठ’मध्ये व्यक्त केले.‘लोकमत व्यासपीठ’मध्ये चर्चा करण्यासाठी भारतीय यात्री केंद्राचे महासचिव बसंत कुमार शुक्ला, हरीराम गुप्ता, डॉ. जय छांगानी, डॉ. प्रिया छांगानी, रितु बजाज, रत्ना अवस्थी, पूजा नागरे, जगजितसिंग चंडोक, दिलीप फत्तेपुरीया, दिनेश त्रिवेदी, पंकज गुप्ता, सरोज त्रिवेदी, ज्योती अवस्थी उपस्थित होत्या. पूर्वी रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एकही संस्था अस्तित्वात नव्हती. त्यामुळे १९७७ साली भारतीय यात्री केंद्राची स्थापना करण्यात आली. ज्योती अवस्थी यांनी प्रवासात महिलांना अनेक अडचणी येत असून असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे सांगितले. गाडीत टीसींची संख्या कमी असल्यामुळे तक्रार करण्यासाठी महिलांजवळ मार्ग उरत नसल्याचे त्यांनी सांगितले. पूजा नागरे यांनी रेल्वे तिकिटाच्या मागे हेल्पलाईन क्रमांक टाकणे गरजेचे असल्याचे सांगितले. रितु बजाज यांनी रेल्वेगाड्यात निकृष्ट भोजन मिळत असून झुरळ तसेच असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करणे महत्त्वाचे असल्याचा उल्लेख केला. पंकज गुप्ता यांनी प्लॅटफार्मवर अस्वच्छता असल्यामुळे प्रवाशांना त्रास होत असल्याची माहिती दिली. दिनेश त्रिवेदी यांनी अवैध व्हेंडर, तृतीयपंथींकडून टीसी वसुली करीत असल्याचे सांगितले. दिलीप फत्तेपुरीया यांनी व्हीआयपी कोट्याचे निकष ठरविण्याची मागणी केली. जगजितसिंग चंडोक यांनी भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. जय छांगानी यांनी रेल्वेने मागणी केल्यास नि:शुल्क सेवा पुरविण्याचा मानस व्यक्त केला. (प्रतिनिधी)