शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

प्रवासी निवाऱ्याचा उपयाेग तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:11 IST

सज्जन पाटील लाेकमत न्यूज नेटवर्क मांढळ : मांढळ हे कुही तालुक्यातील मुख्य बाजारपेठेसाेबतच सर्वात माेठे गाव आहे. येथे बसस्थानकाच्या ...

सज्जन पाटील

लाेकमत न्यूज नेटवर्क

मांढळ : मांढळ हे कुही तालुक्यातील मुख्य बाजारपेठेसाेबतच सर्वात माेठे गाव आहे. येथे बसस्थानकाच्या नावावर तयार केलेल्या प्रवासी निवाऱ्याची तेवढीच माेठी दुरवस्था झाली आहे. हा निवारा काही महिन्यापासून मातीच्या ढिगाऱ्याआड दबला आहे. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना राेडलगत उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. यात महिला, लहान मुले व विद्यार्थिनींची माेठी गैरसाेय हाेत आहे. त्यामुळे या प्रवासी निवाऱ्याचा उपयाेग काय आहे, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

मांढळची लाेकसंख्या १५ हजाराच्या वर आहे. येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने शेतमालासाेबतच गुरांचा माेठा बाजार भरताे. गावात बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीयीकृत व माेठ्या खासगी बँका, प्राथमिक आराेग्य केंद्र व खासगी दवाखाने तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये असल्याने, मांढळ येथे कुही तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी, बहुतांश गावांमधील नागरिक व परिसरातील गावांमधील विद्यार्थ्यांचा थेट संबंध येताे.

तालुक्यातील बहुतांश शेतकरी व नागरिक बस अथवा खासगी प्रवासी वाहनाने मांढळ येथे येतात. येथे बसस्थानकाच्या नावावर तयार केलेल्या प्रवासी निवाऱ्याच्या दैनावस्थेमुळे प्रत्येकाला तिन्ही ऋतूत राेडलगत उभे राहून बस व खासगी प्रवासी वाहनांची प्रतीक्षा करावी लागते. विशेष म्हणजे, या निवाऱ्याची अवस्था व प्रवाशांची गैरसाेय याबाबत स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आमदार, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांना माहिती आहे. मात्र, प्रत्येक जण त्या निवाऱ्याची दुरवस्था बघून धन्यता मानत आहे. त्यामुळे हा निवारा अतिक्रमणमुक्त करून त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला कधी जाग येणार, असा प्रश्नही शेतकऱ्यांसह नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

...

मूलभूत सुविधांचा अभाव

या बसस्थानक नामक प्रवासी निवाऱ्याचे छत तुटले असून, त्यातून पाणी गळते. खड्डे तयार झाल्याने तिथे बसणे तर साेडा, साधे उभेही राहणे अवघड झाले आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व इतर मूलभूत सुविधा नसल्याने लहान मुले, महिला, तरुणी व विद्यार्थिनींची कुचंबणा हाेते. त्यांना असामाजिक तत्त्चाच्या लाेकांनाही ताेंड द्यावे लागते.

...

अतिक्रमणाचा विळखा

या प्रवासी निवाऱ्याच्या संपूर्ण परिसरात शेजारच्या दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. मध्येच मातीचा ढिगारा टाकण्यात आल्याने आत जाणे शक्य नाही. जिल्हा परिषद प्रशासनाने तयार केलेल्या या प्रवासी निवाऱ्याच्या देखभालीची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडे आहे. मात्र, ग्रामपंचायत पदाधिकारी या निवाऱ्याची दुरवस्था व अतिक्रमण याकडे लक्ष द्यायला तयार नाही.