शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी निवाऱ्याचा उपयाेग तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:11 IST

सज्जन पाटील लाेकमत न्यूज नेटवर्क मांढळ : मांढळ हे कुही तालुक्यातील मुख्य बाजारपेठेसाेबतच सर्वात माेठे गाव आहे. येथे बसस्थानकाच्या ...

सज्जन पाटील

लाेकमत न्यूज नेटवर्क

मांढळ : मांढळ हे कुही तालुक्यातील मुख्य बाजारपेठेसाेबतच सर्वात माेठे गाव आहे. येथे बसस्थानकाच्या नावावर तयार केलेल्या प्रवासी निवाऱ्याची तेवढीच माेठी दुरवस्था झाली आहे. हा निवारा काही महिन्यापासून मातीच्या ढिगाऱ्याआड दबला आहे. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना राेडलगत उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. यात महिला, लहान मुले व विद्यार्थिनींची माेठी गैरसाेय हाेत आहे. त्यामुळे या प्रवासी निवाऱ्याचा उपयाेग काय आहे, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

मांढळची लाेकसंख्या १५ हजाराच्या वर आहे. येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने शेतमालासाेबतच गुरांचा माेठा बाजार भरताे. गावात बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीयीकृत व माेठ्या खासगी बँका, प्राथमिक आराेग्य केंद्र व खासगी दवाखाने तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये असल्याने, मांढळ येथे कुही तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी, बहुतांश गावांमधील नागरिक व परिसरातील गावांमधील विद्यार्थ्यांचा थेट संबंध येताे.

तालुक्यातील बहुतांश शेतकरी व नागरिक बस अथवा खासगी प्रवासी वाहनाने मांढळ येथे येतात. येथे बसस्थानकाच्या नावावर तयार केलेल्या प्रवासी निवाऱ्याच्या दैनावस्थेमुळे प्रत्येकाला तिन्ही ऋतूत राेडलगत उभे राहून बस व खासगी प्रवासी वाहनांची प्रतीक्षा करावी लागते. विशेष म्हणजे, या निवाऱ्याची अवस्था व प्रवाशांची गैरसाेय याबाबत स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आमदार, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांना माहिती आहे. मात्र, प्रत्येक जण त्या निवाऱ्याची दुरवस्था बघून धन्यता मानत आहे. त्यामुळे हा निवारा अतिक्रमणमुक्त करून त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला कधी जाग येणार, असा प्रश्नही शेतकऱ्यांसह नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

...

मूलभूत सुविधांचा अभाव

या बसस्थानक नामक प्रवासी निवाऱ्याचे छत तुटले असून, त्यातून पाणी गळते. खड्डे तयार झाल्याने तिथे बसणे तर साेडा, साधे उभेही राहणे अवघड झाले आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व इतर मूलभूत सुविधा नसल्याने लहान मुले, महिला, तरुणी व विद्यार्थिनींची कुचंबणा हाेते. त्यांना असामाजिक तत्त्चाच्या लाेकांनाही ताेंड द्यावे लागते.

...

अतिक्रमणाचा विळखा

या प्रवासी निवाऱ्याच्या संपूर्ण परिसरात शेजारच्या दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. मध्येच मातीचा ढिगारा टाकण्यात आल्याने आत जाणे शक्य नाही. जिल्हा परिषद प्रशासनाने तयार केलेल्या या प्रवासी निवाऱ्याच्या देखभालीची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडे आहे. मात्र, ग्रामपंचायत पदाधिकारी या निवाऱ्याची दुरवस्था व अतिक्रमण याकडे लक्ष द्यायला तयार नाही.