शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

विदर्भातील ९० हजार काेटी गुंतवणूक प्रकल्पांचे काय झाले? एमआयडीसी उद्याेजकांचा सवाल

By निशांत वानखेडे | Updated: November 30, 2023 18:37 IST

मुख्यमंत्र्यांनी एमओयुची सद्यस्थिती जाहीर करावी

निशांत वानखेडे, नागपूर : राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री यांनी दावाेस येथे झालेल्या वर्ल्ड एकाॅनाॅमिक फाेरममध्ये केलेल्या सामंजस्य करारासह (एमओयु) दाेन वर्षात ५ माेठ्या प्रकल्पांची घाेषणा केली हाेती. यातून विदर्भात ९० हजार काेटींपेक्षा अधिकची गुंतवणूक हाेण्याचा दावा केला हाेता. या सर्व प्रकल्पांचे काय झाले असा सवाल करीत या सर्व कराराबाबतची सद्यस्थिती मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी, अशी मागणी नैसर्गिक रिसाेर्स तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी केली.

एमआयडीसी इंडस्ट्रीज असाेसिएशन, चंद्रपूरतर्फे गुरुवारी आयाेजित पत्रपरिषदेत माहेश्वरी यांनी दाेन वर्षात झालेल्या विविध सामंजस्य करार व उद्याेगाबाबत झालेल्या घाेषणांची माहिती दिली. राज्य सरकारने गेल्या दीड ते दाेन वर्षात पाच माेठ्या प्रकल्पांची घाेषणा केली व यातून लाखाे युवकांना राेजगार मिळेल, असा दावा केला हाेता. यात भद्रावती येथे २० हजार काेटी रुपये गुंतवणुकीचा काेल गॅसिफिकेशन प्रकल्प, वळद येथे ५५०० काेटींचा वळद फेराे अलाईड प्रकल्प, गडचिराेली जिल्ह्यात २० हजार काेटी रुपये गुंतवणुकीचा लाॅयड मेटल्स प्रकल्प, नागपूर जिल्ह्यात बुटीबाेरी येथे १८ हजार काेटी रुपये गुंतवणुकीचा आरई पाॅवर प्रकल्पाबाबत सामंजस्य करार करण्यात आले हाेते. याशिवाय अमरावती जिल्ह्यात टेक्सटाईल्स पार्कचीसुद्धा घाेषणा करण्यात आली हाेती. या सर्व प्रकल्पांमध्ये जवळपास एक लाख काेटी रुपयांची गुंतवणूक हाेण्याचा दावा करण्यात आला हाेता.

या सर्व प्रकल्पांच्या घाेषणांना १२ ते १५ महिने लाेटले असताना प्रकल्पांचे काय झाले, हे स्पष्ट समजत नसल्याचे माहेश्वरी म्हणाले. घाेषणा हाेतात पण हाती काहीच लागत नाही, असे हाेऊ नये, ही भावना त्यांनी व्यक्त केली. याबाबत उद्याेगमंत्री व मुख्यमंत्र्यांनाही पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात काेळसा, वीज, पाणी व खनिज घटक माेठ्या प्रमाणात आहेत आणि दळणवळणाची कनेक्टीव्हीसुद्धा इतर भागाच्या तुलनेत सर्वाेत्तम आहे. वीज तयार हाेत असल्याने कमी दरात वीज उपलब्ध करून उद्याेजकांना आकर्षित करता येते. त्यामुळे सरकारने याचा लाभ घेत उद्याेग वाढवून येथील युवकांना राेजगार द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पत्रपरिषदेत असाेसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रुंगटा उपस्थित हाेते.

रत्नागिरी-विदर्भाचा तुलनात्मक अभ्यास करा

रत्नागिरीऐवजी नागपूर परिसरात रिफायनरी पेट्राेकेमिकल्स काॅम्प्लेक्सची निर्मिती करणे व्यवहार्य ठरते. साधनसंपत्ती व दळवळणाच्या साधनांचा व लाेकसंख्येच्या दृष्टीने विचार केल्यास नागपूरचे क्षेत्रच सर्वाेत्तम आहे. त्यामुळे दाेन्ही क्षेत्राचा तुलनात्मक अभ्यास करून निर्णय घ्यावा, अशी मागणी माहेश्वरी यांनी केली.

सामंजस्य करार हाेऊन १२ ते १५ महिन्यांचा काळ लाेटला आहे पण त्यापुढे हालचाली हाेताना दिसत नाही. आता उद्याेगाची पायभरणी केल्यानंतरही प्रत्यक्ष काम सुरू व्हायला चार-पाच वर्षाचा कालावधी लागेल. त्यामुळे सरकारने जलदगतीने कार्य करावे, ज्यामुळे विदर्भातील युवकांना त्याचा लाभ हाेईल. - प्रदीप माहेश्वरी, नैसर्गिक रिसाेर्स तज्ज्ञ

टॅग्स :MIDCएमआयडीसी