शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील ९० हजार काेटी गुंतवणूक प्रकल्पांचे काय झाले? एमआयडीसी उद्याेजकांचा सवाल

By निशांत वानखेडे | Updated: November 30, 2023 18:37 IST

मुख्यमंत्र्यांनी एमओयुची सद्यस्थिती जाहीर करावी

निशांत वानखेडे, नागपूर : राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री यांनी दावाेस येथे झालेल्या वर्ल्ड एकाॅनाॅमिक फाेरममध्ये केलेल्या सामंजस्य करारासह (एमओयु) दाेन वर्षात ५ माेठ्या प्रकल्पांची घाेषणा केली हाेती. यातून विदर्भात ९० हजार काेटींपेक्षा अधिकची गुंतवणूक हाेण्याचा दावा केला हाेता. या सर्व प्रकल्पांचे काय झाले असा सवाल करीत या सर्व कराराबाबतची सद्यस्थिती मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी, अशी मागणी नैसर्गिक रिसाेर्स तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी केली.

एमआयडीसी इंडस्ट्रीज असाेसिएशन, चंद्रपूरतर्फे गुरुवारी आयाेजित पत्रपरिषदेत माहेश्वरी यांनी दाेन वर्षात झालेल्या विविध सामंजस्य करार व उद्याेगाबाबत झालेल्या घाेषणांची माहिती दिली. राज्य सरकारने गेल्या दीड ते दाेन वर्षात पाच माेठ्या प्रकल्पांची घाेषणा केली व यातून लाखाे युवकांना राेजगार मिळेल, असा दावा केला हाेता. यात भद्रावती येथे २० हजार काेटी रुपये गुंतवणुकीचा काेल गॅसिफिकेशन प्रकल्प, वळद येथे ५५०० काेटींचा वळद फेराे अलाईड प्रकल्प, गडचिराेली जिल्ह्यात २० हजार काेटी रुपये गुंतवणुकीचा लाॅयड मेटल्स प्रकल्प, नागपूर जिल्ह्यात बुटीबाेरी येथे १८ हजार काेटी रुपये गुंतवणुकीचा आरई पाॅवर प्रकल्पाबाबत सामंजस्य करार करण्यात आले हाेते. याशिवाय अमरावती जिल्ह्यात टेक्सटाईल्स पार्कचीसुद्धा घाेषणा करण्यात आली हाेती. या सर्व प्रकल्पांमध्ये जवळपास एक लाख काेटी रुपयांची गुंतवणूक हाेण्याचा दावा करण्यात आला हाेता.

या सर्व प्रकल्पांच्या घाेषणांना १२ ते १५ महिने लाेटले असताना प्रकल्पांचे काय झाले, हे स्पष्ट समजत नसल्याचे माहेश्वरी म्हणाले. घाेषणा हाेतात पण हाती काहीच लागत नाही, असे हाेऊ नये, ही भावना त्यांनी व्यक्त केली. याबाबत उद्याेगमंत्री व मुख्यमंत्र्यांनाही पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात काेळसा, वीज, पाणी व खनिज घटक माेठ्या प्रमाणात आहेत आणि दळणवळणाची कनेक्टीव्हीसुद्धा इतर भागाच्या तुलनेत सर्वाेत्तम आहे. वीज तयार हाेत असल्याने कमी दरात वीज उपलब्ध करून उद्याेजकांना आकर्षित करता येते. त्यामुळे सरकारने याचा लाभ घेत उद्याेग वाढवून येथील युवकांना राेजगार द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पत्रपरिषदेत असाेसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रुंगटा उपस्थित हाेते.

रत्नागिरी-विदर्भाचा तुलनात्मक अभ्यास करा

रत्नागिरीऐवजी नागपूर परिसरात रिफायनरी पेट्राेकेमिकल्स काॅम्प्लेक्सची निर्मिती करणे व्यवहार्य ठरते. साधनसंपत्ती व दळवळणाच्या साधनांचा व लाेकसंख्येच्या दृष्टीने विचार केल्यास नागपूरचे क्षेत्रच सर्वाेत्तम आहे. त्यामुळे दाेन्ही क्षेत्राचा तुलनात्मक अभ्यास करून निर्णय घ्यावा, अशी मागणी माहेश्वरी यांनी केली.

सामंजस्य करार हाेऊन १२ ते १५ महिन्यांचा काळ लाेटला आहे पण त्यापुढे हालचाली हाेताना दिसत नाही. आता उद्याेगाची पायभरणी केल्यानंतरही प्रत्यक्ष काम सुरू व्हायला चार-पाच वर्षाचा कालावधी लागेल. त्यामुळे सरकारने जलदगतीने कार्य करावे, ज्यामुळे विदर्भातील युवकांना त्याचा लाभ हाेईल. - प्रदीप माहेश्वरी, नैसर्गिक रिसाेर्स तज्ज्ञ

टॅग्स :MIDCएमआयडीसी