शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

कामगारांच्या पाेटासाठी काय व्यवस्था केली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:11 IST

नागपूर : मार्च २०२० मध्ये अचानक लाॅकडाऊन लावण्याच्या घाेषणेने देशभरात हाहाकार माजला हाेता. त्यात सर्वाधिक हाेरपळला गेला ताे कामगार ...

नागपूर : मार्च २०२० मध्ये अचानक लाॅकडाऊन लावण्याच्या घाेषणेने देशभरात हाहाकार माजला हाेता. त्यात सर्वाधिक हाेरपळला गेला ताे कामगार वर्ग. शेकडाे, हजाराे किलाेमीटरची पायपीट, रस्त्यावरचे मृत्यू, राेजगार गेल्याने कुटुंबाचे झालेले हाल, हे सगळं आठवताना त्या अनुभवातून गेलेल्या कामगारांच्या अंगावर आजही काटा उभा हाेताे. इतके वाईट अनुभव पाठीशी असताना प्रशासन व शासनकर्त्यांना मात्र त्यांच्या वेदनांशी काही देणेघेणे नसते. एका पक्षाच्या सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्यांना दाेष देत पुन्हा आपणही ताेच कित्ता गिरवायचा, हा शहाणपणा नव्हे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. नागपूर शहरात गेल्या काही दिवसात काेराेनाने पुन्हा डाेके वर काढले आणि उपाय म्हणून प्रशासनाने कडक लाॅकडाऊनची घाेषणा केली. हा एका शहरापुरता निर्णय असला तरी या शहरात राहणाऱ्या हातावर पाेट असलेल्या कामगारांसाठी सरकारने काय व्यवस्था केली, असा सवाल कामगार नेत्यांनी केला आहे. शासनाने याचा जबाब द्यावा, असे आव्हान त्यांनी दिले.

शासनाचा स्वत:च्या व्यवस्थेवर विश्वास नाही : धुरट

ज्येष्ठ कामगार नेते हरीश धुरट यांनी या निर्णयाचा विराेध केला आहे. ते म्हणाले, गेल्या वर्षी केंद्र शासनाने अचानक घेतलेला लाॅकडाऊनचा निर्णय १०० टक्के चुकीचा हाेता. काेराेनापूर्वी विमानसेवेबाबत जी व्यवस्था करायला हवी ती केली नाही आणि त्याचा भुर्दंड गरीब कामगारांना भाेगावा लागला. त्यांचे अताेनात हाल झाले. अशावेळीही शहरा शहरातून गेलेले मजूर काेराेनाने बाधित झाले नाही पण भूकेने व पायपिटीने मेले. हा प्रश्न एका शहरापुरता मर्यादित असला तरी नागपूर शहरातही लाखाे कामगार राहतात व आताही त्यांच्या राेजगारावरच परिणाम हाेणार हे निश्चित. आधीच राेजगार बुडाल्याने त्यांच्या घरच्या चुली पेटल्या नव्हत्या, मग यावेळी कशा पेटतील, हा विचार प्रशासनाने केला आहे का. लसीकरण सुरू झाले असताना पुन्हा कशाला टाळेबंदी. लाेक सॅनिटायझर, मास्कचा वापर करीत आहेत. जे नियम पाळत नसतील त्यांना शिस्त लावा, दंड आकारा पण सरसकट टाळेबंदी नकाे. शासनाला स्वत:च्या व्यवस्थेवर विश्वास नाही का, असा सवाल धुरट यांनी केला.

तर शासनाने कामगारांची व्यवस्था करावी : भाेंगाडे

लाॅकडाऊन करण्याचा निर्णय अयाेग्य असल्याचे मत माेलकरीण संघटनेचे विलास भाेंगाडे यांनी व्यक्त केले. टाळेबंदीचा सर्वाधिक फटका गरीब कामगारांना सहन करावा लागताे. गेल्या वर्षीचा भयानक अनुभव पाठीशी असताना पुन्हा ताेच कित्ता गिरवणे याेग्य नाही. काम बंद राहतील तर राेजच्या मजुरीवर जगणाऱ्यांना राेजगार मिळणार नाही व घरची चूल पेटणार नाही. असंघटित क्षेत्रातील श्रमिकांचे सर्वाधिक हाल हाेतील. आता कुठे कामावर घेतलेल्या घरकाम करणाऱ्या महिलांना पुन्हा कामावरून काढले तर त्यांच्या कुटुंबाचे हाल हाेतील. बांधकाम मजूर, फेरीवाले यांचेही तसेच. आठ दिवस टाळेबंदी लागणार आहे आणि यावेळी पूर्व सूचना दिली आहे. मात्र साेमवारपर्यंत या गरीब मजुरांसाठी धान्य व साेयीसुविधांबाबत काय उपाययाेजना केल्या याची माहिती शासनाने द्यावी, असे आवाहन भाेंगाडे यांनी केले आहे.