शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या पाेटासाठी काय व्यवस्था केली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:11 IST

नागपूर : मार्च २०२० मध्ये अचानक लाॅकडाऊन लावण्याच्या घाेषणेने देशभरात हाहाकार माजला हाेता. त्यात सर्वाधिक हाेरपळला गेला ताे कामगार ...

नागपूर : मार्च २०२० मध्ये अचानक लाॅकडाऊन लावण्याच्या घाेषणेने देशभरात हाहाकार माजला हाेता. त्यात सर्वाधिक हाेरपळला गेला ताे कामगार वर्ग. शेकडाे, हजाराे किलाेमीटरची पायपीट, रस्त्यावरचे मृत्यू, राेजगार गेल्याने कुटुंबाचे झालेले हाल, हे सगळं आठवताना त्या अनुभवातून गेलेल्या कामगारांच्या अंगावर आजही काटा उभा हाेताे. इतके वाईट अनुभव पाठीशी असताना प्रशासन व शासनकर्त्यांना मात्र त्यांच्या वेदनांशी काही देणेघेणे नसते. एका पक्षाच्या सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्यांना दाेष देत पुन्हा आपणही ताेच कित्ता गिरवायचा, हा शहाणपणा नव्हे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. नागपूर शहरात गेल्या काही दिवसात काेराेनाने पुन्हा डाेके वर काढले आणि उपाय म्हणून प्रशासनाने कडक लाॅकडाऊनची घाेषणा केली. हा एका शहरापुरता निर्णय असला तरी या शहरात राहणाऱ्या हातावर पाेट असलेल्या कामगारांसाठी सरकारने काय व्यवस्था केली, असा सवाल कामगार नेत्यांनी केला आहे. शासनाने याचा जबाब द्यावा, असे आव्हान त्यांनी दिले.

शासनाचा स्वत:च्या व्यवस्थेवर विश्वास नाही : धुरट

ज्येष्ठ कामगार नेते हरीश धुरट यांनी या निर्णयाचा विराेध केला आहे. ते म्हणाले, गेल्या वर्षी केंद्र शासनाने अचानक घेतलेला लाॅकडाऊनचा निर्णय १०० टक्के चुकीचा हाेता. काेराेनापूर्वी विमानसेवेबाबत जी व्यवस्था करायला हवी ती केली नाही आणि त्याचा भुर्दंड गरीब कामगारांना भाेगावा लागला. त्यांचे अताेनात हाल झाले. अशावेळीही शहरा शहरातून गेलेले मजूर काेराेनाने बाधित झाले नाही पण भूकेने व पायपिटीने मेले. हा प्रश्न एका शहरापुरता मर्यादित असला तरी नागपूर शहरातही लाखाे कामगार राहतात व आताही त्यांच्या राेजगारावरच परिणाम हाेणार हे निश्चित. आधीच राेजगार बुडाल्याने त्यांच्या घरच्या चुली पेटल्या नव्हत्या, मग यावेळी कशा पेटतील, हा विचार प्रशासनाने केला आहे का. लसीकरण सुरू झाले असताना पुन्हा कशाला टाळेबंदी. लाेक सॅनिटायझर, मास्कचा वापर करीत आहेत. जे नियम पाळत नसतील त्यांना शिस्त लावा, दंड आकारा पण सरसकट टाळेबंदी नकाे. शासनाला स्वत:च्या व्यवस्थेवर विश्वास नाही का, असा सवाल धुरट यांनी केला.

तर शासनाने कामगारांची व्यवस्था करावी : भाेंगाडे

लाॅकडाऊन करण्याचा निर्णय अयाेग्य असल्याचे मत माेलकरीण संघटनेचे विलास भाेंगाडे यांनी व्यक्त केले. टाळेबंदीचा सर्वाधिक फटका गरीब कामगारांना सहन करावा लागताे. गेल्या वर्षीचा भयानक अनुभव पाठीशी असताना पुन्हा ताेच कित्ता गिरवणे याेग्य नाही. काम बंद राहतील तर राेजच्या मजुरीवर जगणाऱ्यांना राेजगार मिळणार नाही व घरची चूल पेटणार नाही. असंघटित क्षेत्रातील श्रमिकांचे सर्वाधिक हाल हाेतील. आता कुठे कामावर घेतलेल्या घरकाम करणाऱ्या महिलांना पुन्हा कामावरून काढले तर त्यांच्या कुटुंबाचे हाल हाेतील. बांधकाम मजूर, फेरीवाले यांचेही तसेच. आठ दिवस टाळेबंदी लागणार आहे आणि यावेळी पूर्व सूचना दिली आहे. मात्र साेमवारपर्यंत या गरीब मजुरांसाठी धान्य व साेयीसुविधांबाबत काय उपाययाेजना केल्या याची माहिती शासनाने द्यावी, असे आवाहन भाेंगाडे यांनी केले आहे.