शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कामगारांच्या पाेटासाठी काय व्यवस्था केली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:11 IST

नागपूर : मार्च २०२० मध्ये अचानक लाॅकडाऊन लावण्याच्या घाेषणेने देशभरात हाहाकार माजला हाेता. त्यात सर्वाधिक हाेरपळला गेला ताे कामगार ...

नागपूर : मार्च २०२० मध्ये अचानक लाॅकडाऊन लावण्याच्या घाेषणेने देशभरात हाहाकार माजला हाेता. त्यात सर्वाधिक हाेरपळला गेला ताे कामगार वर्ग. शेकडाे, हजाराे किलाेमीटरची पायपीट, रस्त्यावरचे मृत्यू, राेजगार गेल्याने कुटुंबाचे झालेले हाल, हे सगळं आठवताना त्या अनुभवातून गेलेल्या कामगारांच्या अंगावर आजही काटा उभा हाेताे. इतके वाईट अनुभव पाठीशी असताना प्रशासन व शासनकर्त्यांना मात्र त्यांच्या वेदनांशी काही देणेघेणे नसते. एका पक्षाच्या सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्यांना दाेष देत पुन्हा आपणही ताेच कित्ता गिरवायचा, हा शहाणपणा नव्हे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. नागपूर शहरात गेल्या काही दिवसात काेराेनाने पुन्हा डाेके वर काढले आणि उपाय म्हणून प्रशासनाने कडक लाॅकडाऊनची घाेषणा केली. हा एका शहरापुरता निर्णय असला तरी या शहरात राहणाऱ्या हातावर पाेट असलेल्या कामगारांसाठी सरकारने काय व्यवस्था केली, असा सवाल कामगार नेत्यांनी केला आहे. शासनाने याचा जबाब द्यावा, असे आव्हान त्यांनी दिले.

शासनाचा स्वत:च्या व्यवस्थेवर विश्वास नाही : धुरट

ज्येष्ठ कामगार नेते हरीश धुरट यांनी या निर्णयाचा विराेध केला आहे. ते म्हणाले, गेल्या वर्षी केंद्र शासनाने अचानक घेतलेला लाॅकडाऊनचा निर्णय १०० टक्के चुकीचा हाेता. काेराेनापूर्वी विमानसेवेबाबत जी व्यवस्था करायला हवी ती केली नाही आणि त्याचा भुर्दंड गरीब कामगारांना भाेगावा लागला. त्यांचे अताेनात हाल झाले. अशावेळीही शहरा शहरातून गेलेले मजूर काेराेनाने बाधित झाले नाही पण भूकेने व पायपिटीने मेले. हा प्रश्न एका शहरापुरता मर्यादित असला तरी नागपूर शहरातही लाखाे कामगार राहतात व आताही त्यांच्या राेजगारावरच परिणाम हाेणार हे निश्चित. आधीच राेजगार बुडाल्याने त्यांच्या घरच्या चुली पेटल्या नव्हत्या, मग यावेळी कशा पेटतील, हा विचार प्रशासनाने केला आहे का. लसीकरण सुरू झाले असताना पुन्हा कशाला टाळेबंदी. लाेक सॅनिटायझर, मास्कचा वापर करीत आहेत. जे नियम पाळत नसतील त्यांना शिस्त लावा, दंड आकारा पण सरसकट टाळेबंदी नकाे. शासनाला स्वत:च्या व्यवस्थेवर विश्वास नाही का, असा सवाल धुरट यांनी केला.

तर शासनाने कामगारांची व्यवस्था करावी : भाेंगाडे

लाॅकडाऊन करण्याचा निर्णय अयाेग्य असल्याचे मत माेलकरीण संघटनेचे विलास भाेंगाडे यांनी व्यक्त केले. टाळेबंदीचा सर्वाधिक फटका गरीब कामगारांना सहन करावा लागताे. गेल्या वर्षीचा भयानक अनुभव पाठीशी असताना पुन्हा ताेच कित्ता गिरवणे याेग्य नाही. काम बंद राहतील तर राेजच्या मजुरीवर जगणाऱ्यांना राेजगार मिळणार नाही व घरची चूल पेटणार नाही. असंघटित क्षेत्रातील श्रमिकांचे सर्वाधिक हाल हाेतील. आता कुठे कामावर घेतलेल्या घरकाम करणाऱ्या महिलांना पुन्हा कामावरून काढले तर त्यांच्या कुटुंबाचे हाल हाेतील. बांधकाम मजूर, फेरीवाले यांचेही तसेच. आठ दिवस टाळेबंदी लागणार आहे आणि यावेळी पूर्व सूचना दिली आहे. मात्र साेमवारपर्यंत या गरीब मजुरांसाठी धान्य व साेयीसुविधांबाबत काय उपाययाेजना केल्या याची माहिती शासनाने द्यावी, असे आवाहन भाेंगाडे यांनी केले आहे.