शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वीकेंड लाॅकडाऊनमुळे बाजारात शुकशुकाट ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST

नागपूर : वीकेंड लाॅकडाऊनच्या कडक अंमलबजावणीचा प्रभाव शनिवारी नागपुरात दिसून आला. शासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालयेही बंद हाेती. औषधी तसेच ...

नागपूर : वीकेंड लाॅकडाऊनच्या कडक अंमलबजावणीचा प्रभाव शनिवारी नागपुरात दिसून आला. शासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालयेही बंद हाेती. औषधी तसेच किराणा, भाजी, फळे, पेट्राेल पंप आदी जीवनाश्यक गाेष्टी वगळता इतर सर्व दुकाने बंद हाेती. त्यामुळे शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला हाेता. राज्य शासनाकडून लाॅकडाऊनची घाेषणा केल्यानंतर महापालिका आणि पाेलीस प्रशासनाने नागरिकांना नियम पालनासाठी कठाेर पावले उचलली आहेत.

राज्य शासनाच्या आदेशानुसार नागपुरात शुक्रवारी रात्री ८ वाजतापासून कडक लाॅकडाऊनला सुरुवात झाली, जी साेमवारी सकाळी ७ वाजतापर्यंत चालणार आहे. इतवारी, मस्कासाथ, मोमिनपुरा, सीताबर्डी, जरीपटका परिसरातील दुकानदारांनी लाॅकडाऊनविराेधात प्रदर्शनही केले हाेते. त्यानंतर मात्र पाेलीस प्रशासनाने सर्व क्षेत्रात मार्च काढत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठाेर कारवाईचा इशारा व्यापाऱ्यांनाही दिला. याचा परिणाम शनिवारी स्पष्ट दिसून आला. इतवारीच्या शहीद चाैकासह प्रमुख चाैकांमध्ये बॅरिकेड लावून बंदाेबस्त ठेवण्यात आला. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. काही वाहनचालकांना पोलिसांनी दंड ठोठावला. ओळखपत्र आणि कामाबाबत माहितीचे दस्तऐवज असलेल्यांना साेडण्यात येत हाेते. महाल आणि सीताबर्डी भागात शुकशुकाट पसरला हाेता. रविवारी सार्वजनिक सुटी असल्याने येथील दुकाने तशीही बंद राहणार आहेत. मात्र फूटपाथवर माेठ्या संख्येने दुकाने लागलेली असतात, त्यामुळे पाेलिसांनी आधीपासूनच कंबर कसली आहे. संक्रमणात वाढ हाेत असल्याने मनपा प्रशासन आणि पाेलिसांचाही तणाव वाढला आहे. त्यामुळे कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उद्यानांचे गेटही बंद करण्यात आले आहेत. हाॅटेल्स आणि रेस्टाॅरंटमधून हाेम डिलिव्हरीची सुविधा देण्यात आली आहे. माॅल्समध्ये किराणासंबंधित सेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र त्याकडे ग्राहक भटकलेच नाही. काही बाजारपेठांमध्ये व्यापारी आपापल्या दुकानांसमोर बसून होते. काही असोसिएशननी बैठका घेऊन शासनाच्या निर्णयाचा निषेध केला.

रस्त्यावर वाहन घटले

साेमवार ते शुक्रवारपर्यंत नागपूरच्या रस्त्यावर दिसणारी नागरिकांची आणि वाहनांची गर्दी शनिवारी मात्र दिसली नाही. काहीच वाहने रस्त्यांवर दिसत होती. सायंकाळच्या वेळी वाहनांची संख्या वाढली पण सूर्यास्त हाेताच पुन्हा रस्ते ओसाड पडले.