शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना संक्रमणातही भरला आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काेराेना संक्रमण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात आठवडी बाजार भरण्यावर काही काळासाठी बंदी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : काेराेना संक्रमण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात आठवडी बाजार भरण्यावर काही काळासाठी बंदी घातली आहे. त्याअनुषंगाने काचूरवाही (ता. रामटेक) ग्रामपंचायत प्रशासनाने गावात दवंडी देऊन आठवडी बाजार भरणार नाही, अशी वेळावेळी सूचना दिली हाेती. मात्र, नागरिकांनी या दंवडीकडे व प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत आठवडी बाजार भरवला. एवढेच नव्हे तर बाजारात काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचा फज्जाही उडवण्यात आला.

काचूरवाही येथे रविवारी आठवडी बाजार भरताे. या बाजारात स्थानिक व परिसरातील काही गावांमधील नागरिक भाजीपाला व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी येतात. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमणात वाढ हाेत असल्याने जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथराेग प्रतिबंधक अधिनियम १८९७ अन्वये जिल्ह्यातील आठवडी बाजारांवर काही काळासाठी बंदी घातली आहे. रामटेक तालुक्यात काेराेना संक्रमण वाढत असल्याने तालुक्यात कुठेही आठवडी बाजार भरवू नये, अशा सूचनाही तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत. त्याअनुषंगाने काचूरवाही ग्रामपंचायत प्रशासनाने गावात वेळावेळी दवंडी देऊन बाजार भरणार नाही, अशा सूचनाही नागरिकांना दिल्या हाेत्या.

काचूरवाही येथेही काेराेना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यातच स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या दवंडीकडे दुर्लक्ष करीत गावात रविवारऐवजी साेमवारी (दि. १२) आठवडी बाजार भरवला हाेता. या बाजारात बाहेरगावाहून भाजीपाला विक्रेते व खरेदीसाठी नागरिक आले हाेते. विक्रेत्यांनी त्यांची दुकाने गावातील मुख्य चाैकात राेडलगत थाटली हाेती. बाजारातील बहुतांश नागरिक विना मास्क फिरत हाेते तर कुणीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नव्हते. ही बाब प्रशासनाला माहिती असूनही कुणीही कारवाई करण्याची तसदी घेतली नाही.

...

नागरिकांचा बेजबाबदारपणा धाेकादायक

काचूरवाही येथे सर्दी, ताप, खाेकला, अंगदुखी, मळमळ वाटणे ही लक्षणे असलेले रुग्ण घराेघरी आहेत. गावातील व रामटेक शहरातील खासगी दवाखानेही फुल आहेत. एवढे असूनही नागरिक काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करीत नाही. प्रशासनाने सूचना देऊनही त्याचे पालन करीत नाही. मास्क न वापरणे, आजारपणात कुठेही फिरणे, चाैकात व सार्वजनिक ठिकाणी गटागटाने गप्पा करीत बसणे, कुठेही थुंकणे या बाबी आजूनही दिसून येत आहेत. नागरिकांचा हा बेजबाबदारपणा त्यांच्यासह इतरांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बेजबाबदार नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर माेठ्या रकमेची दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली.