शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

अनलॉकच्या काळात विणकर लॉकडाऊनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

रियाज अहमद नागपूर : सरकार एकीकडे स्किल इंडियावर बराच भर देत आहे. मात्र दुसरीकडे पारंपरिक कौशल्य असलेल्या विणकरांकडे मात्र ...

रियाज अहमद

नागपूर : सरकार एकीकडे स्किल इंडियावर बराच भर देत आहे. मात्र दुसरीकडे पारंपरिक कौशल्य असलेल्या विणकरांकडे मात्र सरकारचे लक्ष नाही. या दुर्लक्षपणामुळे या कारागिरांवर सध्याच्या अनलॉकच्या काळात लॉकडाऊनसारखी स्थिती ओढवली आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात लावण्यात आलेल्या टाळेबंदीतून आता कुठे नागरिक हळूहळू सावरायला लागले आहेत. मात्र विणकरांचा व्यवसाय ठप्प पडल्याने अवस्था वाईट आहे. विणकरांच्या व्यवसायात आता पॉवरलूमच उरले आहे. परंतु अनेक पॉवरलूम बंद पडले आहेत. बाजारात कच्चा मालही अधिक भावाने मिळत आहे. परंतु मालाला योग्य भाव मिळत नसल्याने व्यवसाय मंदावला आहे.

नागपुरातील पॉवरलूमवर प्रामुख्याने नऊ मीटर लांबीचे धोतर, महाराष्ट्रीयन साडी, सहावारी गोल साडी, आणि सात मीटरची छत्तीसगडी साडी तयार केली जाते. साडी बनविण्यासाठी धागा, रंग यासह अनेक प्रकारचा कच्चा माल लागतो. त्याच्या किमती वाढल्याने साडीच्या किमती महागल्या आहेत. मात्र गुंतवणूक खर्चही निघत नाही, अशी अवस्था आहे. स्वत: चालकच मालक असल्याने साडी स्वत:च विकावी लागत आहे, अन्यथा नाईलाजाने पॉवरलूम बंद करावा लागत आहे. यापूर्वी एका कारागिराच्या भरवशावर दोन पॉवरलूम चालायचे. आता एकाच्या भरवशावर तीन ते चार पॉवरलूम चालविले जातात. कारण मिळकत कमी होत असल्याने कामावरून कामगार कमी झाले आहेत.

...

प्रिंट युनिट नसल्याने व्यवसाय धोक्यात

केंद्र सरकारच्या ऑल इंडिया पॉवरलूम बोर्डाचे माजी संचालक इरफान कमर यांच्या माहितीनुसार, एकेकाळी नागपुरात १० हजारावर पॉवरलूम होते. आता साडेतीन हजारच राहिले आहेत. नागपुरात प्रिंट युनिटसारखी सुविधा नाही. त्यामुळे विणकरांचा विकास खुंटला आहे. येथील प्रिंटेड साड्या, कपड्यांना मागणी आहे. मात्र येथे तयार होणाऱ्या साड्या प्रिंटेड नसल्याने स्थानिक बाजारात टिकत नाही. त्यामुळे नाईलाजाने कमी भावात पश्चिम महाराष्ट्र, छत्तीसगड आदी बाजारपेठेत विकाव्या लागतात. मुंबई आणि अहमदाबादच्या धर्तीवर नागपुरातील कारागिरांच्या कौशल्याचा विकास करण्याची योजना सरकारने आखली तर कौशल्य टिकून राहील आणि व्यवसायाला बळ मिळेल.

...

बजेटमध्ये विचारच नाही

ऑल महाराष्ट्र पॉवरलूम विणकर कृती समितीचे अध्यक्ष अध्यक्ष निजामुद्दीन अन्सारी म्हणाले, नागपुरात स्थिती बिकट आहे. मात्र स्किल इंडियाची घोषणा देणाऱ्या सरकारला याची जाणीव नाही. कारागिरांच्या कौशल्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. बजेटमध्ये तरतूद असायला हवी होती. मात्र एक छदामही दिला नाही. सहा वर्षापूर्वीच्या सरकारच्या काळात तरी बरी स्थिती होती. बऱ्याच सुविधा आणि योजना होत्या. आज विणकरांच्या आरोग्यासाठीही योजना नाहीत. मुलांच्या शिक्षणासाठीही सरकारकडून तरतूद नाही.