शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

अनलॉकच्या काळात विणकर लॉकडाऊनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

रियाज अहमद नागपूर : सरकार एकीकडे स्किल इंडियावर बराच भर देत आहे. मात्र दुसरीकडे पारंपरिक कौशल्य असलेल्या विणकरांकडे मात्र ...

रियाज अहमद

नागपूर : सरकार एकीकडे स्किल इंडियावर बराच भर देत आहे. मात्र दुसरीकडे पारंपरिक कौशल्य असलेल्या विणकरांकडे मात्र सरकारचे लक्ष नाही. या दुर्लक्षपणामुळे या कारागिरांवर सध्याच्या अनलॉकच्या काळात लॉकडाऊनसारखी स्थिती ओढवली आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात लावण्यात आलेल्या टाळेबंदीतून आता कुठे नागरिक हळूहळू सावरायला लागले आहेत. मात्र विणकरांचा व्यवसाय ठप्प पडल्याने अवस्था वाईट आहे. विणकरांच्या व्यवसायात आता पॉवरलूमच उरले आहे. परंतु अनेक पॉवरलूम बंद पडले आहेत. बाजारात कच्चा मालही अधिक भावाने मिळत आहे. परंतु मालाला योग्य भाव मिळत नसल्याने व्यवसाय मंदावला आहे.

नागपुरातील पॉवरलूमवर प्रामुख्याने नऊ मीटर लांबीचे धोतर, महाराष्ट्रीयन साडी, सहावारी गोल साडी, आणि सात मीटरची छत्तीसगडी साडी तयार केली जाते. साडी बनविण्यासाठी धागा, रंग यासह अनेक प्रकारचा कच्चा माल लागतो. त्याच्या किमती वाढल्याने साडीच्या किमती महागल्या आहेत. मात्र गुंतवणूक खर्चही निघत नाही, अशी अवस्था आहे. स्वत: चालकच मालक असल्याने साडी स्वत:च विकावी लागत आहे, अन्यथा नाईलाजाने पॉवरलूम बंद करावा लागत आहे. यापूर्वी एका कारागिराच्या भरवशावर दोन पॉवरलूम चालायचे. आता एकाच्या भरवशावर तीन ते चार पॉवरलूम चालविले जातात. कारण मिळकत कमी होत असल्याने कामावरून कामगार कमी झाले आहेत.

...

प्रिंट युनिट नसल्याने व्यवसाय धोक्यात

केंद्र सरकारच्या ऑल इंडिया पॉवरलूम बोर्डाचे माजी संचालक इरफान कमर यांच्या माहितीनुसार, एकेकाळी नागपुरात १० हजारावर पॉवरलूम होते. आता साडेतीन हजारच राहिले आहेत. नागपुरात प्रिंट युनिटसारखी सुविधा नाही. त्यामुळे विणकरांचा विकास खुंटला आहे. येथील प्रिंटेड साड्या, कपड्यांना मागणी आहे. मात्र येथे तयार होणाऱ्या साड्या प्रिंटेड नसल्याने स्थानिक बाजारात टिकत नाही. त्यामुळे नाईलाजाने कमी भावात पश्चिम महाराष्ट्र, छत्तीसगड आदी बाजारपेठेत विकाव्या लागतात. मुंबई आणि अहमदाबादच्या धर्तीवर नागपुरातील कारागिरांच्या कौशल्याचा विकास करण्याची योजना सरकारने आखली तर कौशल्य टिकून राहील आणि व्यवसायाला बळ मिळेल.

...

बजेटमध्ये विचारच नाही

ऑल महाराष्ट्र पॉवरलूम विणकर कृती समितीचे अध्यक्ष अध्यक्ष निजामुद्दीन अन्सारी म्हणाले, नागपुरात स्थिती बिकट आहे. मात्र स्किल इंडियाची घोषणा देणाऱ्या सरकारला याची जाणीव नाही. कारागिरांच्या कौशल्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. बजेटमध्ये तरतूद असायला हवी होती. मात्र एक छदामही दिला नाही. सहा वर्षापूर्वीच्या सरकारच्या काळात तरी बरी स्थिती होती. बऱ्याच सुविधा आणि योजना होत्या. आज विणकरांच्या आरोग्यासाठीही योजना नाहीत. मुलांच्या शिक्षणासाठीही सरकारकडून तरतूद नाही.