शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

हातमाग उद्योगाला केंद्राची मदत मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:40 IST

हातमाग उद्योगामध्ये शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्याची तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीची क्षमता आहे.

ठळक मुद्देउमा भारती : आचार्य विद्यासागरजी महाराज यांची रामटेकमध्ये घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : हातमाग उद्योगामध्ये शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्याची तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. त्यामुळे हातमाग उद्योगाला केंद्राची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय पेयजल मंत्री उमा भारती यांनी दिले. रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची सोमवारी (दि. २३) उमा भारती यांनी भेट घेत चर्चा केली. यावेळी त्या बोलत होत्या.आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांच्याशी उमा भारती यांनी १५ मिनिटे चर्चा केली. यावेळी आचार्यांना आश्वस्त करताना उमा भारती यांनी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्याशी चर्चा करून हातमाग उद्योगाला केंद्राकडून गती देण्याचा प्रयत्न करू तसेच मदत मिळवून देऊ, असे सांगितले. मध्यप्रदेशातील उद्योगाची माहिती त्यांना यावेळी देण्यात आली.आचार्य विद्यासागरजी महाराज म्हणाले, हातमागाच्या कापड निर्मितीतून मोठ्या प्रमाणात रोजगाराची समस्या सोडविली जाऊ शकते. सोबतच शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी हा उद्योग हातभार लावेल. ग्रामस्थांनी त्यांच्या शेतातून पिकविलेल्या कापसाचा धागा बनवावा, हा धागा हातमाग उद्योग खरेदी करेल. घरातील शेतकरी, शेतमजूर आणि त्यांच्या परिवारातीलल सर्व सदस्यांना काम मिळेल. या माध्यमातून भारताच्या ग्रामीण भागात सुवर्ण भूतकाळ परत येईल, देशाची आर्थिक स्थिती सुधारेल. कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय तयार होत असलेल्या हातमागावरील कापड हे सर्वोत्तम असल्याचे आचार्य विद्यासागरजी यांनी उमा भारती यांना चर्चेदरम्यान सांगितले.इंग्रजांनी सर्वात आधी कापड उद्योगातून भारताची लूट केली. आज हजारो मिल्सच्या माध्यमातून देशाचा पैसा विदेशात जातो आहे. हा पैसा देशात थांबविण्याचा हातमाग हा चांगला पर्याय आहे. हाताला काम नसलेला तरुण अनैतिक कामांत, चोरीसारख्या कामात अग्रेसर झाला आहे. या युवाशक्तीला योग्य संस्कार आणि श्रमप्रतिष्ठा दिली तर अराजकताही कमी होऊ शकेल, असा आशावाद आचार्यश्रींनी व्यक्त केला.आचार्यांनी उमा भारती आणि त्यांच्या मंत्रालयाने हाती घेतलेल्या गंगा नदी शुद्धीकरणाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. स्वच्छ पाणी, स्वच्छ वातावरण, सामाजिक आणि मनाची शुद्धता याकरिता शुद्ध संस्कारांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. यावर उमा भारती यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत चर्चा करून हातमाग आणि युवक कल्याणार्थ प्रयत्न करू, असे आचार्यांना आश्वस्त केले.विविध विषयांवर चर्चाप्रत्येकाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण स्थान आहे. आज मी जे काही आहे ही गुरुकृपा असल्याचे उमा भारती यांनी यावेळी सांगितले. आचार्यांनी इंडियाऐवजी भारत म्हणा, गोवध बंदी करा, गोवंश वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्या यासोबतच आणखीही काही विषयांवर चर्चा केली. ‘बेटी बचाव’साठी या परिसरात ‘प्रतिभास्थळी’ विद्यार्थिनींची निवासी सीबीएससी शाळा सुरू केली असून येथे शिक्षणासोबत संस्कार दिले जात असल्याचे आचार्यश्री विद्यासागरजी महाराज म्हणाले.