शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

हातमाग उद्योगाला केंद्राची मदत मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:40 IST

हातमाग उद्योगामध्ये शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्याची तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीची क्षमता आहे.

ठळक मुद्देउमा भारती : आचार्य विद्यासागरजी महाराज यांची रामटेकमध्ये घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : हातमाग उद्योगामध्ये शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्याची तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. त्यामुळे हातमाग उद्योगाला केंद्राची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय पेयजल मंत्री उमा भारती यांनी दिले. रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची सोमवारी (दि. २३) उमा भारती यांनी भेट घेत चर्चा केली. यावेळी त्या बोलत होत्या.आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांच्याशी उमा भारती यांनी १५ मिनिटे चर्चा केली. यावेळी आचार्यांना आश्वस्त करताना उमा भारती यांनी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्याशी चर्चा करून हातमाग उद्योगाला केंद्राकडून गती देण्याचा प्रयत्न करू तसेच मदत मिळवून देऊ, असे सांगितले. मध्यप्रदेशातील उद्योगाची माहिती त्यांना यावेळी देण्यात आली.आचार्य विद्यासागरजी महाराज म्हणाले, हातमागाच्या कापड निर्मितीतून मोठ्या प्रमाणात रोजगाराची समस्या सोडविली जाऊ शकते. सोबतच शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी हा उद्योग हातभार लावेल. ग्रामस्थांनी त्यांच्या शेतातून पिकविलेल्या कापसाचा धागा बनवावा, हा धागा हातमाग उद्योग खरेदी करेल. घरातील शेतकरी, शेतमजूर आणि त्यांच्या परिवारातीलल सर्व सदस्यांना काम मिळेल. या माध्यमातून भारताच्या ग्रामीण भागात सुवर्ण भूतकाळ परत येईल, देशाची आर्थिक स्थिती सुधारेल. कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय तयार होत असलेल्या हातमागावरील कापड हे सर्वोत्तम असल्याचे आचार्य विद्यासागरजी यांनी उमा भारती यांना चर्चेदरम्यान सांगितले.इंग्रजांनी सर्वात आधी कापड उद्योगातून भारताची लूट केली. आज हजारो मिल्सच्या माध्यमातून देशाचा पैसा विदेशात जातो आहे. हा पैसा देशात थांबविण्याचा हातमाग हा चांगला पर्याय आहे. हाताला काम नसलेला तरुण अनैतिक कामांत, चोरीसारख्या कामात अग्रेसर झाला आहे. या युवाशक्तीला योग्य संस्कार आणि श्रमप्रतिष्ठा दिली तर अराजकताही कमी होऊ शकेल, असा आशावाद आचार्यश्रींनी व्यक्त केला.आचार्यांनी उमा भारती आणि त्यांच्या मंत्रालयाने हाती घेतलेल्या गंगा नदी शुद्धीकरणाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. स्वच्छ पाणी, स्वच्छ वातावरण, सामाजिक आणि मनाची शुद्धता याकरिता शुद्ध संस्कारांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. यावर उमा भारती यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत चर्चा करून हातमाग आणि युवक कल्याणार्थ प्रयत्न करू, असे आचार्यांना आश्वस्त केले.विविध विषयांवर चर्चाप्रत्येकाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण स्थान आहे. आज मी जे काही आहे ही गुरुकृपा असल्याचे उमा भारती यांनी यावेळी सांगितले. आचार्यांनी इंडियाऐवजी भारत म्हणा, गोवध बंदी करा, गोवंश वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्या यासोबतच आणखीही काही विषयांवर चर्चा केली. ‘बेटी बचाव’साठी या परिसरात ‘प्रतिभास्थळी’ विद्यार्थिनींची निवासी सीबीएससी शाळा सुरू केली असून येथे शिक्षणासोबत संस्कार दिले जात असल्याचे आचार्यश्री विद्यासागरजी महाराज म्हणाले.