शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
4
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
5
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
6
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
7
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
8
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
9
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
10
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
11
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
12
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
13
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
14
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
15
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
16
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
17
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
18
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
19
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
20
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 

जलसंकट निसर्गनिर्मित नव्हे तर मानवनिर्मित

By admin | Updated: May 24, 2016 02:47 IST

देशातील अनेक राज्यात सध्या जलसंकट निर्माण झाले असून, पाण्याचे संकट हे निसर्गनिर्मित नसून..

गिरीश गांधी : रोहणा येथे ७० गॅबियन बंधाऱ्यांच्या कामाला प्रारंभकाटोल : देशातील अनेक राज्यात सध्या जलसंकट निर्माण झाले असून, पाण्याचे संकट हे निसर्गनिर्मित नसून ते सुल्तानी संकट असल्याचे प्रतिपादन वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी केले. नरखेड तालुक्यातील रोहणा येथे ७० गॅबियन बंधाऱ्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ. आशिष देशमुख, रूपाताई देशमुख, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, चरणसिंग ठाकूर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती उकेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे, पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे, नरखेड पंचायत समितीचे सभापती राजू हरणे, सुरेश आरघोडे, डॉ. प्रेरणा बारोकर, बबन लोहे, सुरेश खसारे, संध्या मानकर, रमेश फिस्के, इस्माईल बारुदवाले, मारोतराव बोरकर, दिलीप तिजारे, बालू ठाकूर, चंद्रशेखर देशमुख, प्रा. भाऊ भोगे यांची उपस्थिती होती.गिरीश गांधी पुढे म्हणाले, चांगल्या पर्यावरणासाठी ३३ टक्के जमीन ही जंगलव्याप्त असायला पाहिजे. भारतात ७५ दशलक्ष हेक्टरवर घनदाट जंगल होते, जे ११० दशलक्ष हेक्टर असायला पाहिजे होते. मात्र त्यामध्ये ६० वर्षांत वाढ झाली नाही. जमिनीची धूप थांबविणे महत्त्वाचे असून पाणी कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही, हे देखील विसरता कामा नये, असे विचार मांडले.आ.डॉ. आशिष देशमुख यांनी दरवर्षी पाण्याचा प्रश्न बिकट होत असून, महाराष्ट्रातील ३३ हजार गावांत दुष्काळ जाहीर करावा लागला. त्यामुळे आता प्रत्येक गावाला जलनीती तयार करून पाण्याचे आॅडिट करावे लागेल व गावाला किती पाणी लागेल याची माहिती करावी लागेल, असे स्पष्ट केले. माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त काटोल व नरखेड या दोन्ही तालुक्यात ७० गॅबियन बंधारे तयार करण्याचा संकल्प करण्यात आला होता. परंतु उपविभागीय अधिकारी कातडे यांनी गावातील कर्मचारी व गावकरी यांच्या माध्यमातून ३५० व चरणसिंग ठाकूर यांनी ५० बंधारे बांधून देण्याचा संकल्प केल्याने ५०० बंधारे जुलै महिन्यापूर्वी पूर्ण करण्याचे आ.डॉ. आशिष देशमुख यांनी जाहीर केले. प्रास्ताविक दिनकर राऊत यांनी केले. संचालन प्राचार्य डॉ. विजय धोटे यांनी तर आभार उकेश चव्हाण यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)