शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

जलसंकट निसर्गनिर्मित नव्हे तर मानवनिर्मित

By admin | Updated: May 24, 2016 02:47 IST

देशातील अनेक राज्यात सध्या जलसंकट निर्माण झाले असून, पाण्याचे संकट हे निसर्गनिर्मित नसून..

गिरीश गांधी : रोहणा येथे ७० गॅबियन बंधाऱ्यांच्या कामाला प्रारंभकाटोल : देशातील अनेक राज्यात सध्या जलसंकट निर्माण झाले असून, पाण्याचे संकट हे निसर्गनिर्मित नसून ते सुल्तानी संकट असल्याचे प्रतिपादन वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी केले. नरखेड तालुक्यातील रोहणा येथे ७० गॅबियन बंधाऱ्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ. आशिष देशमुख, रूपाताई देशमुख, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, चरणसिंग ठाकूर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती उकेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे, पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे, नरखेड पंचायत समितीचे सभापती राजू हरणे, सुरेश आरघोडे, डॉ. प्रेरणा बारोकर, बबन लोहे, सुरेश खसारे, संध्या मानकर, रमेश फिस्के, इस्माईल बारुदवाले, मारोतराव बोरकर, दिलीप तिजारे, बालू ठाकूर, चंद्रशेखर देशमुख, प्रा. भाऊ भोगे यांची उपस्थिती होती.गिरीश गांधी पुढे म्हणाले, चांगल्या पर्यावरणासाठी ३३ टक्के जमीन ही जंगलव्याप्त असायला पाहिजे. भारतात ७५ दशलक्ष हेक्टरवर घनदाट जंगल होते, जे ११० दशलक्ष हेक्टर असायला पाहिजे होते. मात्र त्यामध्ये ६० वर्षांत वाढ झाली नाही. जमिनीची धूप थांबविणे महत्त्वाचे असून पाणी कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही, हे देखील विसरता कामा नये, असे विचार मांडले.आ.डॉ. आशिष देशमुख यांनी दरवर्षी पाण्याचा प्रश्न बिकट होत असून, महाराष्ट्रातील ३३ हजार गावांत दुष्काळ जाहीर करावा लागला. त्यामुळे आता प्रत्येक गावाला जलनीती तयार करून पाण्याचे आॅडिट करावे लागेल व गावाला किती पाणी लागेल याची माहिती करावी लागेल, असे स्पष्ट केले. माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त काटोल व नरखेड या दोन्ही तालुक्यात ७० गॅबियन बंधारे तयार करण्याचा संकल्प करण्यात आला होता. परंतु उपविभागीय अधिकारी कातडे यांनी गावातील कर्मचारी व गावकरी यांच्या माध्यमातून ३५० व चरणसिंग ठाकूर यांनी ५० बंधारे बांधून देण्याचा संकल्प केल्याने ५०० बंधारे जुलै महिन्यापूर्वी पूर्ण करण्याचे आ.डॉ. आशिष देशमुख यांनी जाहीर केले. प्रास्ताविक दिनकर राऊत यांनी केले. संचालन प्राचार्य डॉ. विजय धोटे यांनी तर आभार उकेश चव्हाण यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)