शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

७०२ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: February 5, 2015 01:08 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ७०२ गावांत पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. टंचाईग्रस्त गावांत तातडीने उपायोजना हाती घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर

जि. प. अध्यक्षांचे निर्देश : ११५६ उपाययोजना राबवानागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ७०२ गावांत पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. टंचाईग्रस्त गावांत तातडीने उपायोजना हाती घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी बुधवारी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत दिले. टंचाईग्रस्त ७०२ गावांत ११५६ उपययोजना राबविण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने सात कोटींचा आराखडा तयार केला आहे. जिल्हा प्रशासनसाने तो मंजुरीसाठी सरकारकडे पाठविला आहे. यात २१८ नळ योजनांची दुरुस्ती, २४२ विंधन विहिरी, २८५ खासगी विहिरी अधिग्रहण, ४० टँकरव्दारे पाणीपुरवठा आदी कामांचा समावेश असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत हिंगणा तालुक्यातील वागधरा येथील योजनेवर १ कोटी ८ लाख, रामटेक तालुक्यातील पटगोवरी येथे ७० लाख तर काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथील योजनेवर ५७ लाखांचा खर्च करण्याला मंजुरी देण्यात आली. मौदा तालुक्यातील पावजदवना येथील परमात्मा सेवक मंडळाची पाणी टाकी, तसेच मारोडी येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. गरज भासल्यास टंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. जि.प.ने चार वर्षांपूर्वी १२ टिप्पर व ६ पोकलँन्ड खरेदी केले होते. परंतु ही यंत्रसामुग्री वापराविना पडून आहे. काही तालुक्यात राजकीय नेत्याकडून याचा वापर होत आहे. या यंत्रसामुग्रीचा वापर जिल्ह्यातील तलाव व बंधाऱ्यांतील गाळ काढण्यासाठी करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले. यातून सिंचन क्षमतेत वाढ होणार असल्याची माहिती सावरकर यांनी दिली. बैठकीला उपाध्यक्ष शरद डोणेकर, उकेश चव्हाण, सभापती आशा गायकवाड, पुष्पा वाघाडे, दिपक गेडाम यांच्यासह पाणीपुरवठा व सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)