शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

७०२ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: February 5, 2015 01:08 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ७०२ गावांत पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. टंचाईग्रस्त गावांत तातडीने उपायोजना हाती घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर

जि. प. अध्यक्षांचे निर्देश : ११५६ उपाययोजना राबवानागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ७०२ गावांत पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. टंचाईग्रस्त गावांत तातडीने उपायोजना हाती घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी बुधवारी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत दिले. टंचाईग्रस्त ७०२ गावांत ११५६ उपययोजना राबविण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने सात कोटींचा आराखडा तयार केला आहे. जिल्हा प्रशासनसाने तो मंजुरीसाठी सरकारकडे पाठविला आहे. यात २१८ नळ योजनांची दुरुस्ती, २४२ विंधन विहिरी, २८५ खासगी विहिरी अधिग्रहण, ४० टँकरव्दारे पाणीपुरवठा आदी कामांचा समावेश असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत हिंगणा तालुक्यातील वागधरा येथील योजनेवर १ कोटी ८ लाख, रामटेक तालुक्यातील पटगोवरी येथे ७० लाख तर काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथील योजनेवर ५७ लाखांचा खर्च करण्याला मंजुरी देण्यात आली. मौदा तालुक्यातील पावजदवना येथील परमात्मा सेवक मंडळाची पाणी टाकी, तसेच मारोडी येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. गरज भासल्यास टंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. जि.प.ने चार वर्षांपूर्वी १२ टिप्पर व ६ पोकलँन्ड खरेदी केले होते. परंतु ही यंत्रसामुग्री वापराविना पडून आहे. काही तालुक्यात राजकीय नेत्याकडून याचा वापर होत आहे. या यंत्रसामुग्रीचा वापर जिल्ह्यातील तलाव व बंधाऱ्यांतील गाळ काढण्यासाठी करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले. यातून सिंचन क्षमतेत वाढ होणार असल्याची माहिती सावरकर यांनी दिली. बैठकीला उपाध्यक्ष शरद डोणेकर, उकेश चव्हाण, सभापती आशा गायकवाड, पुष्पा वाघाडे, दिपक गेडाम यांच्यासह पाणीपुरवठा व सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)