शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

पाणीटंचाईचा आराखडा २० कोटींवर

By admin | Updated: April 23, 2015 02:28 IST

पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ८१९ गावांचा समावेश करण्यात आला होता.

नागपूर : पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ८१९ गावांचा समावेश करण्यात आला होता. परंतु उन्हाळ्यातील टंचाईची तीव्रता लक्षात घेता अतिरिक्त टंचाई आराखड्यात ७८२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या १६०१ पर्यंत पोहचली असून कृती आराखडा ७ कोटीवरून २० कोटींवर गेला आहे.आॅक्टोबर २०१४ ते एप्रिल २०१५ संभाव्य टंचाईग्रस्त ८१९ गावांसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यात ११५६ उपाययोजनांचा समावेश होता. परंतु मे व जून महिन्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या विचारात घेता जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने १३ कोटींचा १८३१ उपाययोजनांचा अतिरिक्त आराखडा तयार केला आहे. जिल्हा प्रशासनाने या आराखड्याला मंजुरी दिली आहे. अतिरक्त आराखड्यात १०५१ विंधन विहिरी, ५४३ विंधन विहिरींची दुरुस्ती, १२७ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, १० टँकरद्वारे पाणीपुरवठा, ४८ विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे, ४१ खासगी विहिरींचे अधिग्रहण, आदी कामांचा समावेश यात आहे. नवीन विंधन विहिरीसाठी ९.२३ कोटी, नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी १.२७ कोटी, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी ७६ लाख व विहीर खोलीकरणासाठी ३८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जलस्रोत नसलेल्या टंचाईग्रस्त गावातील लोकांना पाणी मिळावे, यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. आॅक्टोबर महिन्यात टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु मे व जून महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता विचारात घेता हा अतिरिक्त आराखडा तयार करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)