शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पाणीटंचाईचा आराखडा २० कोटींवर

By admin | Updated: April 23, 2015 02:28 IST

पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ८१९ गावांचा समावेश करण्यात आला होता.

नागपूर : पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ८१९ गावांचा समावेश करण्यात आला होता. परंतु उन्हाळ्यातील टंचाईची तीव्रता लक्षात घेता अतिरिक्त टंचाई आराखड्यात ७८२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या १६०१ पर्यंत पोहचली असून कृती आराखडा ७ कोटीवरून २० कोटींवर गेला आहे.आॅक्टोबर २०१४ ते एप्रिल २०१५ संभाव्य टंचाईग्रस्त ८१९ गावांसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यात ११५६ उपाययोजनांचा समावेश होता. परंतु मे व जून महिन्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या विचारात घेता जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने १३ कोटींचा १८३१ उपाययोजनांचा अतिरिक्त आराखडा तयार केला आहे. जिल्हा प्रशासनाने या आराखड्याला मंजुरी दिली आहे. अतिरक्त आराखड्यात १०५१ विंधन विहिरी, ५४३ विंधन विहिरींची दुरुस्ती, १२७ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, १० टँकरद्वारे पाणीपुरवठा, ४८ विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे, ४१ खासगी विहिरींचे अधिग्रहण, आदी कामांचा समावेश यात आहे. नवीन विंधन विहिरीसाठी ९.२३ कोटी, नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी १.२७ कोटी, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी ७६ लाख व विहीर खोलीकरणासाठी ३८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जलस्रोत नसलेल्या टंचाईग्रस्त गावातील लोकांना पाणी मिळावे, यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. आॅक्टोबर महिन्यात टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु मे व जून महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता विचारात घेता हा अतिरिक्त आराखडा तयार करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)