शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

पाणीटंचाईचा आराखडा २० कोटींवर

By admin | Updated: April 23, 2015 02:28 IST

पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ८१९ गावांचा समावेश करण्यात आला होता.

नागपूर : पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ८१९ गावांचा समावेश करण्यात आला होता. परंतु उन्हाळ्यातील टंचाईची तीव्रता लक्षात घेता अतिरिक्त टंचाई आराखड्यात ७८२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या १६०१ पर्यंत पोहचली असून कृती आराखडा ७ कोटीवरून २० कोटींवर गेला आहे.आॅक्टोबर २०१४ ते एप्रिल २०१५ संभाव्य टंचाईग्रस्त ८१९ गावांसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यात ११५६ उपाययोजनांचा समावेश होता. परंतु मे व जून महिन्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या विचारात घेता जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने १३ कोटींचा १८३१ उपाययोजनांचा अतिरिक्त आराखडा तयार केला आहे. जिल्हा प्रशासनाने या आराखड्याला मंजुरी दिली आहे. अतिरक्त आराखड्यात १०५१ विंधन विहिरी, ५४३ विंधन विहिरींची दुरुस्ती, १२७ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, १० टँकरद्वारे पाणीपुरवठा, ४८ विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे, ४१ खासगी विहिरींचे अधिग्रहण, आदी कामांचा समावेश यात आहे. नवीन विंधन विहिरीसाठी ९.२३ कोटी, नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी १.२७ कोटी, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी ७६ लाख व विहीर खोलीकरणासाठी ३८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जलस्रोत नसलेल्या टंचाईग्रस्त गावातील लोकांना पाणी मिळावे, यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. आॅक्टोबर महिन्यात टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु मे व जून महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता विचारात घेता हा अतिरिक्त आराखडा तयार करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)