शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

टंचाईत पाणी महाग!

By admin | Updated: June 8, 2016 02:19 IST

शहरालगतच्या भागाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या भागात तीव्र पाणीटंचाई आहे. बहुसंख्य

नागपूर : शहरालगतच्या भागाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या भागात तीव्र पाणीटंचाई आहे. बहुसंख्य वस्त्यांत नळाचे नेटवर्क नाही. टँकरनेही नियमित पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही पाणीपट्टीत ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. १ मार्च २००९ च्या शासनाच्या निर्णयानुसार नागपूर शहरातील पाणीपट्टी व दर मूल्यांकनाचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. त्यानुसार पाणीपट्टीत दरवर्षी वाढ केली जाते. २०१६ या वर्षासाठी १ एप्रिलपासून पाणीपट्टीत ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु शहरालगतच्या भागात नळाचे नेटवर्क नसलेल्या भागाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. टंचाईग्रस्त भागाला टँकरद्वारे पाणी उपलब्ध करणे अपेक्षित आहे. परंतु काही वस्त्यांना दिवसाआड तर काही भागात दोन दिवसातून एकदा पाणी मिळते. उन्हाळ्याच्या दिवसात विहिरी आटल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. परंतु मागणी करूनही वेळेवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. महापालिके त समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर, नरसाळा तसेच बेसा, बेलतरोडी, भरतवाडा, पुनापूर, पारडी, हिवरीनगर, रमना मारोती, ताजबाग, दिघोरी, मानेवाडा, जोगीनगर, भांडेवाडी, वाठोडा, नारा, नारी, झिंगाबाई टाकळीचा काही भाग, गोरेवाडा आदी भागातील अनेक वस्त्यांत पाणीटंचाई आहे. नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. असे असतानाही पाणी दरवाढ शहरातील सर्व भागाला सरसकट लागू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)शहरातील १९०० व ५७२ लेआऊ टमधील नागरिकांना नासुप्रकडे विकास शुल्क जमा केले आहे. काही भागातील नागरिकांनी १५ ते २० वर्षांपूर्वी विकास शुल्क जमा केले असतानाही अद्याप या भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनधिकृत वस्त्या असल्याने महापालिकेलाही या भागात विकास कामे करता आलेली नाही. वस्त्या नियमित करण्यात आल्यानंतरही या भागातील लोकप्रतिनिधींचा प्रामुख्याने रस्त्यांच्या कामावर जोर असून आवश्यक मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष असल्याने पाणीटंचाईला लोकांना सामोरे जावे लागत आहे.