शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

टंचाईत पाणी महाग!

By admin | Updated: June 8, 2016 02:19 IST

शहरालगतच्या भागाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या भागात तीव्र पाणीटंचाई आहे. बहुसंख्य

नागपूर : शहरालगतच्या भागाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. या भागात तीव्र पाणीटंचाई आहे. बहुसंख्य वस्त्यांत नळाचे नेटवर्क नाही. टँकरनेही नियमित पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही पाणीपट्टीत ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. १ मार्च २००९ च्या शासनाच्या निर्णयानुसार नागपूर शहरातील पाणीपट्टी व दर मूल्यांकनाचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. त्यानुसार पाणीपट्टीत दरवर्षी वाढ केली जाते. २०१६ या वर्षासाठी १ एप्रिलपासून पाणीपट्टीत ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु शहरालगतच्या भागात नळाचे नेटवर्क नसलेल्या भागाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. टंचाईग्रस्त भागाला टँकरद्वारे पाणी उपलब्ध करणे अपेक्षित आहे. परंतु काही वस्त्यांना दिवसाआड तर काही भागात दोन दिवसातून एकदा पाणी मिळते. उन्हाळ्याच्या दिवसात विहिरी आटल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. परंतु मागणी करूनही वेळेवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. महापालिके त समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर, नरसाळा तसेच बेसा, बेलतरोडी, भरतवाडा, पुनापूर, पारडी, हिवरीनगर, रमना मारोती, ताजबाग, दिघोरी, मानेवाडा, जोगीनगर, भांडेवाडी, वाठोडा, नारा, नारी, झिंगाबाई टाकळीचा काही भाग, गोरेवाडा आदी भागातील अनेक वस्त्यांत पाणीटंचाई आहे. नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. असे असतानाही पाणी दरवाढ शहरातील सर्व भागाला सरसकट लागू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)शहरातील १९०० व ५७२ लेआऊ टमधील नागरिकांना नासुप्रकडे विकास शुल्क जमा केले आहे. काही भागातील नागरिकांनी १५ ते २० वर्षांपूर्वी विकास शुल्क जमा केले असतानाही अद्याप या भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनधिकृत वस्त्या असल्याने महापालिकेलाही या भागात विकास कामे करता आलेली नाही. वस्त्या नियमित करण्यात आल्यानंतरही या भागातील लोकप्रतिनिधींचा प्रामुख्याने रस्त्यांच्या कामावर जोर असून आवश्यक मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष असल्याने पाणीटंचाईला लोकांना सामोरे जावे लागत आहे.