शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
6
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
7
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
8
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
9
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
10
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
11
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
12
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
13
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
14
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
15
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
16
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
17
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
18
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
19
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
20
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?

आंभाेरा उपसा सिंचन याेजनेचे पाणी साेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : परिसरात धान राेवणी व पिकांसाठी याेग्य असा पाऊस अद्यापही झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वेलतूर : परिसरात धान राेवणी व पिकांसाठी याेग्य असा पाऊस अद्यापही झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सिंचनासाठी पाणी साेडण्यात यावे, यासाठी शेतकरी आंभाेरा उपसा सिंचन याेजना कार्यालयाचे हेलपाटे मारत आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता सिद्धार्थ वाहने यांच्याकडे नुकतेच निवेदन साेपविले. दाेन-तीन दिवसात पाणी न साेडल्यास उपसा सिंचन याेजनेच्या कार्यालयासमाेर धरणे आंदाेलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून आंभाेरा उपसा सिंचन याेजना २००५ पासून कार्यान्वित करण्यात आली. या याेजनेद्वारे दरवर्षी पाणी उपलब्ध हाेत असल्याने या भागातील शेतकरी खरीप हंगामात धान व साेयाबीन पीक घेतात; परंतु आता जलसंपदा विभाग आंभाेरा उपसा सिंचन याेजनेत शेतकऱ्यांनी आधी थकबाकी भरावी, अशी सूचना गावागावांत दवंडीद्वारे देत आहे. एकीकडे काेराेनामुळे सर्वत्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरीसुद्धा अडचणीत आहेत. अशावेळी शेतकरी थकबाकी भरणार कशी, हा प्रश्नच आहे.

वेलतूर, बाेथली, गाेन्हा, चिखली, तुडका, ताराेली, शिकारपूर, फेगड, रेंगातूर, पचखेडी, खैरलांजी, मदनापूर, किन्ही, शिवनी, परसाेडी, बाेरी आदी गावांतील शेतकऱ्यांसाठी ही उपसा सिंचन याेजना वरदान ठरली आहे. परंतु प्रशासनाच्या हेकेखाेर धाेरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता, जलसंपदा विभागाने पिकांच्या ओलितासाठी तत्काळ पाणी साेडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, जि. प. सदस्य कविता साखरवाडे, माजी सरपंच प्रभाकर चौधरी, ज्ञानिवंत साखरवाडे, राजू चाैधरी, उमेश महाकाळकर, हरिदास लुटे, राजेंद्र कावळे, राजू लिमजे आदींसह शेतकरी उपस्थित हाेते.

...

दरवर्षी पाणी मिळते, मग यंदा का नाही?

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दरवर्षी पाणी मिळते, मग यंदा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत यामध्ये वरिष्ठ अधिकारी राजकारण करीत असल्याचा गंभीर आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहायक अभियंत्यांना पाणी न साेडण्याबाबत ताेंडी सूचना दिल्या असल्याने स्थानिक अभियंता पाणी साेडू शकत नाही. म्हणजेच वरिष्ठ स्तरावरूनच पाणी न साेडण्यासाठी षडयंत्र असल्याचे जाणकारांचे मत आहे. आंभाेरा उपसा सिंचन याेजनेकडे दुर्लक्ष करून सिंचनासाठी पाणी साेडण्यास टाळाटाळ केली जात आहे.