शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

आंभाेरा उपसा सिंचन याेजनेचे पाणी साेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : परिसरात धान राेवणी व पिकांसाठी याेग्य असा पाऊस अद्यापही झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वेलतूर : परिसरात धान राेवणी व पिकांसाठी याेग्य असा पाऊस अद्यापही झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सिंचनासाठी पाणी साेडण्यात यावे, यासाठी शेतकरी आंभाेरा उपसा सिंचन याेजना कार्यालयाचे हेलपाटे मारत आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता सिद्धार्थ वाहने यांच्याकडे नुकतेच निवेदन साेपविले. दाेन-तीन दिवसात पाणी न साेडल्यास उपसा सिंचन याेजनेच्या कार्यालयासमाेर धरणे आंदाेलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून आंभाेरा उपसा सिंचन याेजना २००५ पासून कार्यान्वित करण्यात आली. या याेजनेद्वारे दरवर्षी पाणी उपलब्ध हाेत असल्याने या भागातील शेतकरी खरीप हंगामात धान व साेयाबीन पीक घेतात; परंतु आता जलसंपदा विभाग आंभाेरा उपसा सिंचन याेजनेत शेतकऱ्यांनी आधी थकबाकी भरावी, अशी सूचना गावागावांत दवंडीद्वारे देत आहे. एकीकडे काेराेनामुळे सर्वत्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरीसुद्धा अडचणीत आहेत. अशावेळी शेतकरी थकबाकी भरणार कशी, हा प्रश्नच आहे.

वेलतूर, बाेथली, गाेन्हा, चिखली, तुडका, ताराेली, शिकारपूर, फेगड, रेंगातूर, पचखेडी, खैरलांजी, मदनापूर, किन्ही, शिवनी, परसाेडी, बाेरी आदी गावांतील शेतकऱ्यांसाठी ही उपसा सिंचन याेजना वरदान ठरली आहे. परंतु प्रशासनाच्या हेकेखाेर धाेरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता, जलसंपदा विभागाने पिकांच्या ओलितासाठी तत्काळ पाणी साेडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, जि. प. सदस्य कविता साखरवाडे, माजी सरपंच प्रभाकर चौधरी, ज्ञानिवंत साखरवाडे, राजू चाैधरी, उमेश महाकाळकर, हरिदास लुटे, राजेंद्र कावळे, राजू लिमजे आदींसह शेतकरी उपस्थित हाेते.

...

दरवर्षी पाणी मिळते, मग यंदा का नाही?

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दरवर्षी पाणी मिळते, मग यंदा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत यामध्ये वरिष्ठ अधिकारी राजकारण करीत असल्याचा गंभीर आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहायक अभियंत्यांना पाणी न साेडण्याबाबत ताेंडी सूचना दिल्या असल्याने स्थानिक अभियंता पाणी साेडू शकत नाही. म्हणजेच वरिष्ठ स्तरावरूनच पाणी न साेडण्यासाठी षडयंत्र असल्याचे जाणकारांचे मत आहे. आंभाेरा उपसा सिंचन याेजनेकडे दुर्लक्ष करून सिंचनासाठी पाणी साेडण्यास टाळाटाळ केली जात आहे.