शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

आंभाेरा उपसा सिंचन याेजनेचे पाणी साेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : परिसरात धान राेवणी व पिकांसाठी याेग्य असा पाऊस अद्यापही झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वेलतूर : परिसरात धान राेवणी व पिकांसाठी याेग्य असा पाऊस अद्यापही झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सिंचनासाठी पाणी साेडण्यात यावे, यासाठी शेतकरी आंभाेरा उपसा सिंचन याेजना कार्यालयाचे हेलपाटे मारत आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता सिद्धार्थ वाहने यांच्याकडे नुकतेच निवेदन साेपविले. दाेन-तीन दिवसात पाणी न साेडल्यास उपसा सिंचन याेजनेच्या कार्यालयासमाेर धरणे आंदाेलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून आंभाेरा उपसा सिंचन याेजना २००५ पासून कार्यान्वित करण्यात आली. या याेजनेद्वारे दरवर्षी पाणी उपलब्ध हाेत असल्याने या भागातील शेतकरी खरीप हंगामात धान व साेयाबीन पीक घेतात; परंतु आता जलसंपदा विभाग आंभाेरा उपसा सिंचन याेजनेत शेतकऱ्यांनी आधी थकबाकी भरावी, अशी सूचना गावागावांत दवंडीद्वारे देत आहे. एकीकडे काेराेनामुळे सर्वत्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरीसुद्धा अडचणीत आहेत. अशावेळी शेतकरी थकबाकी भरणार कशी, हा प्रश्नच आहे.

वेलतूर, बाेथली, गाेन्हा, चिखली, तुडका, ताराेली, शिकारपूर, फेगड, रेंगातूर, पचखेडी, खैरलांजी, मदनापूर, किन्ही, शिवनी, परसाेडी, बाेरी आदी गावांतील शेतकऱ्यांसाठी ही उपसा सिंचन याेजना वरदान ठरली आहे. परंतु प्रशासनाच्या हेकेखाेर धाेरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता, जलसंपदा विभागाने पिकांच्या ओलितासाठी तत्काळ पाणी साेडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, जि. प. सदस्य कविता साखरवाडे, माजी सरपंच प्रभाकर चौधरी, ज्ञानिवंत साखरवाडे, राजू चाैधरी, उमेश महाकाळकर, हरिदास लुटे, राजेंद्र कावळे, राजू लिमजे आदींसह शेतकरी उपस्थित हाेते.

...

दरवर्षी पाणी मिळते, मग यंदा का नाही?

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दरवर्षी पाणी मिळते, मग यंदा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत यामध्ये वरिष्ठ अधिकारी राजकारण करीत असल्याचा गंभीर आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहायक अभियंत्यांना पाणी न साेडण्याबाबत ताेंडी सूचना दिल्या असल्याने स्थानिक अभियंता पाणी साेडू शकत नाही. म्हणजेच वरिष्ठ स्तरावरूनच पाणी न साेडण्यासाठी षडयंत्र असल्याचे जाणकारांचे मत आहे. आंभाेरा उपसा सिंचन याेजनेकडे दुर्लक्ष करून सिंचनासाठी पाणी साेडण्यास टाळाटाळ केली जात आहे.