शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

आंभाेरा उपसा सिंचन याेजनेचे पाणी साेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : परिसरात धान राेवणी व पिकांसाठी याेग्य असा पाऊस अद्यापही झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वेलतूर : परिसरात धान राेवणी व पिकांसाठी याेग्य असा पाऊस अद्यापही झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सिंचनासाठी पाणी साेडण्यात यावे, यासाठी शेतकरी आंभाेरा उपसा सिंचन याेजना कार्यालयाचे हेलपाटे मारत आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता सिद्धार्थ वाहने यांच्याकडे नुकतेच निवेदन साेपविले. दाेन-तीन दिवसात पाणी न साेडल्यास उपसा सिंचन याेजनेच्या कार्यालयासमाेर धरणे आंदाेलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून आंभाेरा उपसा सिंचन याेजना २००५ पासून कार्यान्वित करण्यात आली. या याेजनेद्वारे दरवर्षी पाणी उपलब्ध हाेत असल्याने या भागातील शेतकरी खरीप हंगामात धान व साेयाबीन पीक घेतात; परंतु आता जलसंपदा विभाग आंभाेरा उपसा सिंचन याेजनेत शेतकऱ्यांनी आधी थकबाकी भरावी, अशी सूचना गावागावांत दवंडीद्वारे देत आहे. एकीकडे काेराेनामुळे सर्वत्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरीसुद्धा अडचणीत आहेत. अशावेळी शेतकरी थकबाकी भरणार कशी, हा प्रश्नच आहे.

वेलतूर, बाेथली, गाेन्हा, चिखली, तुडका, ताराेली, शिकारपूर, फेगड, रेंगातूर, पचखेडी, खैरलांजी, मदनापूर, किन्ही, शिवनी, परसाेडी, बाेरी आदी गावांतील शेतकऱ्यांसाठी ही उपसा सिंचन याेजना वरदान ठरली आहे. परंतु प्रशासनाच्या हेकेखाेर धाेरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता, जलसंपदा विभागाने पिकांच्या ओलितासाठी तत्काळ पाणी साेडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, जि. प. सदस्य कविता साखरवाडे, माजी सरपंच प्रभाकर चौधरी, ज्ञानिवंत साखरवाडे, राजू चाैधरी, उमेश महाकाळकर, हरिदास लुटे, राजेंद्र कावळे, राजू लिमजे आदींसह शेतकरी उपस्थित हाेते.

...

दरवर्षी पाणी मिळते, मग यंदा का नाही?

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दरवर्षी पाणी मिळते, मग यंदा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत यामध्ये वरिष्ठ अधिकारी राजकारण करीत असल्याचा गंभीर आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहायक अभियंत्यांना पाणी न साेडण्याबाबत ताेंडी सूचना दिल्या असल्याने स्थानिक अभियंता पाणी साेडू शकत नाही. म्हणजेच वरिष्ठ स्तरावरूनच पाणी न साेडण्यासाठी षडयंत्र असल्याचे जाणकारांचे मत आहे. आंभाेरा उपसा सिंचन याेजनेकडे दुर्लक्ष करून सिंचनासाठी पाणी साेडण्यास टाळाटाळ केली जात आहे.