शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रंगपंचमीत २५ कोटींच्या व्यवसायावर पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:07 IST

नागपूर : रंगपंचमी घरीच साजरी करा आणि कडक लॉकडाऊनच्या प्रशासनाच्या आवाहनानंतर बाजारात व्यापाऱ्यांमध्ये निरुत्साह पसरला आहे. अखेरच्या दोन ते ...

नागपूर : रंगपंचमी घरीच साजरी करा आणि कडक लॉकडाऊनच्या प्रशासनाच्या आवाहनानंतर बाजारात व्यापाऱ्यांमध्ये निरुत्साह पसरला आहे. अखेरच्या दोन ते तीन दिवसात रंगपंचमीच्या वस्तूंच्या विक्रीवर पाणी फेरल्या गेले असून जवळपास २५ कोटींच्या उलाढालीवर संक्रांत आली आहे.

यंदा रंगपंचमी सण २९ मार्चला साजरा होणार आहे. त्याकरिता व्यापारी पूर्वीच तयारी करतात. डिसेंबरअखेरपासून आणि जानेवारी महिन्यात वस्तूंचे ऑर्डर देतात. तो माल फेब्रुवारी महिन्यात व्यापाऱ्यांकडे पोहोचतो. यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे रुग्ण फारसे नव्हते. त्यामुळे रंगपंचमी उत्तमरीत्या साजरी होण्याचे संकेत मिळाल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल मागविला. पण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रकोप वाढताच व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्के वस्तूंची विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बाजारात पिचकारी, मुखवटे, चेहरे, केस, रंग, गुलाल या मुख्य वस्तूंना मागणीच नसल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोर जावे लागत आहे. यंदाच्या रंगपंचमीवर कोरोनाचे संकट दिसत आहे.

इतवारी जिल्ह्याची मोठी बाजारपेठ

नागपूर जिल्ह्यातील तहसील आणि ग्रामीण भागात इतवारी येथून मालाचा पुरवठा होतो. अनेक व्यापारी सणाच्या सात दिवसांपूर्वी वस्तूंची खरेदी करतात. पण यंदा रंगपंचमी साजरी होणार नसल्याने ठोक व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात माल पडून आहे. त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार असल्याची माहिती राजू माखिजा यांनी दिली.

गुलालाचे सर्वाधिक उत्पादन नागपुरात

रंगपंचमी अथवा अन्य सणांसाठी नागपुरात विविधरंगी गुलालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. नागपूर गुलालाची मोठी बाजारपेठ बनली आहे. त्या कारणाने उत्पादकही वाढले आहेत. ही उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. पण यंदा अन्य जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी गुलालाचे ऑर्डर न नोंदविल्याने आणि रंगपंचमी सणावर प्रतिबंध आल्याने यंदा कोट्यवधींचा व्यवसाय डबघाईस आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पिचकारीचे मोठे मार्केट

नागपुरात विविध आकार आणि प्रकारातील पिचकारीचे मार्केट जवळपास १० कोटींचे आहे. पण यंदा पालक मुलांसाठी पिचकारी खरेदीसाठी बाजारात आलेच नाही. याशिवाय रविवार शेवटचा दिवस असतानाही बाजारात उत्साह दिसून येत नाही. याशिवाय किरकोळ व्यापाऱ्यांनीही खरेदी थांबविली आहे. फेब्रुवारीत जेवढा व्यवसाय झाला तेवढीच उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. नंतर मागणी नगण्य आहे. यंदा अनेकांना स्टॉक घरीच ठेवावा लागणार आहे. कोरोना लॉकडाऊनचे संकट डोक्यावर घोंगावत असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.