शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
6
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
7
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
8
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
9
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
10
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
11
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
12
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
13
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
14
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
15
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
16
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
17
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
18
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
20
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा

रंगपंचमीत २५ कोटींच्या व्यवसायावर पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:07 IST

नागपूर : रंगपंचमी घरीच साजरी करा आणि कडक लॉकडाऊनच्या प्रशासनाच्या आवाहनानंतर बाजारात व्यापाऱ्यांमध्ये निरुत्साह पसरला आहे. अखेरच्या दोन ते ...

नागपूर : रंगपंचमी घरीच साजरी करा आणि कडक लॉकडाऊनच्या प्रशासनाच्या आवाहनानंतर बाजारात व्यापाऱ्यांमध्ये निरुत्साह पसरला आहे. अखेरच्या दोन ते तीन दिवसात रंगपंचमीच्या वस्तूंच्या विक्रीवर पाणी फेरल्या गेले असून जवळपास २५ कोटींच्या उलाढालीवर संक्रांत आली आहे.

यंदा रंगपंचमी सण २९ मार्चला साजरा होणार आहे. त्याकरिता व्यापारी पूर्वीच तयारी करतात. डिसेंबरअखेरपासून आणि जानेवारी महिन्यात वस्तूंचे ऑर्डर देतात. तो माल फेब्रुवारी महिन्यात व्यापाऱ्यांकडे पोहोचतो. यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे रुग्ण फारसे नव्हते. त्यामुळे रंगपंचमी उत्तमरीत्या साजरी होण्याचे संकेत मिळाल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल मागविला. पण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रकोप वाढताच व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्के वस्तूंची विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बाजारात पिचकारी, मुखवटे, चेहरे, केस, रंग, गुलाल या मुख्य वस्तूंना मागणीच नसल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोर जावे लागत आहे. यंदाच्या रंगपंचमीवर कोरोनाचे संकट दिसत आहे.

इतवारी जिल्ह्याची मोठी बाजारपेठ

नागपूर जिल्ह्यातील तहसील आणि ग्रामीण भागात इतवारी येथून मालाचा पुरवठा होतो. अनेक व्यापारी सणाच्या सात दिवसांपूर्वी वस्तूंची खरेदी करतात. पण यंदा रंगपंचमी साजरी होणार नसल्याने ठोक व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात माल पडून आहे. त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार असल्याची माहिती राजू माखिजा यांनी दिली.

गुलालाचे सर्वाधिक उत्पादन नागपुरात

रंगपंचमी अथवा अन्य सणांसाठी नागपुरात विविधरंगी गुलालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. नागपूर गुलालाची मोठी बाजारपेठ बनली आहे. त्या कारणाने उत्पादकही वाढले आहेत. ही उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. पण यंदा अन्य जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी गुलालाचे ऑर्डर न नोंदविल्याने आणि रंगपंचमी सणावर प्रतिबंध आल्याने यंदा कोट्यवधींचा व्यवसाय डबघाईस आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पिचकारीचे मोठे मार्केट

नागपुरात विविध आकार आणि प्रकारातील पिचकारीचे मार्केट जवळपास १० कोटींचे आहे. पण यंदा पालक मुलांसाठी पिचकारी खरेदीसाठी बाजारात आलेच नाही. याशिवाय रविवार शेवटचा दिवस असतानाही बाजारात उत्साह दिसून येत नाही. याशिवाय किरकोळ व्यापाऱ्यांनीही खरेदी थांबविली आहे. फेब्रुवारीत जेवढा व्यवसाय झाला तेवढीच उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. नंतर मागणी नगण्य आहे. यंदा अनेकांना स्टॉक घरीच ठेवावा लागणार आहे. कोरोना लॉकडाऊनचे संकट डोक्यावर घोंगावत असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.