शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

तासभरातच धो-धो धुतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:09 IST

नागपूर : गुरुवारी दुपारी नागपुरात पावसाने जाेरदार धडक दिली. तासभर धाे धाे बरसलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सखल ...

नागपूर : गुरुवारी दुपारी नागपुरात पावसाने जाेरदार धडक दिली. तासभर धाे धाे बरसलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सखल भागातील काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले हाेते, तर अनेक भागातील रस्ते जलमय झाले. त्यामुळे वाहतुकीचा खाेळंबा निर्माण झाला हाेता. मान्सूनचे शेवटचे दिवस असले तरी थाेडा वेळाच्या पावसाने महापालिकेच्या व्यवस्थेचा बाेजवारा उडाला.

गेल्या काही दिवसात पावसाने चांगलाच मुक्काम केला आहे. तरीही उघडझाप सुरू असून, थाेडी उसंत देत पावसाची हजेरी लागत आहे. हा ऊनसावलीचा खेळ गुरुवारीही झाला. सकाळपासून आकाश निरभ्र हाेते व ऊनही पडले हाेते. त्यामुळे लाेकांना उष्णतेचा त्रासही झाला. मात्र दुपारी १.३० वाजेनंतर वातावरण अचानक बदलले आणि आकाशात काळे ढग जमा झाले. दुपारी २ वाजता ढगांच्या गडगडाटासह जाेरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील बहुतेक भागात किमान तासभर धाे-धाे पाऊस बरसला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात ३४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.

- जाेरदार पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. मेडिकल चाैक, तुकडाेजी चाैक, मानेवाडा चाैकात पाणी रस्त्यावरून वाहत हाेते. महाल व नंदनवन भागात काही ठिकाणी पावसाचे पाणी वाहत हाेते.

- जाटतराेडी परिसरात काहींच्या घरात पाणी शिरल्याची माहिती आहे. चिमणी चाैक, रामेश्वरी परिसरात माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते. याशिवाय प्रतापनगर, त्रिमूर्तीनगर, गाेपालनगर व आसपासच्या परिसरात रस्त्यावरून पाणी वाहत हाेते.

- पडाेळे चाैक ते राधेमंगलम सभागृहापर्यंत बसस्थानकाच्या बसण्याच्या पाटीपर्यंत पाणी चढले हाेते. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली हाेती.

- बजाजनगर, काछीपुरा चाैकात भागात रस्त्यावर वाहनांची चाके बुडतील एवढे पाणी साचले हाेते. स्वावलंबीनगर, भेंडे ले-आउट, खामला टी-पाॅइंट आदी भागातही रस्त्यावर पाणी वाहत हाेते. त्यामुळे तास-दीड तास वाहतूक विस्कळीत झाली.

नरेंद्रनगर पुलाखाली तलावच

- नरेंद्रनगर रेल्वे पुलाखाली हाेणारी दुर्दशा थांबण्याची शक्यता दिसून येत नाही. दरवेळी पावसाळ्यात पुलाखाली तलावासारखे पाणी जमा झालेले असते. गुरुवारीही हीच दशा हाेती. वाहने बुडण्याएवढे पाणी साचले हाेते. त्यामुळे काही काळ वाहतूकच बंद करावी लागली. पाऊस बंद झाल्यावर बराच वेळ तशीच परिस्थिती हाेती. त्यानंतर वाहतूक सुरू झाली; पण वाहनचालकांना काठाकठाने वाहने काढण्याशिवाय गत्यंतर नव्हते.