शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

वारेगाव ॲश बंडला दुसऱ्यांदा भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : वीज केंद्रातील राख (फ्लाय ॲश) साठविण्यात येणाऱ्या वारेगाव शिवारातील ॲश बंडला मंगळवारी (दि. २१) ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : वीज केंद्रातील राख (फ्लाय ॲश) साठविण्यात येणाऱ्या वारेगाव शिवारातील ॲश बंडला मंगळवारी (दि. २१) दुपारी दाेनदा भगदाड पडले. त्यामुळे राखमिश्रित पाणी काेलार नदीत शिरल्याने नदीतील पाणी दूषित हाेण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे, या ॲश बंडच्या बांधाला वारंवार भगदाड पडत असल्याने या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खापरखेडा वीज केंद्रातील राख साठवून ठेवण्यासाठी वारेगाव (ता. कामठी) शिवारात ॲश बंडची निर्मिती करण्यात आली. तीन वर्षापूर्वी या ॲश बंडची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, या कामाचे कंत्राट अभि इंजिनिअरिंग नामक कंपनीला दिले आहे. तेव्हापासून या ॲश बंडला भगदाड पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

खापरखेडा वीज केंद्रातील राख पाण्यात मिसळवून पाईपलाईनद्वारे या ॲश बंडमध्ये साेडली जाते. याच ठिकाणी ही राख साठवून ठेवली जाते. हा ॲश बंड वारंवार फुटत असल्याने, कामठी तालुक्यातील कवठा व वारेगाव येथील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. परंतु, महाजेनकाे प्रशासनाने एकाही तक्रारीची साधी दखल घेतली नाही. दुसरीकडे, निकृष्ट कामामुळे वारंवार भगदाड पडत असल्याने त्याच्या दुरुस्तीचा व देखभालीचा भुर्दंडही महाजेनकाेलाच सहन करावा लागत आहे.

मंगळवारी काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे भिंतीला तडे गेले आणि हा ॲश बंड फुटल्याचा दावा महाजेनकाेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या भिंतींच्या भेगा बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या परिसरात बाहेरची व्यक्ती जाणार नाही, यासाठी सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

यासंदर्भात आपल्याला काहीही माहिती नसल्याचे कंत्राटदार अभि इंजिनिअरिंग कंपनीचे एक्झिक्युटिव्ह शिंदे यांनी सुरुवातीला सांगितले. नंतर पावसामुळे ॲश बंड ओव्हरलाेड झाला आणि त्याला भगदाड पडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात वीज केंद्रातील राख नांद शिवारात साठविण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

...

वर्षभरातील चाैथी घटना

या ॲश बंडला मंगळवारी दुपारी दाेनदा तर पाेळ्याच्या दुसऱ्या दिवशी एकदा असे पंधरवड्यात तीनदा भगदाड पडले. यापूर्वीही याच्या भिंतीला भगदाड पडल्याने वर्षभरात हा ॲश बंड चारदा फुटला आहे. या ॲश बंडच्या भिंतींची उंची वाढविण्याचे काम महाजेनकाेच्या सिव्हील विभागाच्या देखरेखीखाली केले जात असून, याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही महाजेनकाेचीच आहे. हा ॲश बंड वारंवार फुटत असतानाही याची साधी चाैकशी करण्याचे व कंत्राटदारावर कारवाई करण्याचे धाडसही महाजेनकाेने दाखविले नाही.

...

शेतकऱ्यांचे नुकसान

महाजेनकाेने या राखेच्या देखभालीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. मात्र, कुणीही लक्ष द्यायला तयार नाही, असा आराेप कवठा व वारेगाव येथील शेतकऱ्यांनी केला आहे. सन २०१९ मध्ये हा ॲश बंड तीनदा फुटला हाेता. त्यावेळी राखमिश्रित पाणी परिसरातील शेतात माेठ्या प्रमाणात साचल्याने शेतातील संपूर्ण पीक खराब झाले हाेते. त्यामुळे वारेगाव व कवठा येथील शेतकऱ्यांना माेठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले हाेते. ही समस्या गंभीर रूप धारण करीत असून, महाजेनकाे प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे.

...