शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वारेगाव ॲश बंडला दुसऱ्यांदा भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : वीज केंद्रातील राख (फ्लाय ॲश) साठविण्यात येणाऱ्या वारेगाव शिवारातील ॲश बंडला मंगळवारी (दि. २१) ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : वीज केंद्रातील राख (फ्लाय ॲश) साठविण्यात येणाऱ्या वारेगाव शिवारातील ॲश बंडला मंगळवारी (दि. २१) दुपारी दाेनदा भगदाड पडले. त्यामुळे राखमिश्रित पाणी काेलार नदीत शिरल्याने नदीतील पाणी दूषित हाेण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे, या ॲश बंडच्या बांधाला वारंवार भगदाड पडत असल्याने या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खापरखेडा वीज केंद्रातील राख साठवून ठेवण्यासाठी वारेगाव (ता. कामठी) शिवारात ॲश बंडची निर्मिती करण्यात आली. तीन वर्षापूर्वी या ॲश बंडची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, या कामाचे कंत्राट अभि इंजिनिअरिंग नामक कंपनीला दिले आहे. तेव्हापासून या ॲश बंडला भगदाड पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

खापरखेडा वीज केंद्रातील राख पाण्यात मिसळवून पाईपलाईनद्वारे या ॲश बंडमध्ये साेडली जाते. याच ठिकाणी ही राख साठवून ठेवली जाते. हा ॲश बंड वारंवार फुटत असल्याने, कामठी तालुक्यातील कवठा व वारेगाव येथील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. परंतु, महाजेनकाे प्रशासनाने एकाही तक्रारीची साधी दखल घेतली नाही. दुसरीकडे, निकृष्ट कामामुळे वारंवार भगदाड पडत असल्याने त्याच्या दुरुस्तीचा व देखभालीचा भुर्दंडही महाजेनकाेलाच सहन करावा लागत आहे.

मंगळवारी काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे भिंतीला तडे गेले आणि हा ॲश बंड फुटल्याचा दावा महाजेनकाेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या भिंतींच्या भेगा बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या परिसरात बाहेरची व्यक्ती जाणार नाही, यासाठी सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

यासंदर्भात आपल्याला काहीही माहिती नसल्याचे कंत्राटदार अभि इंजिनिअरिंग कंपनीचे एक्झिक्युटिव्ह शिंदे यांनी सुरुवातीला सांगितले. नंतर पावसामुळे ॲश बंड ओव्हरलाेड झाला आणि त्याला भगदाड पडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात वीज केंद्रातील राख नांद शिवारात साठविण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

...

वर्षभरातील चाैथी घटना

या ॲश बंडला मंगळवारी दुपारी दाेनदा तर पाेळ्याच्या दुसऱ्या दिवशी एकदा असे पंधरवड्यात तीनदा भगदाड पडले. यापूर्वीही याच्या भिंतीला भगदाड पडल्याने वर्षभरात हा ॲश बंड चारदा फुटला आहे. या ॲश बंडच्या भिंतींची उंची वाढविण्याचे काम महाजेनकाेच्या सिव्हील विभागाच्या देखरेखीखाली केले जात असून, याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही महाजेनकाेचीच आहे. हा ॲश बंड वारंवार फुटत असतानाही याची साधी चाैकशी करण्याचे व कंत्राटदारावर कारवाई करण्याचे धाडसही महाजेनकाेने दाखविले नाही.

...

शेतकऱ्यांचे नुकसान

महाजेनकाेने या राखेच्या देखभालीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. मात्र, कुणीही लक्ष द्यायला तयार नाही, असा आराेप कवठा व वारेगाव येथील शेतकऱ्यांनी केला आहे. सन २०१९ मध्ये हा ॲश बंड तीनदा फुटला हाेता. त्यावेळी राखमिश्रित पाणी परिसरातील शेतात माेठ्या प्रमाणात साचल्याने शेतातील संपूर्ण पीक खराब झाले हाेते. त्यामुळे वारेगाव व कवठा येथील शेतकऱ्यांना माेठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले हाेते. ही समस्या गंभीर रूप धारण करीत असून, महाजेनकाे प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे.

...