शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

फोटोग्राफीसाठी हवी संवेदनशीलता, कल्पकता अन् संयम

By admin | Updated: October 30, 2014 00:45 IST

समोर दिसणाऱ्या प्रसंगाकडे संवेदनशीलतेने पाहत तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचे माध्यम म्हणजे फोटोग्राफी. त्यामुळे या क्षेत्रात स्व:तचे नाव कमवायचे असेल तर संवेदनशीलता, कल्पकता

नागपूर : समोर दिसणाऱ्या प्रसंगाकडे संवेदनशीलतेने पाहत तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचे माध्यम म्हणजे फोटोग्राफी. त्यामुळे या क्षेत्रात स्व:तचे नाव कमवायचे असेल तर संवेदनशीलता, कल्पकता आणि संयम ही त्रिसुत्री बाळगणे गरजेचे आहे. हे गुण नसतील तर प्रकाश किरणांच्या या कलेत स्वत:चे स्थान निर्माण करता येऊ शकणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार अरविंद पुरंदरे यांनी केले.धरमपेठ कॉमर्स कॉलेजमध्ये राजू पोटे स्मृतिप्रीत्यर्थ सुरू असलेल्या पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन, रोटरी क्लब आॅफ नागपूर आॅरेंजसिटी, आरएस मुंडले धरमपेठ आर्टस अ‍ॅँड कॉमर्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप चॅटर्जी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजच्या प्राचार्य डॉ. संध्या नायर, भाजपाचे देवेंद्र दस्तुरे उपस्थित होते. कार्यशाळेत छायाचित्रणाच्या क्षेत्रात आवड असणाऱ्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळाले. पुरंदरे म्हणाले, फोटोग्राफी ही नुसती कला नाही. एकाच वेळी स्वत:शी आणि जगाशी साधलेला दुहेरी संवाद आहे. कोणताही क्षण कॅमेरात बंदिस्त करण्यापूर्वी प्रत्येकाने हातातल्या कॅमेऱ्याचा स्वभाव आणि त्याच्यातले बारकावे समजून घेणे गरजेचे आहे. जे दिसते ते टिपणे हे कॅमेराचे काम आहे. मात्र त्याला योग्य दिशा देणे हे आपले काम आहे. आवश्यक तितक्याच प्रकाश किरणांचे बोट धरून समोरचा क्षण टिपणे ही कला आहे. स्वत:च्या फोटोवर तटस्थपणे टीका कराल तरच झालेल्या चुकांमधून बोध घेता येईल. सध्याच्या डिजिटलायझेशनने हे तंत्र आणखीनच सुलभ केले आहे. प्रकाशाच्या छटांची एकदा माहिती झाली की कोणत्या वेळी शटर स्पिड किती ठेवायची, अ‍ॅपर्चर किती असावा, डेप्त आॅफ फिल्ड कशी मेन्टेन करायची, फोकस कुठे हवा, आयएसओ किती हवा या गोष्टी आत्मसात होतील. या कलेच्या क्षेत्रात कोणीही अभिमन्यू नाही. त्यामुळे चुका होतील ही भीती दूर करा आणि आपल्याच चुकांमधून हे तंत्र अवगत करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. विवेक रानडे यांनी फोटो क्लिक करून कार्यशाळेचे उद्घाटन केले. त्यांनी फोटोग्राफीच्या क्षेत्रात व्हिजन, क्रिएटिव्हीटी, संवेदनशीलतेची जोड हवी असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नाझनिन हीने केले. (प्रतिनिधी)