शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

फोटोग्राफीसाठी हवी संवेदनशीलता, कल्पकता अन् संयम

By admin | Updated: October 30, 2014 00:45 IST

समोर दिसणाऱ्या प्रसंगाकडे संवेदनशीलतेने पाहत तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचे माध्यम म्हणजे फोटोग्राफी. त्यामुळे या क्षेत्रात स्व:तचे नाव कमवायचे असेल तर संवेदनशीलता, कल्पकता

नागपूर : समोर दिसणाऱ्या प्रसंगाकडे संवेदनशीलतेने पाहत तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचे माध्यम म्हणजे फोटोग्राफी. त्यामुळे या क्षेत्रात स्व:तचे नाव कमवायचे असेल तर संवेदनशीलता, कल्पकता आणि संयम ही त्रिसुत्री बाळगणे गरजेचे आहे. हे गुण नसतील तर प्रकाश किरणांच्या या कलेत स्वत:चे स्थान निर्माण करता येऊ शकणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार अरविंद पुरंदरे यांनी केले.धरमपेठ कॉमर्स कॉलेजमध्ये राजू पोटे स्मृतिप्रीत्यर्थ सुरू असलेल्या पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन, रोटरी क्लब आॅफ नागपूर आॅरेंजसिटी, आरएस मुंडले धरमपेठ आर्टस अ‍ॅँड कॉमर्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप चॅटर्जी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजच्या प्राचार्य डॉ. संध्या नायर, भाजपाचे देवेंद्र दस्तुरे उपस्थित होते. कार्यशाळेत छायाचित्रणाच्या क्षेत्रात आवड असणाऱ्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळाले. पुरंदरे म्हणाले, फोटोग्राफी ही नुसती कला नाही. एकाच वेळी स्वत:शी आणि जगाशी साधलेला दुहेरी संवाद आहे. कोणताही क्षण कॅमेरात बंदिस्त करण्यापूर्वी प्रत्येकाने हातातल्या कॅमेऱ्याचा स्वभाव आणि त्याच्यातले बारकावे समजून घेणे गरजेचे आहे. जे दिसते ते टिपणे हे कॅमेराचे काम आहे. मात्र त्याला योग्य दिशा देणे हे आपले काम आहे. आवश्यक तितक्याच प्रकाश किरणांचे बोट धरून समोरचा क्षण टिपणे ही कला आहे. स्वत:च्या फोटोवर तटस्थपणे टीका कराल तरच झालेल्या चुकांमधून बोध घेता येईल. सध्याच्या डिजिटलायझेशनने हे तंत्र आणखीनच सुलभ केले आहे. प्रकाशाच्या छटांची एकदा माहिती झाली की कोणत्या वेळी शटर स्पिड किती ठेवायची, अ‍ॅपर्चर किती असावा, डेप्त आॅफ फिल्ड कशी मेन्टेन करायची, फोकस कुठे हवा, आयएसओ किती हवा या गोष्टी आत्मसात होतील. या कलेच्या क्षेत्रात कोणीही अभिमन्यू नाही. त्यामुळे चुका होतील ही भीती दूर करा आणि आपल्याच चुकांमधून हे तंत्र अवगत करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. विवेक रानडे यांनी फोटो क्लिक करून कार्यशाळेचे उद्घाटन केले. त्यांनी फोटोग्राफीच्या क्षेत्रात व्हिजन, क्रिएटिव्हीटी, संवेदनशीलतेची जोड हवी असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नाझनिन हीने केले. (प्रतिनिधी)