शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

फोटोग्राफीसाठी हवी संवेदनशीलता, कल्पकता अन् संयम

By admin | Updated: October 30, 2014 00:45 IST

समोर दिसणाऱ्या प्रसंगाकडे संवेदनशीलतेने पाहत तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचे माध्यम म्हणजे फोटोग्राफी. त्यामुळे या क्षेत्रात स्व:तचे नाव कमवायचे असेल तर संवेदनशीलता, कल्पकता

नागपूर : समोर दिसणाऱ्या प्रसंगाकडे संवेदनशीलतेने पाहत तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचे माध्यम म्हणजे फोटोग्राफी. त्यामुळे या क्षेत्रात स्व:तचे नाव कमवायचे असेल तर संवेदनशीलता, कल्पकता आणि संयम ही त्रिसुत्री बाळगणे गरजेचे आहे. हे गुण नसतील तर प्रकाश किरणांच्या या कलेत स्वत:चे स्थान निर्माण करता येऊ शकणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार अरविंद पुरंदरे यांनी केले.धरमपेठ कॉमर्स कॉलेजमध्ये राजू पोटे स्मृतिप्रीत्यर्थ सुरू असलेल्या पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन, रोटरी क्लब आॅफ नागपूर आॅरेंजसिटी, आरएस मुंडले धरमपेठ आर्टस अ‍ॅँड कॉमर्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप चॅटर्जी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजच्या प्राचार्य डॉ. संध्या नायर, भाजपाचे देवेंद्र दस्तुरे उपस्थित होते. कार्यशाळेत छायाचित्रणाच्या क्षेत्रात आवड असणाऱ्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळाले. पुरंदरे म्हणाले, फोटोग्राफी ही नुसती कला नाही. एकाच वेळी स्वत:शी आणि जगाशी साधलेला दुहेरी संवाद आहे. कोणताही क्षण कॅमेरात बंदिस्त करण्यापूर्वी प्रत्येकाने हातातल्या कॅमेऱ्याचा स्वभाव आणि त्याच्यातले बारकावे समजून घेणे गरजेचे आहे. जे दिसते ते टिपणे हे कॅमेराचे काम आहे. मात्र त्याला योग्य दिशा देणे हे आपले काम आहे. आवश्यक तितक्याच प्रकाश किरणांचे बोट धरून समोरचा क्षण टिपणे ही कला आहे. स्वत:च्या फोटोवर तटस्थपणे टीका कराल तरच झालेल्या चुकांमधून बोध घेता येईल. सध्याच्या डिजिटलायझेशनने हे तंत्र आणखीनच सुलभ केले आहे. प्रकाशाच्या छटांची एकदा माहिती झाली की कोणत्या वेळी शटर स्पिड किती ठेवायची, अ‍ॅपर्चर किती असावा, डेप्त आॅफ फिल्ड कशी मेन्टेन करायची, फोकस कुठे हवा, आयएसओ किती हवा या गोष्टी आत्मसात होतील. या कलेच्या क्षेत्रात कोणीही अभिमन्यू नाही. त्यामुळे चुका होतील ही भीती दूर करा आणि आपल्याच चुकांमधून हे तंत्र अवगत करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. विवेक रानडे यांनी फोटो क्लिक करून कार्यशाळेचे उद्घाटन केले. त्यांनी फोटोग्राफीच्या क्षेत्रात व्हिजन, क्रिएटिव्हीटी, संवेदनशीलतेची जोड हवी असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नाझनिन हीने केले. (प्रतिनिधी)