शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

‘पास’ व्हायचेय? ३५ नव्हे ४० टक्के लागणार

By admin | Updated: May 8, 2016 03:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध विद्याशाखांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळी टक्केवारी आहे.

नागपूर विद्यापीठ : सर्व अभ्यासक्रमांना एकच योजना लागू करण्यासाठी प्रयत्ननागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध विद्याशाखांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळी टक्केवारी आहे. परंतु आता विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमांसाठी एकाच योजनेची अंमलबजावणी करण्याचे जवळपास निश्चित केले आहे. यानुसार पदवी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ३५ ऐवजी ४० टक्के तर पदव्युत्तर परीक्षेत ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य राहणार आहे. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय जाहीर होण्याची चिन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठात विविध प्रकारच्या ९ विद्याशाखा आहेत. प्रत्येक शाखांमधील विविध अभ्यासक्रमांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. काही अभ्यासक्रमांत ३५ टक्के अनिवार्य आहेत, तर काही ठिकाणी ५० टक्क्यांची अट आहे. विविध अभ्यासक्रमांमध्ये उत्तीर्ण टक्केवारीत असमानता असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. शिवाय विद्यापीठ वर्तुळातूनदेखील उत्तीर्ण होण्यासाठी एकच समान योजना असावी, अशी मागणी समोर येत होती. अखेर विद्यापीठातील अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्याच्या संदर्भात विद्यापीठाने पाऊल उचलले. विद्वत परिषदेने नुकतीच प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. त्यामध्ये सर्व शाखेच्या समन्वयकांचा समावेश आहे. या समितीने विद्यापीठात उत्तीर्ण होण्यासाठी एकच योजना असावी, असे प्रस्तावित केले आहे. यानुसार पदवी अभ्यासक्रमांसाठी ४० टक्के आणि पदव्युतर अभ्यासक्रमासाठी ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य राहणार आहे. (प्रतिनिधी)लवकरच होणार निर्णयबरेचदा गुणांकन करताना वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे निकष लावण्यात येतात. प्रत्येकाचा एक वेगळा अध्यादेश आहे. ही बाब लक्षात घेता समान योजना आणणे आवश्यक आहे. यामुळे परीक्षा प्रणालीत समानता येणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. या समितीची ६ मे रोजी बैठक होणार होती. परंतु काही कारणांनी ती पुढे ढकलण्यात आली. लवकरच याबाबतीत अंतिम निर्णय करण्यात येईल. असे मत प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केले.