शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
2
"...तर आमचा देश उद्ध्वस्त होईल"; कोर्टाने टॅरिफचा निर्णय चुकीचा ठरवल्यावर संतापले डोनाल्ड ट्रम्प
3
"माझ्या कारसमोर घाणेरडे चाळे...", सुमोना चक्रवर्तीला मुंबईत भर दुपारी आला भयानक अनुभव
4
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
5
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!
7
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
8
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
9
ऐश्वर्या रायने लेक आराध्यासह घेतलं जीएसबीचं दर्शन, नेटकरी कमेंट्स करत म्हणाले...
10
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
11
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
12
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
13
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
14
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
15
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
16
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
17
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
18
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
19
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
20
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?

‘पास’ व्हायचेय? ३५ नव्हे ४० टक्के लागणार

By admin | Updated: May 8, 2016 03:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध विद्याशाखांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळी टक्केवारी आहे.

नागपूर विद्यापीठ : सर्व अभ्यासक्रमांना एकच योजना लागू करण्यासाठी प्रयत्ननागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध विद्याशाखांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळी टक्केवारी आहे. परंतु आता विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमांसाठी एकाच योजनेची अंमलबजावणी करण्याचे जवळपास निश्चित केले आहे. यानुसार पदवी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ३५ ऐवजी ४० टक्के तर पदव्युत्तर परीक्षेत ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य राहणार आहे. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय जाहीर होण्याची चिन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठात विविध प्रकारच्या ९ विद्याशाखा आहेत. प्रत्येक शाखांमधील विविध अभ्यासक्रमांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. काही अभ्यासक्रमांत ३५ टक्के अनिवार्य आहेत, तर काही ठिकाणी ५० टक्क्यांची अट आहे. विविध अभ्यासक्रमांमध्ये उत्तीर्ण टक्केवारीत असमानता असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. शिवाय विद्यापीठ वर्तुळातूनदेखील उत्तीर्ण होण्यासाठी एकच समान योजना असावी, अशी मागणी समोर येत होती. अखेर विद्यापीठातील अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्याच्या संदर्भात विद्यापीठाने पाऊल उचलले. विद्वत परिषदेने नुकतीच प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. त्यामध्ये सर्व शाखेच्या समन्वयकांचा समावेश आहे. या समितीने विद्यापीठात उत्तीर्ण होण्यासाठी एकच योजना असावी, असे प्रस्तावित केले आहे. यानुसार पदवी अभ्यासक्रमांसाठी ४० टक्के आणि पदव्युतर अभ्यासक्रमासाठी ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य राहणार आहे. (प्रतिनिधी)लवकरच होणार निर्णयबरेचदा गुणांकन करताना वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे निकष लावण्यात येतात. प्रत्येकाचा एक वेगळा अध्यादेश आहे. ही बाब लक्षात घेता समान योजना आणणे आवश्यक आहे. यामुळे परीक्षा प्रणालीत समानता येणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. या समितीची ६ मे रोजी बैठक होणार होती. परंतु काही कारणांनी ती पुढे ढकलण्यात आली. लवकरच याबाबतीत अंतिम निर्णय करण्यात येईल. असे मत प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केले.