शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

उपकालव्यावरील पुलाची भिंत खचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : भरधाव ट्रकने जाेरात धडक दिल्याने काचूरवाही-मसला मार्गावरील उपकालव्याच्या पुलाची भिंत खचली आहे. या ठिकाणी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : भरधाव ट्रकने जाेरात धडक दिल्याने काचूरवाही-मसला मार्गावरील उपकालव्याच्या पुलाची भिंत खचली आहे. या ठिकाणी पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी थाेडे वळण दिले असल्याने या पुलाला व त्याच्या भिंतीला विशेष महत्त्व आहे. मात्र, या भिंतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.

पेंच जलाशयाचा डावा कालवा रामटेक तालुक्यातून माैदा तालुका मार्गे भंडारा जिल्ह्यात गेला आहे. या कालव्याचे पाणी रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळावे म्हणून या मुख्य कालव्याला उपकालवा (मायनर) जाेडला आहे. यातील एक उपकालवा रामटेक तालुक्यातील काचूरवाही-मसला राेडला छेदून गेला असल्याने त्यावर छाेटा पूल तयार केला आहे. उपकालव्यातील पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी या पुलाजवळ पाण्याच्या प्रवाहाला थाेडे वळण दिले आहे. काही दिवसांपूर्वी भरधाव ट्रकने त्या उपकालव्यावरील पुलाच्या भिंतीला धडक दिली आणि भिंत खचली. त्यामुळे भिंतीच्या अपशेषासाेबतच मुरूम, दगड उपकालव्यात पडल्याने पाण्याचा वळण मार्ग बुजल्यागत झाला आहे.

सध्या पाणी साेडण्यात न आल्याने हा उपकालवा काेरडा आहे. मात्र, त्यात पाणी साेडल्यानंतर दाब नियंत्रणाची समस्या निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे या प्रकाराबाबत चरण गाेल्हर, बुधा वासनिक यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या रामटेक कार्यालयाला सूचना देत पावसाळ्यापूर्वी ही भिंत दुरुस्त करण्याची तसेच उपकालव्याची साफसफाई करण्याची मागणी केली. परंतु, या मागणीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे. आगामी खरीप हंगामात शेवटच्या टाेकावरील शेताला पाणी मिळावे म्हणून ही दुरुस्ती व साफसफाई तातडीने करावी, अशी मागणीही काचूरवाही व मसला येथील शेतकऱ्यांनी केली आहे.