शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

तीन वर्षांपासून विद्यार्थी पदवीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 28, 2015 01:50 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेंट अ‍ॅ़न्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल)

नागपूर विद्यापीठ : हाच आहे का ‘अ’ दर्जा ? नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेंट अ‍ॅ़न्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल) ‘अ’ दर्जा देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात अद्यापही भोंगळ कारभारच सुरू असल्याची बाब समोर आली आहे. विद्यापीठाने २०१२ सालापासून विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिलेच नसून यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या सगळ्याची माहिती असूनदेखील विद्यापीठाने कुठलीही तातडीची पावले उचलण्याचे कष्ट घेतले नाही. शुक्रवारी झालेल्या विद्यापीठाच्या विधीसभेच्या बैठकीत अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ होऊन महिना उलटून गेला असतानादेखील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र का मिळाले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पदवी प्रमाणपत्र नसल्याने अनेकांच्या नोकरी संकटात आल्या आहेत. विशेषत: विदेशातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या ठिकाणी पदवी प्रमाणपत्राची मागणी होती. दीक्षांत समारंभ झाल्यावरदेखील पदवी कशी मिळत नाही अशा प्रश्न उपस्थित करुन विद्यार्थ्यांवरच संशय घेण्यात येतो, असे बाजपेयी म्हणाले. यावर चर्चा सुरू असताना २०१३ सोबतच २०१२ च्या विद्यार्थ्यांना म्हणजेच १०० व्या दीक्षांत समारंभातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांच्या हाती पदवी प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे प्रशासनाने मान्य केले. २०१२ साली उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांचे काम पूर्ण झाले असून त्यांचे वितरण करण्यात येईल अशी माहिती प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांनी दिली. (प्रतिनिधी)विद्यापीठ घेणार निवृत्त अधिकाऱ्यांची सेवाविद्यापीठात कर्मचारी व अधिकाऱ्यांची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रांच्या कामाला फटका बसतो. ही बाब लक्षात घेऊन निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतिदिवस मानधन तत्त्वावर सेवा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यानुसार १२ जणांची नियुक्ती झाल्याची माहिती देण्यात आली.आकड्यांबाबतदेखील घोळविद्यापीठाने दिलेल्या छापील उत्तरात २०१३ च्या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी देण्यात आली आहे. १०१ व्या दीक्षांत समारंभात ६८ हजार ७७१ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात आली असून त्यापैकी आचार्य पदवीच्या केवळ १६६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु पुढील उत्तरात हाच आकडा ६८ हजार ६०५ इतका सांगण्यात आला. त्यामुळे नेमका आकडा किती यावरुन अ‍ॅड.बाजपेयी यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.