शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून विद्यार्थी पदवीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 28, 2015 01:50 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेंट अ‍ॅ़न्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल)

नागपूर विद्यापीठ : हाच आहे का ‘अ’ दर्जा ? नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेंट अ‍ॅ़न्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल) ‘अ’ दर्जा देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात अद्यापही भोंगळ कारभारच सुरू असल्याची बाब समोर आली आहे. विद्यापीठाने २०१२ सालापासून विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिलेच नसून यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या सगळ्याची माहिती असूनदेखील विद्यापीठाने कुठलीही तातडीची पावले उचलण्याचे कष्ट घेतले नाही. शुक्रवारी झालेल्या विद्यापीठाच्या विधीसभेच्या बैठकीत अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ होऊन महिना उलटून गेला असतानादेखील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र का मिळाले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पदवी प्रमाणपत्र नसल्याने अनेकांच्या नोकरी संकटात आल्या आहेत. विशेषत: विदेशातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या ठिकाणी पदवी प्रमाणपत्राची मागणी होती. दीक्षांत समारंभ झाल्यावरदेखील पदवी कशी मिळत नाही अशा प्रश्न उपस्थित करुन विद्यार्थ्यांवरच संशय घेण्यात येतो, असे बाजपेयी म्हणाले. यावर चर्चा सुरू असताना २०१३ सोबतच २०१२ च्या विद्यार्थ्यांना म्हणजेच १०० व्या दीक्षांत समारंभातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांच्या हाती पदवी प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे प्रशासनाने मान्य केले. २०१२ साली उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांचे काम पूर्ण झाले असून त्यांचे वितरण करण्यात येईल अशी माहिती प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांनी दिली. (प्रतिनिधी)विद्यापीठ घेणार निवृत्त अधिकाऱ्यांची सेवाविद्यापीठात कर्मचारी व अधिकाऱ्यांची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रांच्या कामाला फटका बसतो. ही बाब लक्षात घेऊन निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतिदिवस मानधन तत्त्वावर सेवा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यानुसार १२ जणांची नियुक्ती झाल्याची माहिती देण्यात आली.आकड्यांबाबतदेखील घोळविद्यापीठाने दिलेल्या छापील उत्तरात २०१३ च्या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी देण्यात आली आहे. १०१ व्या दीक्षांत समारंभात ६८ हजार ७७१ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात आली असून त्यापैकी आचार्य पदवीच्या केवळ १६६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु पुढील उत्तरात हाच आकडा ६८ हजार ६०५ इतका सांगण्यात आला. त्यामुळे नेमका आकडा किती यावरुन अ‍ॅड.बाजपेयी यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.