शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

देश विकासात वेकोलिची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: April 20, 2015 02:10 IST

देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी कोळशाचे जास्तीतजास्त उत्पादन होणे गरजेचे आहे.

नागपूर : देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी कोळशाचे जास्तीतजास्त उत्पादन होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने एक दूरदृष्टीचा कार्यक्रम आखला असून, देशाच्या या विकासात वेकोलिची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, नव्हे तर वेकोलि या दूरदृष्टीचाच एक भाग आहे, असे प्रतिपादन कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी रविवारी येथे व्यक्त केले. वेस्टर्न कोल लिमिटेडतर्फे सिव्हिल लाईन्स येथील कोल इस्टेट स्थित सांस्कृतिक भवनात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कोल इंडियाच्या सेंट्रल माईन्स प्लॅनिंग अ‍ॅण्ड डिझाईन इन्स्टिट्यूटचे सीएमडी ए. के. देबनाथ प्रमुख पाहुणे होते. वेकोलिचे अध्यक्ष व प्रबंध संचालक राजीव रंजन मिश्र, संचालक (पर्सनल) रूपक दयाल आणि संचालक (तांत्रिक) एस.एस. मल्ही प्रामुख्याने उपस्थित होते. अनिल स्वरूप म्हणाले, तुम्ही जे काही कार्य कराल ते मन लावून प्रसन्न मनाने करा. ज्या कामामुळे तुम्हाला आनंद मिळतो, ते काम अधिक चांगले होते, त्यामुळे जे कार्य कराल त्यावर गर्व करा, असे आवाहनही त्यांनी केले. ए. के. देबनाथ यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी स्वागतपर भाषण करताना राजीव रंजन मिश्र यांनी सांगितले की, स्वरूप यांच्या मार्गदर्शनानुसार वेकोलि काम करीत आहे. प्रत्येक महिन्यात एक नवीन खाण सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वेकोलितर्फे ‘व्हिजन २०२०’चे डॉक्युमेंटही यावेळी स्वरूप यांना सादर करण्यात आले. तसेच समाजहितासाठी वेकोलिने घेतलेल्या ‘प्रगती’ या पुढाकाराचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. तसेच याप्रसंगी एस. एस. मल्ही, के.एल. व्यंकटरमण, एल.बी. गुरले, डी. शेषागिरी राव, एस.जी. नासरे, एस. रमण सत्या, अशेक कुमार रावल, धर्मा श्रीधर, मो. जावेद कुरैशी आणि पी.के. सनी या अधिकाऱ्यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)