शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंद स्मारकातून देशभक्तीची प्रेरणा मिळेल

By admin | Updated: January 2, 2017 02:22 IST

सर्वधर्मसमभाव व शांतीचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांनी आपल्या देशाच्या संस्कृतीला जागतिक

देवेंद्र फडणवीस : स्वामी विवेकानंद यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण नागपूर : सर्वधर्मसमभाव व शांतीचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांनी आपल्या देशाच्या संस्कृतीला जागतिक पातळीवर नवी ओळख दिली. जगाला नवा विचार दिला. त्यांच्या भव्य राष्ट्रीय स्मारकातून युवकांना देशभक्तीची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. कन्याकुमारीच्या धर्तीवर अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईट येथे महापलिकेने स्वामी विवेकानंदचे भव्य स्मारक उभारले आहे. ३० फूट उंच खडकावर २० फूट उंचीचा ब्राँझ धातूचा स्वामीचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. साडेसात एकर जागेत ७.५ कोटी खर्च करुन नयनरम्य असे स्मारक तयार करण्यात आले आहे. या स्मारकात संपूर्ण वातानुकूलित सभागृहात स्वामी विवेकानंद जीवन चरित्र प्रदर्शन, आकर्षक विद्युत रोषणाई, अद्ययावत ध्वनिव्यवस्था, प्रशस्त पार्किंग, जलाशय बेटावर नयनरम्य हिरवळ व आकर्षक कारंजे, स्वामीजींच्या जीवनावर आधारित १७ एलइडी स्क्रीनवर स्वामीजींच्या जीवनावर आधारित प्रेरित कथा ऐकण्याची संधी तसेच स्वामीजींच्या जीवनावरील आधारित २८ नयनरम्य म्युरल असणार आहेत. या स्मारकाचे मुख्यमंत्री व नितीन गडकरी यांचे उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापौर प्रवीण दटके, नागपूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष ब्रह्मस्थानंद , खासदार अजय संचेती, डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, परिणय फुके, उपमहापौर सतीश होले, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी , जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. स्वामीजींचे हे स्मारक राष्ट्रीय स्तरावरील स्मारकाशी साधर्म्य सांगणारे आहे. स्वामी विवेकानंदानी प्रगती व प्रेरणेचा विचार दिला. आपल्या जीवनावर सुद्धा स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा प्रभाव असून आपण त्यांनी दाखवून दिलेल्या विचाराचे अनुकरण करूनच विकास करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान आज देश भ्रष्टाचार, काळेधन, बेरोजगारी व गरिबी या विरोधात लढा देत आहे. स्वामींच्या मते हा लढा म्हणजे देशभक्ती असून यात सहभागी होऊन तरुणांनी देशभक्तीच्या व विकासाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. स्वामींच्या स्मारकापासून प्रेरणा घेऊन समाजाने आपले जीवन उज्वल करावे, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेने अतिशय उत्कृष्ट व अविस्मरणीय स्मारक बनविले आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना टप्प्याटप्याने या स्मारकाची सहल घडवून आणावी. यामुळे स्वामीच्या जीवनकार्याचा व विचाराचा परिचय नव्या पिढीला घडेल. विवेकानंद स्वामी यांचा मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीवर भर होता. स्वामींच्या स्वप्नातील भारताचा परिचय घडवून देणारे हे स्मारक असून नव्या पिढीला यापासून ऊर्जा व प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. या स्मारकात फाऊंटन निर्माण करण्यासाठी निधी नसल्याचे दयाशंकर तिवारी यांनी निदर्शनास आणून दिल्याचा उल्लेख करून गडकरी म्हणाले की या ठिकाणी सुरेख फाऊंटन निर्माण करण्यासाठी राज्यसभा खासदार अजय संचेती व डॉ. विकास महात्मे यांनी हवा तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे कबूल केल्याची माहिती दिली. यावेळी दक्षिण-पश्चिम नागपूर भागातील नागरिकांना जमिनीचे पट्टे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शिल्पकार राम सुतार, कंत्राटदार वकीलसिंग, वास्तुशास्त्रज्ञ उदय गजभिये, आयुक्त श्रावण हर्डीकर यांचेसह विविध अधिकारी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महापौर प्रवीण दटके व स्वामी ब्रह्मानंद यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. दयाशंकर तिवारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या सोहळ्याला नागरिकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)