शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

विवेकानंद स्मारकातून देशभक्तीची प्रेरणा मिळेल

By admin | Updated: January 2, 2017 02:22 IST

सर्वधर्मसमभाव व शांतीचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांनी आपल्या देशाच्या संस्कृतीला जागतिक

देवेंद्र फडणवीस : स्वामी विवेकानंद यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण नागपूर : सर्वधर्मसमभाव व शांतीचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांनी आपल्या देशाच्या संस्कृतीला जागतिक पातळीवर नवी ओळख दिली. जगाला नवा विचार दिला. त्यांच्या भव्य राष्ट्रीय स्मारकातून युवकांना देशभक्तीची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. कन्याकुमारीच्या धर्तीवर अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईट येथे महापलिकेने स्वामी विवेकानंदचे भव्य स्मारक उभारले आहे. ३० फूट उंच खडकावर २० फूट उंचीचा ब्राँझ धातूचा स्वामीचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. साडेसात एकर जागेत ७.५ कोटी खर्च करुन नयनरम्य असे स्मारक तयार करण्यात आले आहे. या स्मारकात संपूर्ण वातानुकूलित सभागृहात स्वामी विवेकानंद जीवन चरित्र प्रदर्शन, आकर्षक विद्युत रोषणाई, अद्ययावत ध्वनिव्यवस्था, प्रशस्त पार्किंग, जलाशय बेटावर नयनरम्य हिरवळ व आकर्षक कारंजे, स्वामीजींच्या जीवनावर आधारित १७ एलइडी स्क्रीनवर स्वामीजींच्या जीवनावर आधारित प्रेरित कथा ऐकण्याची संधी तसेच स्वामीजींच्या जीवनावरील आधारित २८ नयनरम्य म्युरल असणार आहेत. या स्मारकाचे मुख्यमंत्री व नितीन गडकरी यांचे उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापौर प्रवीण दटके, नागपूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष ब्रह्मस्थानंद , खासदार अजय संचेती, डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, परिणय फुके, उपमहापौर सतीश होले, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी , जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. स्वामीजींचे हे स्मारक राष्ट्रीय स्तरावरील स्मारकाशी साधर्म्य सांगणारे आहे. स्वामी विवेकानंदानी प्रगती व प्रेरणेचा विचार दिला. आपल्या जीवनावर सुद्धा स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा प्रभाव असून आपण त्यांनी दाखवून दिलेल्या विचाराचे अनुकरण करूनच विकास करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान आज देश भ्रष्टाचार, काळेधन, बेरोजगारी व गरिबी या विरोधात लढा देत आहे. स्वामींच्या मते हा लढा म्हणजे देशभक्ती असून यात सहभागी होऊन तरुणांनी देशभक्तीच्या व विकासाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. स्वामींच्या स्मारकापासून प्रेरणा घेऊन समाजाने आपले जीवन उज्वल करावे, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेने अतिशय उत्कृष्ट व अविस्मरणीय स्मारक बनविले आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना टप्प्याटप्याने या स्मारकाची सहल घडवून आणावी. यामुळे स्वामीच्या जीवनकार्याचा व विचाराचा परिचय नव्या पिढीला घडेल. विवेकानंद स्वामी यांचा मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीवर भर होता. स्वामींच्या स्वप्नातील भारताचा परिचय घडवून देणारे हे स्मारक असून नव्या पिढीला यापासून ऊर्जा व प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. या स्मारकात फाऊंटन निर्माण करण्यासाठी निधी नसल्याचे दयाशंकर तिवारी यांनी निदर्शनास आणून दिल्याचा उल्लेख करून गडकरी म्हणाले की या ठिकाणी सुरेख फाऊंटन निर्माण करण्यासाठी राज्यसभा खासदार अजय संचेती व डॉ. विकास महात्मे यांनी हवा तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे कबूल केल्याची माहिती दिली. यावेळी दक्षिण-पश्चिम नागपूर भागातील नागरिकांना जमिनीचे पट्टे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शिल्पकार राम सुतार, कंत्राटदार वकीलसिंग, वास्तुशास्त्रज्ञ उदय गजभिये, आयुक्त श्रावण हर्डीकर यांचेसह विविध अधिकारी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महापौर प्रवीण दटके व स्वामी ब्रह्मानंद यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. दयाशंकर तिवारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या सोहळ्याला नागरिकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)