शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

नोटाबंदीमुळे दहशतवादाला लगाम

By admin | Updated: December 24, 2016 02:42 IST

केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांना होणारा पतपुरवठा बंद झाला आहे. पाकिस्तान, दाऊद

मनिंदरजितसिंग बिट्टा : मोदी सरकारचे केले कौतुक नागपूर : केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांना होणारा पतपुरवठा बंद झाला आहे. पाकिस्तान, दाऊद यांच्यासह देशविरोधकांकडे असलेले हजारो कोटी रुपये मातीमोल झाले आहेत. काश्मिरात दहशतवाद्यांना बाहेरून होणारी मदत बंद झाली असून, त्यामुळेच तेथील दगडफेक थांबली आहे. नोटाबंदीमुळे इकॉनॉमिक टेररिझम व नार्को टेररिझमला लगाम लावण्यात बऱ्यापैकी यश आले आहे, असा दावा करीत अ. भा. आतंकवाद विरोधी संघटनेचे संयोजक मनिंदरजितसिंग बिट्टा यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे भक्कमपणे समर्थन केले. नागपुरात एका सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले असता बिट्टा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने दहशतवादाप्रति नरमाईचे धोरण घेतले होते. आता या सरकारने धोरण बदलत कडक पावले उचलली आहेत. पूर्वी आपल्या जवानांचे शीर कापले जायचे तरी आपण शांत बसायचो. आता सीमेपलीकडून एक गोळी चालली तर १०० गोळ्यांनी उत्तर दिले जात आहे. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केले व ४८ दहशतवाद्यांना ठार केले. यामुळे आपल्या सैन्याचे मनोबल वाढले असून पाकने धास्ती घेतली आहे. आपण सीमेवर सैनिकांची भेट घेतली असता सैनिकांनी त्यावर समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी ही कारवाई करण्याचा आदेश संरक्षण मंत्रालयाने दिला, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले. दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता, असे स्पष्ट केले. मी मोदी किंवा भाजपचा समर्थक नाही. मात्र, मोदींना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची चिंता नाही तर देश महत्त्वाचा आहे, असे सांगत इकॉनॉमिक टेररिझम संपविण्यासाठी उचललेल्या पावलांचे आपण समर्थक असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात मारल्या गेलेला दहशतवादी बुरहान वाणी याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. एका दहशवाद्याला अशी मदत करणे योग्य नाही. केंद्र सरकारने या मदतीवर निर्बंध घालावे, अशी मागणी त्यांनी केली. सोबतच कोणत्याही पक्षाने राजकीय फायद्यासाठी सैन्य, लढाई अशा मुद्यांचा वापर करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी नगरसेवक डॉ. छोटू भोयर उपस्थित होते.(प्रतिनिधी) अ‍ॅन्टी टेररिस्ट मिल्ट्री कोर्ट स्थापन करा दहशतवादी, दहशतवाद्यांना मदत करणारे तसेच दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्यांवर जलदगतीने खटला चालवून त्यांना सहा महिन्यात फाशी, जन्मठेप अशी शिक्षा सुनावता यावी यासाठी अ‍ॅन्टी टेररिस्ट मिल्ट्री कोर्ट स्थापन करावे, अशी मागणी बिट्टा यांनी केली. काश्मिरात लागू असलेले कलम ३७० हे दहशतवादाचे मूळ असल्याचे सांगत कलम सर्वप्रथम रद्द करावे, अशी मागणीही त्यांनी केली. फुटिरवाद्यांच्या बँक खात्यांची चौकशी करा काश्मीरप्रश्नी फुटीरवादी नेते दिल्लीत येऊन चर्चा करतात. त्यांना उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. त्यावर लाखो रुपये खर्च होतात. या फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी तसेच यांच्या बँक खात्यांची चौकशी करून यांना पैसा कुठून येतो ते शोधावे, अशी मागणीही बिट्टा यांनी केली. नक्षल्यांचेही १२ हजार कोटी नष्ट नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांचेही १२ हजार कोटी रुपये नष्ट झाल्याचा दावा बिट्टा यांनी केला. सीआरपीएफ नक्षलवाद्यांशी उत्तमपणे लढत आहे. लोकांनाही विश्वासात घेत आहे. छत्तीसगड, झारखंड येथे मोठ्या कारवायांना सुरुवात झाली आहे, असे सांगत सर्जिकल स्ट्राइकमुळे आता नक्षल्यांनाही चोख उत्तर दिले जाईल, असा विश्वास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.