शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

२०० मीटरचे उल्लंघन, एसटीला राज्यात ७२० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:06 IST

दयानंद पाईकराव नागपूर : बसस्थानकापासून खासगी वाहतूक २०० मीटर लांब असावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता, परंतु महाराष्ट्रात या ...

दयानंद पाईकराव

नागपूर : बसस्थानकापासून खासगी वाहतूक २०० मीटर लांब असावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता, परंतु महाराष्ट्रात या आदेशाची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिणामी राज्यात एसटीला दररोज २ कोटींचे दर वर्षाला ७२० कोटींचा फटका बसत आहे. एसटीची आर्थिक स्थिती आधीच बिकट असताना खासगी वाहतूकदारांकडून एसटीचे लचके तोडण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची एसटी वाचविण्यासाठी राज्यभरात २०० मीटरच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ८ जानेवारी २००२ रोजी बसस्थानकापासून खासगी वाहतूक २०० मीटर लांब असावी, असा आदेश दिला होता, परंतु या आदेशाची राज्यभरात बहुतांश ठिकाणी अंमलबजावणी होताना दिसत नाही. बसस्थानकाला लागूनच अवैध वाहतूकदारांनी आपली दुकाने थाटली आहेत. यामुळे एसटी महामंडळाला दररोज २ कोटींचा आणि वर्षभरात ७२० कोटींचा फटका बसत आहे. कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाल्याने उत्पन्नाचा स्त्रोतच बंद झाला होता. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासही एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. अशा बिकट परिस्थितीत राज्य शासनाकडे असलेली विविध सवलतींची रक्कम घेऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सोडविण्यात आला, परंतु एसटीला आर्थिकदृष्ट्या भक्कम बनविण्यासाठी राज्य शासन ठोस पावले उचलत नसल्यामुळे सर्वसामान्यांच्या एसटीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. इतर राज्यापेक्षा एसटीला अधिक प्रवासी कर आणि टोल टॅक्स द्यावा लागत आहे. अशा स्थितीत राज्यातील अवैध वाहतूकदारांना २०० मीटरच्या अंतराचे पालन करायला लावले तरी एसटीचे वर्षाकाठी ७२० कोटी रुपये वाचणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी वाहतूक राज्यातील बसस्थानकांपासून दूर न्यावी किंवा अमरावतीच्या धर्तीवर सर्व अवैध वाहतूक नाक्याच्या बाहेर नेण्याची मागणी एसटी कामगार संघटनेचे नागपूर प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार यांनी केली आहे.

.............

राज्यातील आगार : २५०

एकूण बस : १६०००

एकूण कर्मचारी : ९६०००

चालक : ३५ हजार

वाहक : २५ हजार

न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे

‘खासगी वाहतूक करणारी वाहने बसस्थानकापासून २०० मीटर दूर असावीत, असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. या आदेशाचे पालन होत नसल्यामुळे एसटीला दरवर्षी ७२० कोटींचा फटका बसत आहे. एसटीला वाचविण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे.’

-संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना, मुंबई

..........