शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याची वीज कापल्याने ग्रामस्थ संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:13 IST

उमरेड : विद्युत कंपनीने उमरेड तालुक्यातील हिवरा-हिवरी आणि सुकळी या गावांमधील पाणीपुरवठ्याची वीज कापली. या कारणावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ...

उमरेड : विद्युत कंपनीने उमरेड तालुक्यातील हिवरा-हिवरी आणि सुकळी या गावांमधील पाणीपुरवठ्याची वीज कापली. या कारणावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हिवरा-हिवरी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.

उमरेड येथून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरा येथे १२ ऑगस्टला पाणीपुरवठ्यावी वीज कापल्या गेली. त्यानंतर थकबाकीच्या काही रकमेचा भरणा केल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास सुरू करण्यात आली. दुसरीकडे १६ ऑगस्टला हिवरी आणि सुकळी येथील गावाच्या पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सुकळी, हिवरा आणि हिवरी या तीनही गावातील पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत बिलाची सुमारे २ लाख ५० हजार रुपयाची थकबाकी आहे. या तिन्ही गावातील पथदिव्यांच्या थकबाकीची रक्कम एक लाख रुपयाच्या आसपास आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास सुकळी आणि हिवरी येथील ग्रामस्थ ग्रामपंचायतीमध्ये पोहोचले. यावेळी सरपंच किसन गिरसावळे, उपसरपंच राजविलास डोये, ग्रामसेवक क्षितिज निकोसे हजर होते. त्यांच्यासमोरच ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला. चार दिवसापासून आम्हाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. पथदिव्यांअभावी रस्त्यावर काळोख पसरल्याने मुले, तरुणी आणि महिलांना त्रास सोसावा लागत आहे.

थकबाकीची रक्कम तातडीने भरा, अशी मागणीही ग्रामस्थांनी लावून धरली. दीड तास झालेल्या चर्चेतून त्यांचे समाधान झाले नाही. अशातच संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. पंचायत समिती, तहसील कार्यालयाकडे आपली व्यथासुद्धा ग्रामस्थांनी मांडली. गंभीर प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामसेवक क्षितिज निकोसे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सुकळीची पाणी समस्या गंभीर

सुकळी येथील ग्रामस्थांना नाला पार केल्यानंतर अंदाजे एक किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागते. नाल्याला पूर असला की पाण्याची गंभीर समस्या उद्भवते. शिवाय गावकऱ्यांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने आरोग्याची समस्या भेडसावत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामसेवक कार्यालयात हजर राहत नाही. गावाच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात, असाही ग्रामस्थांचा आरोप आहे.