शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

पाणीपुरवठ्याची वीज कापल्याने ग्रामस्थ संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:13 IST

उमरेड : विद्युत कंपनीने उमरेड तालुक्यातील हिवरा-हिवरी आणि सुकळी या गावांमधील पाणीपुरवठ्याची वीज कापली. या कारणावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ...

उमरेड : विद्युत कंपनीने उमरेड तालुक्यातील हिवरा-हिवरी आणि सुकळी या गावांमधील पाणीपुरवठ्याची वीज कापली. या कारणावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हिवरा-हिवरी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.

उमरेड येथून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरा येथे १२ ऑगस्टला पाणीपुरवठ्यावी वीज कापल्या गेली. त्यानंतर थकबाकीच्या काही रकमेचा भरणा केल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास सुरू करण्यात आली. दुसरीकडे १६ ऑगस्टला हिवरी आणि सुकळी येथील गावाच्या पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सुकळी, हिवरा आणि हिवरी या तीनही गावातील पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत बिलाची सुमारे २ लाख ५० हजार रुपयाची थकबाकी आहे. या तिन्ही गावातील पथदिव्यांच्या थकबाकीची रक्कम एक लाख रुपयाच्या आसपास आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास सुकळी आणि हिवरी येथील ग्रामस्थ ग्रामपंचायतीमध्ये पोहोचले. यावेळी सरपंच किसन गिरसावळे, उपसरपंच राजविलास डोये, ग्रामसेवक क्षितिज निकोसे हजर होते. त्यांच्यासमोरच ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला. चार दिवसापासून आम्हाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. पथदिव्यांअभावी रस्त्यावर काळोख पसरल्याने मुले, तरुणी आणि महिलांना त्रास सोसावा लागत आहे.

थकबाकीची रक्कम तातडीने भरा, अशी मागणीही ग्रामस्थांनी लावून धरली. दीड तास झालेल्या चर्चेतून त्यांचे समाधान झाले नाही. अशातच संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. पंचायत समिती, तहसील कार्यालयाकडे आपली व्यथासुद्धा ग्रामस्थांनी मांडली. गंभीर प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामसेवक क्षितिज निकोसे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सुकळीची पाणी समस्या गंभीर

सुकळी येथील ग्रामस्थांना नाला पार केल्यानंतर अंदाजे एक किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागते. नाल्याला पूर असला की पाण्याची गंभीर समस्या उद्भवते. शिवाय गावकऱ्यांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने आरोग्याची समस्या भेडसावत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामसेवक कार्यालयात हजर राहत नाही. गावाच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात, असाही ग्रामस्थांचा आरोप आहे.