शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

विदर्भाच्या चळवळीला प्रामाणिक नेतृत्व हवे

By admin | Updated: December 6, 2015 03:22 IST

विदर्भाची मागणी ही ९५ वर्षे जुनी आहे. सर्वप्रथम १९२० मध्ये नागपुरातील अधिवेशनात ती झाली होती. त्यावेळी या मागणीला स्वत: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाठिंबा दिला होता.

सुरेश द्वादशीवार : श्रीहरी अणे यांच्या ‘विदर्भगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन नागपूर : विदर्भाची मागणी ही ९५ वर्षे जुनी आहे. सर्वप्रथम १९२० मध्ये नागपुरातील अधिवेशनात ती झाली होती. त्यावेळी या मागणीला स्वत: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाठिंबा दिला होता. मात्र त्यानंतर राजकीय परिस्थिती बदलली. ज्यांनी वेगळ्या राज्याची मागणी केली नाही, त्यांना राज्य मिळाले. परंतु विदर्भ वेगळा होऊ शकला नाही. विदर्भ चळवळीचे प्रणेते बापूजी अणे होते. परंतु पुढे या चळवळीला तसे नेतृत्व मिळू शकले नाही. त्यामुळे ही चळवळ भरकटली. आज या चळवळीला प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे. जनता तयार आहे. केवळ त्यांना विश्वास देणारे नेते हवे आहेत. असे प्रतिपादन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केला.नागपूर श्रमिक पत्रकार संघ व टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ज्येष्ठ विधीज्ज्ञ तथा राज्याचे महाधिवक्ता अ‍ॅड़ श्रीहरी अणे लिखित ‘विदर्भगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर उपस्थित होते. मंचावर अ‍ॅड़ श्रीहरी अणे, श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड़ पारोमिता गोस्वामी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सरचिटणीस शिरीष बोरकर, विनोद लोहकरे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी व सरचिटणीस अनुपम सोनी उपस्थित होते. यावेळी व्दादशीवार यांच्या हस्ते ‘विदर्भगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचे लेखक अ‍ॅड़ श्रीहरी अणे म्हणाले, विदर्भ वेगळा व्हावा की नाही, याचे उत्तर केवळ विदर्भातील जनताच देऊ शकते, आणि मागील वर्षी जनतेने तो कौल दिला आहे. काही लोकांना तेलंगणाप्रमाणे हिंसक आंदोलन अभिप्रेत आहे. परंतु ते चूक आहे. माझा त्यावर विश्वास नाही. राज्यघटनेने राज्य निर्मितीसाठी कलम घालून दिले आहे. त्याचा उपयोग करू न वेगळे राज्य होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. अ‍ॅड़ किंमतकर यांनी विदर्भ हा पुन्हा काही दिवस महाराष्ट्रात राहिला तर पूर्ण सत्यानाश होईल, असा संताप व्यक्त करीत विदर्भाचे अस्तित्व टिकविण्यासाठी वेगळा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अ‍ॅड़ गोस्वामी यांनी वेगळ्या विदर्भाचे आंदोलन अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे सांगितले. सध्या विदर्भाचा मुद्दा हा केवळ पैशाभोवती फिरत आहे. मात्र राज्याची मागणी कधीही पैशाच्या आधारे पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी अस्तित्वाची लढाई लढण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांनी केले तर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)