शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

सरकारच्या कामगिरीवर विदर्भवादी असमाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी शासनाला एक वर्ष पूर्ण होत असताना विदर्भवाद्यांमध्ये सरकारबाबत नाराजीचा सूर आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी शासनाला एक वर्ष पूर्ण होत असताना विदर्भवाद्यांमध्ये सरकारबाबत नाराजीचा सूर आहे. मागील वर्षभरात कोरोनाचे प्रमुख संकट समोर आले असले तरी सरकारमध्ये नियोजनाचा अभाव दिसून आला. त्यातूनच विदर्भावर अन्याय झाला असल्याची भावना विदर्भवाद्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मागील वर्षभरात जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कात्री लावणे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाकडे झालेले दुर्लक्ष, विदर्भातील शेतकऱ्यांबाबत दुजाभाव, अतिवृष्टी झाली असतानादेखील सरकारकडून त्वरित मदत न देणे इत्यादी मुद्दे विदर्भवाद्यांनी मांडले आहेत. विशेष म्हणजे विदर्भातील अनेक मंत्री शासनात महत्त्वाची खाती सांभाळत आहेत. मात्र मुंबई व पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांप्रमाणे त्यांनी स्वतःच्या प्रदेशाचे मुद्दे लावून धरले नाही. हे सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचा सूर आहे.

सरकारकडे दिशाच नाही

तसे पाहिले तर हे वर्ष कोणत्याही सरकारसाठी आव्हानात्मकच होते. या गंभीर स्थितीत योग्य नियोजन अपेक्षित होते. मात्र सर्वच पातळ्यांवर महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले. केंद्र शासनाने अनलॉक सुरू केल्यानंतर राज्य शासनाकडून ठोस पावलांची अपेक्षा होती. मात्र सरकारकडे ना ब्ल्यू प्रिंट दिसून आली ना योग्य दिशा. विदर्भावर तर सरकारने अन्यायाची परंपरा सुरूच ठेवली आहे. दुर्लक्ष तर आहेच, मात्र त्याहून पुढे जात विदर्भ वैधानिक विकास मंडळाबाबत उदासीनता दाखविली. शिवाय कोरोनाचे कारण समोर करत विदर्भात अधिवेशनदेखील घेण्याचे टाळले. विदर्भाच्या प्रश्नांबाबत येथील मंत्रीदेखील बोलू शकत नाही हे या सरकारमधील मोठे दुर्दैव आहे.

-श्रीहरी अणे, माजी महाधिवक्ता, महाराष्ट्र

विदर्भाचा विकासच हरवला

मागील सरकारच्या कार्यकाळात शिवसेनेसोबत राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे नेतेदेखील शेतकऱ्यांचा कळवळा आल्याचे दाखवत शेतांना भेटी देत होते. मात्र सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा विसर पडला. विदर्भातील कास्तकारांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. विदर्भाकडे दुर्लक्ष करुन सरकारने विदर्भद्वेष दाखविला आहे. राज्यात नोकरभरती बंद करण्याचा आदेश काढल्याने विदर्भातील तरुणांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. सोबतच विदर्भाचा विकासनिधी ६९ टक्क्यांनी कमी केला. यामुळे विदर्भाचा विकासच हरविला आहे. इतर पातळ्यांवरदेखील सरकारने भरीव कार्य केलेले नाही.

-राम नेवले, संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती

औद्योगिकीकरणाकडे दुर्लक्ष

महाविकास आघाचीच्या शासनाला एक वर्ष पूर्ण झाले याबाबत त्यांचे अभिनंदन. विशेषतः कोरोनाच्या कालावधीत मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी संयमित भूमिका घेतली. मात्र मॅग्नेटिक महाराष्ट्रदरम्यान झालेले १५ हजार कोटींचे करार पश्चिम महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिले. वर्षभरात उद्योगमंत्री व मुख्यमंत्री दोघांनीही विदर्भाच्या औद्योगिकीकरणावर काहीच भाष्य केले नाही. विदर्भात बेरोजगारी वाढली आहे. शिकलेले मुल-मुली बाहेर जात आहेत. हा मुद्दा गंभीरतेने घेण्याची आवश्यकता आहे. एका कोपऱ्यातून राज्याचे नियोजन होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी अनेक भूमिका बदलल्या आहेत. त्यामुळे त्यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मुद्याचा विचार करावा.

-श्रीनिवास खांदेवाले, अर्थतज्ज्ञ