शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विजयोत्सव

By admin | Updated: June 13, 2017 01:59 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

शासनाचे अभिनंदन : अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशाराही लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. नागपुरातही सोमवारी शेतकरी संघटना, जय जवान जय किसान संघटनेतर्फे विजयोत्सव साजरा करण्यात आला. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याजवळ लक्ष्मीभुवन चौक धरमपेठ येथे सोमवारी सकाळी फटाके फोडून व मिठाई वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला. तसेच सरकारने सरसकट कर्जमाफी केल्यामुळे शासनाचे, मुख्यमंत्र्यांचे व सर्व मंत्र्यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. दोन दिवसात थकीत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असा इशाराही देण्यात आला. यावेळी अरुण वनकर, किशोर चोपडे, शरद खेडीकर, विजयकुमार शिंदे, सतीश इटकेलवार, रवी इटकेलवार, अविनाश गोतमारे, जयंत घोडमरे, मिलिंद महादेवकर, मंगेश पात्रीकर, ऋषिकेश जाधवसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुसरीकडे शेतकरी संघटनेतर्फे गिरीपेठ येथील संघटनेच्या कार्यालयासमोर फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शेतकरी कर्जमुक्ती ही शेतकरी आंदोलनाचे यश असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी छोटेखानी बैठकही घेण्यात आली. यात राम नेवले यांच्यासह अरविंद देशमुख, अरुण केदार, श्याम वाघ, अ‍ॅड. नंदा पराते, मदन कामडे, सतीश दाणी, जयंतराव चितळे, राम घोडे, डॉ. मीनाक्षी वाढबुद्धे, भय्याजी माकोडे, माया चवरे, डॉ. पुरुषोत्तम भोंडे, दिलीप घोरमारे, प्रभाकर काळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.