शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्यांमधील कटकटीमुळे गेला अवेजचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - शेजाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कटकटीतून पिवळी नदी परिसरात राहणारा अवेज बब्बू पठाण (वय २०) याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - शेजाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कटकटीतून पिवळी नदी परिसरात राहणारा अवेज बब्बू पठाण (वय २०) याचा बळी गेल्याचे उघड झाले आहे. रविवारी रात्री ९ ते १० च्या सुमारास आरोपी शुभम डांगे, जितू राऊत, मयूर नेवारे, आरिफ रमजान खान आणि त्याच्या साथीदारांनी घातक शस्त्राचे घाव घालून अवेजची भीषण हत्या केली होती. या चाैघांना पोलिसांनी अटक केली आहे.

यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपिलनगर, मसाळा टोली भागात राहणारे बब्बू फत्तेखा पठाण (वय ५३) यांच्या शेजारीच आरोपी शुभम डांगे राहतो. बब्बू यांचा मुलगा अवेज (वय २०) याच्यासोबत आरोपी डांगेचा अनेक दिवसांपासून वाद होता. अवेज सेंट्रिंगचे काम कराचया. त्यामुळे घरासमोरच बासबल्ली ठेवत होता. त्यावरून डांगे कुटुंबातील महिला तसेच अवेजच्या कुटुंबातील महिलांचे नेहमी वाद होत होते. शुभम आणि अवेज घरी असले की तेसुद्धा या वादात उडी घ्यायचे. ९ सप्टेंबरला त्यांच्यात असाच कडाक्याचा वाद झाला. अवेज गुन्हेगारी वृत्तीचा असल्याने तो नेहमी आरोपींना धमकावत होता. त्यामुळे शुभमने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. त्यात त्याने त्याचा जावई जितू राऊत आणि साथीदारांनाही सहभागी करून घेतले. त्यानुसार, रविवारी रात्री दारू पिण्याच्या बहाण्याने आरोपी बाहेर पडले. त्यांना अवेज दिसताच त्याच्यासोबत त्यांनी वाद घातला. धोका लक्षात घेऊन अवेज पिवळी नदी चाैकातून पळू लागला. आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला गाठले आणि घातक शस्त्रांचे घाव घालून त्याला ठार मारले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ठाणेदार संजय जाधव, एपीआय सुधीर इंगे आणि सहकाऱ्यांनी धावपळ करून हत्येचा सूत्रधार शुभम डांगे, त्याचा जावई जितू राऊत, मयूर नेवारे आणि आरिफ खान या चाैघांना अटक केली. त्यांचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलीस मंगळवारी न्यायालयात हजर करून पीसीआरची मागणी करणार आहेत.

----

हैदराबादहून परतला अन् ...

गेल्या वर्षी एका लुटमारीच्या प्रकरणात अवेजला पोलिसांनी अटक करून कारागृहात डांबले होते. तिकडून परतल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला हैदराबादला पाठवून दिले. तिकडे कामधंद्याला लाग अन् तिकडेच राहा, असे त्याचे कुटुंबीय त्याला म्हणायचे. मात्र, अवेज काही दिवसांपूर्वी नागपुरात परतला अन् अखेर आरोपींनी त्याचा जीव घेतला.

----