शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

शेजाऱ्यांमधील कटकटीमुळे गेला अवेजचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - शेजाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कटकटीतून पिवळी नदी परिसरात राहणारा अवेज बब्बू पठाण (वय २०) याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - शेजाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कटकटीतून पिवळी नदी परिसरात राहणारा अवेज बब्बू पठाण (वय २०) याचा बळी गेल्याचे उघड झाले आहे. रविवारी रात्री ९ ते १० च्या सुमारास आरोपी शुभम डांगे, जितू राऊत, मयूर नेवारे, आरिफ रमजान खान आणि त्याच्या साथीदारांनी घातक शस्त्राचे घाव घालून अवेजची भीषण हत्या केली होती. या चाैघांना पोलिसांनी अटक केली आहे.

यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपिलनगर, मसाळा टोली भागात राहणारे बब्बू फत्तेखा पठाण (वय ५३) यांच्या शेजारीच आरोपी शुभम डांगे राहतो. बब्बू यांचा मुलगा अवेज (वय २०) याच्यासोबत आरोपी डांगेचा अनेक दिवसांपासून वाद होता. अवेज सेंट्रिंगचे काम कराचया. त्यामुळे घरासमोरच बासबल्ली ठेवत होता. त्यावरून डांगे कुटुंबातील महिला तसेच अवेजच्या कुटुंबातील महिलांचे नेहमी वाद होत होते. शुभम आणि अवेज घरी असले की तेसुद्धा या वादात उडी घ्यायचे. ९ सप्टेंबरला त्यांच्यात असाच कडाक्याचा वाद झाला. अवेज गुन्हेगारी वृत्तीचा असल्याने तो नेहमी आरोपींना धमकावत होता. त्यामुळे शुभमने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. त्यात त्याने त्याचा जावई जितू राऊत आणि साथीदारांनाही सहभागी करून घेतले. त्यानुसार, रविवारी रात्री दारू पिण्याच्या बहाण्याने आरोपी बाहेर पडले. त्यांना अवेज दिसताच त्याच्यासोबत त्यांनी वाद घातला. धोका लक्षात घेऊन अवेज पिवळी नदी चाैकातून पळू लागला. आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला गाठले आणि घातक शस्त्रांचे घाव घालून त्याला ठार मारले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ठाणेदार संजय जाधव, एपीआय सुधीर इंगे आणि सहकाऱ्यांनी धावपळ करून हत्येचा सूत्रधार शुभम डांगे, त्याचा जावई जितू राऊत, मयूर नेवारे आणि आरिफ खान या चाैघांना अटक केली. त्यांचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलीस मंगळवारी न्यायालयात हजर करून पीसीआरची मागणी करणार आहेत.

----

हैदराबादहून परतला अन् ...

गेल्या वर्षी एका लुटमारीच्या प्रकरणात अवेजला पोलिसांनी अटक करून कारागृहात डांबले होते. तिकडून परतल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला हैदराबादला पाठवून दिले. तिकडे कामधंद्याला लाग अन् तिकडेच राहा, असे त्याचे कुटुंबीय त्याला म्हणायचे. मात्र, अवेज काही दिवसांपूर्वी नागपुरात परतला अन् अखेर आरोपींनी त्याचा जीव घेतला.

----