शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पोलीस ठाण्यासाठी माशांचा बळी

By admin | Updated: May 8, 2017 02:22 IST

दक्षिण नागपुरात अतिशय जुनी असलेली संजय गांधीनगरची खदान बुजवून हुडकेश्वर पोलीस ठाणे

पशुप्रेमी संघटनांकडून विरोध : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले काम बंद करण्याचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दक्षिण नागपुरात अतिशय जुनी असलेली संजय गांधीनगरची खदान बुजवून हुडकेश्वर पोलीस ठाणे तयार करण्यात येत आहे. त्यासाठी तलाव बुजविण्याचे काम सुरू असून, यातील जलचर प्राण्यांचा मोठ्या संख्येने मृत्यू होत आहे. सामाजिक कार्यकर्ते व पशुप्रेमींनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर तलाव बुजविण्याचे काम थांबविण्यात आले आहे. संजय गांधीनगर, म्हाळगीनगर येथे असलेल्या खदानीचे रूपांतर मागील ४५ वर्षांपूर्वी तलावात झाले. २५०० चौरस फूटमध्ये हा तलाव आहे. हा तलाव बुजवून त्याजागी हुडकेश्वर पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी तलाव बुजविण्याचे कामही सुरू करण्यात आले. या तलावात सहा ते सात प्रकारच्या मासोळ्या आहेत. याशिवाय साप, कासव, पानकोंबडी आदी जलचर प्राणीसुद्धा मोठ्या प्रमाणात तलावात आहेत. तलाव बुजवत असल्यामुळे मासोळ्या, कासव, पानकोंबडी, सापांचे अस्तित्व धोक्यात आहे. या कामामुळे तलावातील मोठ्या प्रमाणात कासव व मासोळ्यांचा मृत्यू झाल्याचे पशुप्रेमी संघटनेच्या निदर्शनास आले. तलावाच्या काठावर असंख्य मासोळ्या मृत पडलेल्या आढळल्या. किंग कोब्रा आॅर्गनायझेशन, युथ फोर्सचे अध्यक्ष अरविंदकुमार रतुडी, स्वप्निल बोथा व इतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची भेट घेऊन या घटनेची माहिती दिली. जिल्हाधिकारी कुर्वे यांनी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूरच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये यांच्याकडून माहिती घेतली. उपाध्ये यांनी घटनेचे गांभीर्य पाहून अभियंता अनिल देशमुख यांना तलाव बुजविण्याचे काम बंद करण्याचे निर्देश दिले व तलावातील जलचर प्राण्यांसाठी सुरक्षित ठिकाणाची व्यवस्था केल्यानंतरच बुजविण्याचे काम सुरू करावे, असे आदेशही दिले. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीच नव्हती! तलावात साप, कासव, पानकोंबडी असल्यामुळे वनविभागाने आधी जलचर प्राण्यांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे, त्यानंतरच विकास काम करावे, असा नियम आहे. परंतु येथे नियमांना तिलांजली देऊन पशुक्रूरता करण्यात आली. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकारी समिती गठित करतात. संबंधित जागेवर जाऊन त्या ठिकाणी जलचर प्राणी आहे किंवा नाही याचे निरीक्षण करून, असल्यास त्यांना दुसऱ्या सुरक्षितस्थळी हलविण्यात येते. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेताच तलाव बुजविण्याचे काम सुरू झाले होते. आम्ही आवाज उठविल्यामुळे तलाव बुजविण्याच्या कामाला आता ब्रेक लागला आहे. - अरविंदकुमार रुतडी, अध्यक्ष, किंग कोब्रा आॅर्गनायझेशन