शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पोलीस ठाण्यासाठी माशांचा बळी

By admin | Updated: May 8, 2017 02:22 IST

दक्षिण नागपुरात अतिशय जुनी असलेली संजय गांधीनगरची खदान बुजवून हुडकेश्वर पोलीस ठाणे

पशुप्रेमी संघटनांकडून विरोध : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले काम बंद करण्याचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दक्षिण नागपुरात अतिशय जुनी असलेली संजय गांधीनगरची खदान बुजवून हुडकेश्वर पोलीस ठाणे तयार करण्यात येत आहे. त्यासाठी तलाव बुजविण्याचे काम सुरू असून, यातील जलचर प्राण्यांचा मोठ्या संख्येने मृत्यू होत आहे. सामाजिक कार्यकर्ते व पशुप्रेमींनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर तलाव बुजविण्याचे काम थांबविण्यात आले आहे. संजय गांधीनगर, म्हाळगीनगर येथे असलेल्या खदानीचे रूपांतर मागील ४५ वर्षांपूर्वी तलावात झाले. २५०० चौरस फूटमध्ये हा तलाव आहे. हा तलाव बुजवून त्याजागी हुडकेश्वर पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी तलाव बुजविण्याचे कामही सुरू करण्यात आले. या तलावात सहा ते सात प्रकारच्या मासोळ्या आहेत. याशिवाय साप, कासव, पानकोंबडी आदी जलचर प्राणीसुद्धा मोठ्या प्रमाणात तलावात आहेत. तलाव बुजवत असल्यामुळे मासोळ्या, कासव, पानकोंबडी, सापांचे अस्तित्व धोक्यात आहे. या कामामुळे तलावातील मोठ्या प्रमाणात कासव व मासोळ्यांचा मृत्यू झाल्याचे पशुप्रेमी संघटनेच्या निदर्शनास आले. तलावाच्या काठावर असंख्य मासोळ्या मृत पडलेल्या आढळल्या. किंग कोब्रा आॅर्गनायझेशन, युथ फोर्सचे अध्यक्ष अरविंदकुमार रतुडी, स्वप्निल बोथा व इतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची भेट घेऊन या घटनेची माहिती दिली. जिल्हाधिकारी कुर्वे यांनी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूरच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये यांच्याकडून माहिती घेतली. उपाध्ये यांनी घटनेचे गांभीर्य पाहून अभियंता अनिल देशमुख यांना तलाव बुजविण्याचे काम बंद करण्याचे निर्देश दिले व तलावातील जलचर प्राण्यांसाठी सुरक्षित ठिकाणाची व्यवस्था केल्यानंतरच बुजविण्याचे काम सुरू करावे, असे आदेशही दिले. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीच नव्हती! तलावात साप, कासव, पानकोंबडी असल्यामुळे वनविभागाने आधी जलचर प्राण्यांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे, त्यानंतरच विकास काम करावे, असा नियम आहे. परंतु येथे नियमांना तिलांजली देऊन पशुक्रूरता करण्यात आली. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकारी समिती गठित करतात. संबंधित जागेवर जाऊन त्या ठिकाणी जलचर प्राणी आहे किंवा नाही याचे निरीक्षण करून, असल्यास त्यांना दुसऱ्या सुरक्षितस्थळी हलविण्यात येते. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेताच तलाव बुजविण्याचे काम सुरू झाले होते. आम्ही आवाज उठविल्यामुळे तलाव बुजविण्याच्या कामाला आता ब्रेक लागला आहे. - अरविंदकुमार रुतडी, अध्यक्ष, किंग कोब्रा आॅर्गनायझेशन