शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पशुवैद्यकीय विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पशुवैद्यकीय विद्यापीठात विविध प्रकारचे संशोधनाचे कार्य चालते. संशोधनाचे हे कार्य विद्यापीठापर्यंतच सीमित न राहता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पशुवैद्यकीय विद्यापीठात विविध प्रकारचे संशोधनाचे कार्य चालते. संशोधनाचे हे कार्य विद्यापीठापर्यंतच सीमित न राहता ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे. त्याशिवाय ग्रामीण भाग समृध्द आणि संपन्न होणार नाही. तसेच नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर करून रोजगार निर्मितीसाठी विद्यापीठाने प्रयत्न करावे, असे मत केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

शनिवारी पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या चिकित्सालयाच्या आधुनिक इमारतीचे उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. व्यासपीठावर खा. डॉ. विकास महात्मे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पातुरकर, सोमकुवर, सुधीर दिवे उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, कृषी व ग्रामीण भागाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढविण्यासाठी विद्यापीठाची भूमिका महत्त्वाचे आहे. आधी ८५ टक्के भारत हा ग्रामीण भागात वास्तव्याला होता. पण नंतरच्या काळात ३० टक्के तरुणांनी शहराकडे स्थलांतर करणे सुरु केले. कारण ग्रामीण भागात रोजगार नाही, रस्ते, पाणी, खेळण्याची मैदाने नाही. त्यामुळेच आपल्या आर्थिक व्यवस्थेत प्रश्न निर्माण झाले. ही समस्या सोडविण्यासाठी कृषी आणि ग्रामीण भागाचा जीडीपी हा १४ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत जाणे आवश्यक आहे.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दुधाचे उत्पादन वाढविण्यात पशुवैद्यकीय विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे. येत्या ३ वर्षात दुधाचे उत्पन्न ३ पट करून दाखवावे. हे करीत असताना आर्थिक अंकेक्षणासोबत अधिकारी कर्मचाऱ्याच्या कामगिरीचे अंकेक्षणही केले जावे. तेही महत्त्वाचे असल्याचे गडकरी म्हणाले.

रस्ते व महामार्गांची कामे करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला लागणाऱ्या मातीसाठी आम्ही तलाव करून देऊ. बोरगाव मंजूजवळ असाच तलाव प्राधिकरणाने करून दिला. आज त्या तलावात पाणी जमा झाले आहे. विदर्भात मालगुजारी तलावाच्या माध्यमातून गोड्या पाण्यातील झिंग्यांचे उत्पादनही वाढू शकते व त्यामुळे आपले उत्पादन डॉलरमध्ये जाऊ शकते. नवीन तंत्रज्ञान, संशोधन यामुळे रोजगार आणि उत्पादन वाढवून आपण आत्मनिर्भरकडे गेले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.