शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

भाजीपाला बेचव, कडधान्याचा आधार

By admin | Updated: August 11, 2014 00:58 IST

घाऊक बाजारातच भाजीपाल्याच्या किमती वाढल्याने किरकोळ विक्रीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भाजीपाला सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे.

टमाटरचे भाव उतरले : भाज्या महिनाभर महागचनागपूर : घाऊक बाजारातच भाजीपाल्याच्या किमती वाढल्याने किरकोळ विक्रीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भाजीपाला सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. भाज्यांना पर्याय म्हणून गृहिणींनी कडधान्याचा आधार घेतला आहे. आणखी महिनाभर भाज्या जास्त दरातच खरेदी कराव्या लागतील, असे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. टमाटरचे भाव सध्या उतरले आहेत. स्थानिकांकडून आवक कमीशेतकरी खरीप हंगामाकडे वळल्याने त्यांचे भाजीपाला लागवडीकडे दुर्लक्ष आहे. नागपूर जिल्ह्यात सिंचनाच्या सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतीला जोडधंदा म्हणून अनेकांनी भाज्यांचे उत्पादन सुरूच ठेवले आहे. स्थानिकांकडून थोड्याच भाज्या बाजारात येत आहेत. पण नागपूर शहरात मागणी आणि पुरवठ्याच्या प्रमाणात तफावत असल्याने बाहेरगावातून आणि लगतच्या राज्यातून माल नागपुरात येतो. उत्पादन आणि वाहतुकीचा खर्च पाहता तो माल महागच असतो. कॉटन मार्केट ठोक बाजारात टमाटर नारायणगाव, मगनफल्ली, संगमनेर व नाशिकहून येत आहे. गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, छिंदवाडा व औरंगाबाद येथून फुलकोबी आणि परतवाडा, जगदलपूर, रायपूर येथून हिरवी मिरचीची आवक आहे. नागपूरलगतहून चवळी भाजी, पालक, भेंडी, कारल्याची आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये लहानमोठ्या १५० गाड्या येत आहेत. या बाजारातून अन्य ठिकाणी भाज्या विक्रीसाठी जात असल्याने सध्या भाज्यांचा तुटवडा आहे. सध्या भाज्यांना मागणी कमी असल्याचे अडतियांनी सांगितले. कांदा आटोक्यात, बटाटे महागसध्या कांद्याला मागणी कमी असल्याने भाव आटोक्यात आहेत, तर भाज्याच्या किमती वधारल्यानंतर बटाट्याला मागणी वाढली आहे. पर्यायी कळमना ठोक बाजारात भाव प्रति किलो २५ रुपयांवर गेले आहेत. कळमन्यात लाल आणि पांढरा कांद्याचे सरासरी १५ ट्रक येत आहेत. आवक कमी असली तरीही भाव आटोक्यात आहेत. पांढरे आणि लाल कांदे ७०० ते ७२५ रुपये मण (४० किलो) आहेत. अमरावती आणि अकोला येथून पांढरा तर बुलडाणा येथून लाल कांद्याची आवक आहे. थोडेफार ट्रक नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून येत आहेत. तसे पाहता श्रावण महिन्यात कांद्याची विक्री कमी असल्याने दरही कमी असतात. तीन आठवड्याआधी भाव १००० रुपयांवर होते. केंद्र सरकारचे निर्यातीत कांद्यावरील कठोर नियमांमुळे यावर्षी भाव स्थिर राहिले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून आलेला कांदा उत्तर भारतात विकला गेला. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी झाली. त्याचाही परिणाम कांद्याच्या भावावर झाल्याची माहिती कळमना बाजारातील आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी दिली. सध्या आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यात नवीन कांदा बाजारात आला आहे. बेंगळुरु येथे रोज १५ ते २० गाड्यांची आवक आहे. महाराष्ट्रात पुढील महिन्यात नवीन कांदा बाजारात येईल. भाज्या महाग झाल्याने सध्या बटाट्याच्या किमती वधारल्या आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूर, आग्रा, मेणपुरी, इटावा या जिल्ह्यातील बटाट्याची आवक आहे. सरासरी १५ ते १० ट्रक येत आहेत. श्रावणामध्ये बटाट्याला मागणी जास्त असल्याने भाव वधारल्याचे वसानी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)