शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे भाज्यांच्या किमतीत वाढ

By admin | Updated: December 30, 2014 00:54 IST

कडाक्याच्या थंडीचा परिणाम भाज्यांवर झाल्याने स्थानिक उत्पादकांकडून मध्यंतरी वाढलेली आवक सध्या अचानक कमी झाली. परिणामी भाज्यांचे भाव पुन्हा आकाशाला भिडले असून,

आवक घटली : गृहिणींचे बजेट वाढलेनागपूर : कडाक्याच्या थंडीचा परिणाम भाज्यांवर झाल्याने स्थानिक उत्पादकांकडून मध्यंतरी वाढलेली आवक सध्या अचानक कमी झाली. परिणामी भाज्यांचे भाव पुन्हा आकाशाला भिडले असून, ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. हिवाळ्यात भाज्या महाग असल्याचे पहिल्यांदाच घडले आहे. सध्या किरकोळ आणि ठोक बाजारात स्थानिक उत्पादकांकडून भाज्यांची आवक तुलनात्मकरीत्या कमी आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट वाढले आहे. एकंदरीत पाहता किमती अचानक वाढल्याने भाज्या बेचव झाल्याची गृहिणींची प्रतिक्रिया आहे. जानेवारीत आवक वाढणारनागपूरपासून ३० ते ४० कि़मी. परिसरात सिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात झाल्याने भाज्यांचे उत्पादन वाढले आहे. कडाक्याची थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे सात दिवसानंतर येणारे पीक आधीच आले आहे. मे, जूनमध्ये भाज्यांची लागवड होते आणि दसरा व दिवाळीत भाज्या बाजारात येतात. पण मध्यंतरी आलेल्या पावसामुळे लागवड मोठ्या प्रमाणात झाली. ते पीक नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात जास्त प्रमाणात बाजारात आले. गेल्या वर्षी भाज्यांना जास्त भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. परिणामी उत्पादनही वाढल्याने मध्यंतरी भाव कमी झाले होते. पण आता वाढीव भावामुळे ग्राहक त्रस्त आहेत. थंडीचा तडाखा कमी झाल्यानंतर जानेवारीत भाज्यांची आवक वाढेल, असे मत महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला बोलताना व्यक्त केले. वांगे व पालक स्वस्तगेल्या काही दिवसांपासूनच्या ढगाळ वातावरणामुळे वांगे, पत्ताकोबी, पालक आणि काही भाज्यांच्या उत्पादनात काहीशी वाढ झाली आहे. ठोक बाजारात भाव मिळत नसल्याने, शिवाय इतर कमिशनला कात्री लावण्याच्या उद्देशाने उत्पादक रस्त्याच्या कडेला मेटॅडोर लावून भाज्या विक्री करीत असल्याचे चित्र दिसत आहे. याशिवाय उमरेड मार्गावरही अनेक उत्पादक भाज्याची विक्री करीत असल्याचे दिसून आले. कॉटन मार्केटमध्ये ठोक बाजारात टमाटर नाशिकहून, मटर व गाजर दिल्ली आणि जबलपूर येथून येत आहेत. कॉटन मार्केट बाजारात दररोज २०० गाड्यांची आवक आहे. किरकोळमध्ये भाज्या महागचठोकमध्ये असलेल्या भावापेक्षा किरकोळमध्ये भाज्यांच्या किमती दुप्पट असतात, असा नेहमीचा अनुभव आहे. हिरवी मिरची, सांबार, गाजर, फूलकोबी, भेंडी, कारले जास्त किमतीत विकल्या जात आहे. त्यावर शासनाने नियंत्रण आणावे, अशी गृहिणींची मागणी आहे.वडीसाठी सांबार स्वस्तहिवाळ्यात सांबार स्वस्त असल्याने सांबारवडीचा बेत सर्वांकडेच असतो. यावर्षी ठोक बाजारात १२ ते १५ रुपये किलोदरम्यान भाव आहेत. स्थानिक उत्पादकांकडून आवक वाढली आहे. (प्रतिनिधी)