शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

वाराणसी-हल्दिया जलमार्ग रचणार इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 21:12 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे गंगा नदीतील जलवाहतुकीला ‘बूस्टर डोज’ मिळाला आहे. अनेक वर्षे अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला आहे. या मार्गातील अनेक अडथळे दूर झाले असून पुढील आठवड्यात जलवाहतुकीच्या क्षेत्राच्या इतिहासातील एक नवे पान लिहिल्या जाणार आहे हे विशेष. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कोलकात्याहून वाराणसीला जलमार्गातून १६ कंटेनर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: यावेळी तेथे उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्देनितीन गडकरींच्या प्रयत्नांमुळे जलवाहतुकीत ‘भगीरथ’ भरारीगंगा नदीत १३०० हून अधिक लांबीचा जलमार्ग होणार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे गंगा नदीतील जलवाहतुकीला ‘बूस्टर डोज’ मिळाला आहे. अनेक वर्षे अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला आहे. या मार्गातील अनेक अडथळे दूर झाले असून पुढील आठवड्यात जलवाहतुकीच्या क्षेत्राच्या इतिहासातील एक नवे पान लिहिल्या जाणार आहे हे विशेष. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कोलकात्याहून वाराणसीला जलमार्गातून १६ कंटेनर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: यावेळी तेथे उपस्थित राहणार आहेत.

वाराणसी-हल्दिया या देशांतर्गत जलमहामार्गाची घोषणा १९८६ सालीच करण्यात आली होती. पण त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही न होता हा प्रकल्प धूळखात पडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी ते पश्चिम बंगालमधील हल्दिया या १ हजार ३९० किलोमीटर लांबीच्या गंगेतील जलमार्गातून जलवाहतूक सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेकांनी हे केवळ आश्वासनच ठरेल अशी टीका केली होती. अनेक तज्ज्ञांनीदेखील ही बाब अशक्य असल्याचा दावा केला होता. मात्र नितीन गडकरी यांनी याबाबत स्वत: पुढाकार घेतला. या मार्गातील विविध अडथळे दूर कसे होतील याबाबत नियोजनबद्धरीतीने प्रयत्न करण्यात आले.जागतिक बँकेच्या मदतीने सुमारे ५ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आला आहे. टर्मिनलच्या निर्मितीमुळे आता वर्षभर मालवाहतूक जहाज या मार्गावर चालणार आहेत. यामुळे सुमारे २० हजार लोकांना रोजगारदेखील मिळणार आहे. कोलकाता येथून एका शीतपेय कंपनीच्या १२ ‘कंटेनर्स’ना घेऊन ‘एमव्ही आरएन टागोर’ ही बोट निघाली आहे. गंगेतून मजल दरमजल करीत ७ ते ८ नोव्हेंबरपर्यंत ती वाराणसी येथे पोहोचेल आणि १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान या बोटीचे स्वागत वाराणसी येथे करतील.विक्रमी वेळेत ‘टर्मिनल’ची उभारणीवाराणसी येथे विशेष ‘मल्टिमॉडेल टर्मिनल’देखील विकसित करण्यात आले असून पंतप्रधानांच्या हस्ते याचे १२ नोव्हेंबर रोजी लोकार्पण होईल. या ‘टर्मिनल’ची उभारणीदेखील विक्रमी वेळेत पूर्ण झाली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशा जलवाहतुकीस पुन्हा प्रारंभ होत असून केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पाचे हे मोठे यश मानण्यात येते आहे. या जलमार्गामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.हे मोठे यश : गडकरीस्वातंत्र्यानंतर देशातील जलमार्गातून जहाजावर ‘कंटेनर्स’ येणार आहेत. जलमार्ग ही काळाची गरज आहे व त्या हिशेबाने केंद्र सरकारने पावले उचलली. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून हे एक मोठं यश आहे. महत्त्वाचे म्हणजे वाराणसी येथील ‘टर्मिनल’ पूर्ण करण्यासाठी लागलेला कमी वेळ हा देखील एक विक्रमच आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVaranasiवाराणसी