शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

वाराणसी-हल्दिया जलमार्ग रचणार इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 21:12 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे गंगा नदीतील जलवाहतुकीला ‘बूस्टर डोज’ मिळाला आहे. अनेक वर्षे अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला आहे. या मार्गातील अनेक अडथळे दूर झाले असून पुढील आठवड्यात जलवाहतुकीच्या क्षेत्राच्या इतिहासातील एक नवे पान लिहिल्या जाणार आहे हे विशेष. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कोलकात्याहून वाराणसीला जलमार्गातून १६ कंटेनर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: यावेळी तेथे उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्देनितीन गडकरींच्या प्रयत्नांमुळे जलवाहतुकीत ‘भगीरथ’ भरारीगंगा नदीत १३०० हून अधिक लांबीचा जलमार्ग होणार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे गंगा नदीतील जलवाहतुकीला ‘बूस्टर डोज’ मिळाला आहे. अनेक वर्षे अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला आहे. या मार्गातील अनेक अडथळे दूर झाले असून पुढील आठवड्यात जलवाहतुकीच्या क्षेत्राच्या इतिहासातील एक नवे पान लिहिल्या जाणार आहे हे विशेष. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कोलकात्याहून वाराणसीला जलमार्गातून १६ कंटेनर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: यावेळी तेथे उपस्थित राहणार आहेत.

वाराणसी-हल्दिया या देशांतर्गत जलमहामार्गाची घोषणा १९८६ सालीच करण्यात आली होती. पण त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही न होता हा प्रकल्प धूळखात पडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी ते पश्चिम बंगालमधील हल्दिया या १ हजार ३९० किलोमीटर लांबीच्या गंगेतील जलमार्गातून जलवाहतूक सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेकांनी हे केवळ आश्वासनच ठरेल अशी टीका केली होती. अनेक तज्ज्ञांनीदेखील ही बाब अशक्य असल्याचा दावा केला होता. मात्र नितीन गडकरी यांनी याबाबत स्वत: पुढाकार घेतला. या मार्गातील विविध अडथळे दूर कसे होतील याबाबत नियोजनबद्धरीतीने प्रयत्न करण्यात आले.जागतिक बँकेच्या मदतीने सुमारे ५ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आला आहे. टर्मिनलच्या निर्मितीमुळे आता वर्षभर मालवाहतूक जहाज या मार्गावर चालणार आहेत. यामुळे सुमारे २० हजार लोकांना रोजगारदेखील मिळणार आहे. कोलकाता येथून एका शीतपेय कंपनीच्या १२ ‘कंटेनर्स’ना घेऊन ‘एमव्ही आरएन टागोर’ ही बोट निघाली आहे. गंगेतून मजल दरमजल करीत ७ ते ८ नोव्हेंबरपर्यंत ती वाराणसी येथे पोहोचेल आणि १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान या बोटीचे स्वागत वाराणसी येथे करतील.विक्रमी वेळेत ‘टर्मिनल’ची उभारणीवाराणसी येथे विशेष ‘मल्टिमॉडेल टर्मिनल’देखील विकसित करण्यात आले असून पंतप्रधानांच्या हस्ते याचे १२ नोव्हेंबर रोजी लोकार्पण होईल. या ‘टर्मिनल’ची उभारणीदेखील विक्रमी वेळेत पूर्ण झाली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशा जलवाहतुकीस पुन्हा प्रारंभ होत असून केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पाचे हे मोठे यश मानण्यात येते आहे. या जलमार्गामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.हे मोठे यश : गडकरीस्वातंत्र्यानंतर देशातील जलमार्गातून जहाजावर ‘कंटेनर्स’ येणार आहेत. जलमार्ग ही काळाची गरज आहे व त्या हिशेबाने केंद्र सरकारने पावले उचलली. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून हे एक मोठं यश आहे. महत्त्वाचे म्हणजे वाराणसी येथील ‘टर्मिनल’ पूर्ण करण्यासाठी लागलेला कमी वेळ हा देखील एक विक्रमच आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVaranasiवाराणसी