शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसी-हल्दिया जलमार्ग रचणार इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 21:12 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे गंगा नदीतील जलवाहतुकीला ‘बूस्टर डोज’ मिळाला आहे. अनेक वर्षे अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला आहे. या मार्गातील अनेक अडथळे दूर झाले असून पुढील आठवड्यात जलवाहतुकीच्या क्षेत्राच्या इतिहासातील एक नवे पान लिहिल्या जाणार आहे हे विशेष. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कोलकात्याहून वाराणसीला जलमार्गातून १६ कंटेनर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: यावेळी तेथे उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्देनितीन गडकरींच्या प्रयत्नांमुळे जलवाहतुकीत ‘भगीरथ’ भरारीगंगा नदीत १३०० हून अधिक लांबीचा जलमार्ग होणार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे गंगा नदीतील जलवाहतुकीला ‘बूस्टर डोज’ मिळाला आहे. अनेक वर्षे अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला आहे. या मार्गातील अनेक अडथळे दूर झाले असून पुढील आठवड्यात जलवाहतुकीच्या क्षेत्राच्या इतिहासातील एक नवे पान लिहिल्या जाणार आहे हे विशेष. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कोलकात्याहून वाराणसीला जलमार्गातून १६ कंटेनर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: यावेळी तेथे उपस्थित राहणार आहेत.

वाराणसी-हल्दिया या देशांतर्गत जलमहामार्गाची घोषणा १९८६ सालीच करण्यात आली होती. पण त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही न होता हा प्रकल्प धूळखात पडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी ते पश्चिम बंगालमधील हल्दिया या १ हजार ३९० किलोमीटर लांबीच्या गंगेतील जलमार्गातून जलवाहतूक सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेकांनी हे केवळ आश्वासनच ठरेल अशी टीका केली होती. अनेक तज्ज्ञांनीदेखील ही बाब अशक्य असल्याचा दावा केला होता. मात्र नितीन गडकरी यांनी याबाबत स्वत: पुढाकार घेतला. या मार्गातील विविध अडथळे दूर कसे होतील याबाबत नियोजनबद्धरीतीने प्रयत्न करण्यात आले.जागतिक बँकेच्या मदतीने सुमारे ५ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आला आहे. टर्मिनलच्या निर्मितीमुळे आता वर्षभर मालवाहतूक जहाज या मार्गावर चालणार आहेत. यामुळे सुमारे २० हजार लोकांना रोजगारदेखील मिळणार आहे. कोलकाता येथून एका शीतपेय कंपनीच्या १२ ‘कंटेनर्स’ना घेऊन ‘एमव्ही आरएन टागोर’ ही बोट निघाली आहे. गंगेतून मजल दरमजल करीत ७ ते ८ नोव्हेंबरपर्यंत ती वाराणसी येथे पोहोचेल आणि १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान या बोटीचे स्वागत वाराणसी येथे करतील.विक्रमी वेळेत ‘टर्मिनल’ची उभारणीवाराणसी येथे विशेष ‘मल्टिमॉडेल टर्मिनल’देखील विकसित करण्यात आले असून पंतप्रधानांच्या हस्ते याचे १२ नोव्हेंबर रोजी लोकार्पण होईल. या ‘टर्मिनल’ची उभारणीदेखील विक्रमी वेळेत पूर्ण झाली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशा जलवाहतुकीस पुन्हा प्रारंभ होत असून केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पाचे हे मोठे यश मानण्यात येते आहे. या जलमार्गामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.हे मोठे यश : गडकरीस्वातंत्र्यानंतर देशातील जलमार्गातून जहाजावर ‘कंटेनर्स’ येणार आहेत. जलमार्ग ही काळाची गरज आहे व त्या हिशेबाने केंद्र सरकारने पावले उचलली. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून हे एक मोठं यश आहे. महत्त्वाचे म्हणजे वाराणसी येथील ‘टर्मिनल’ पूर्ण करण्यासाठी लागलेला कमी वेळ हा देखील एक विक्रमच आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVaranasiवाराणसी