शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

उष:काल होता होता काळरात्र झाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:07 IST

श्याम नाडेकर/अविनाश गजभिये मोवाड : महापूर आणि भुस्खलनामुळे देशात मृत्यूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोल्हापूर, कोकण, चिपळून परिसरातील गावे ...

श्याम नाडेकर/अविनाश गजभिये

मोवाड : महापूर आणि भुस्खलनामुळे देशात मृत्यूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोल्हापूर, कोकण, चिपळून परिसरातील गावे पुराने उद्ध्वस्त केली आहेत. हे भीषण चित्र डोळ्यासमोरून जात असताना ३० वर्षांपूर्वीच्या मोवाडच्या (जि.नागपूर) भयकारी आठवणी ताज्या केल्या. २९ जुलै १९९१ ला मध्यरात्रीच्या कोसळधार पावसामुळे वर्धा नदीचा बांध पहाटे (दि.३०) फुटला आणि सकाळ होता होताच मोवाड एखादे मिसाईल टाकल्याप्रमाणे बेचिराख झाले ! हजारो कुटुंबांना उद्ध्वस्त करणाऱ्या या महापुराच्या आठवणी आजही अंगावर काटा उभा करतात.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या मोवाड गावात महापुराने काही क्षणात होत्याचे नव्हते केले. यात २०४ जणांना जलसमाधी मिळाली होती.

या गावाला वर्धा माय (नदी) चा आशीर्वाद. गावात संपन्नता व समृद्धी होती. ‘मोवाड सोन्याचं कवाड’ अशी ख्याती पंचक्रोशीत होती. दही, दुधाची मोठी बाजारपेठ, नदी परिसरातील सुपीक शेतजमिनीमुळे शेतकरी सधन, मजुरांच्या हातालाही काम, बेरोजगारीचा गंध नाही. हातमागाचे जवळपास ४५० मानके सतत सुरू असायचे.

जिल्ह्यातील पहिली नगर परिषद मोवाडच. वर्धा व कोलार नदीच्या मधोमध एखाद्या बेटाप्रमाणे मोवाड वर्धा नदीच्या काठावर वसले होते. दरवर्षी वर्धा नदीला पूर यायचा. पुरापासून गावाच्या संरक्षणाकरिता १९१८ साली मोवाड येथील समाजसेवक पापामियाँ यांनी मरामाय ते विठ्ठल मंदिरापर्यंत दगड चुन्याचा धक्का बांधला. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९५९ मध्ये विठ्ठल मंदिरापासून गावकऱ्यांच्या श्रमदानातून तीन किलोमीटर लांब, १२ फुट रुंद व १६ फुट उंच धक्का (बांध) निर्माण केला होता. यापूर्वी आलेल्या दोन पुरांना या दोन्ही धक्क्यांनी थोपवून गावाचे संरक्षण केले होते.

यामुळे आला महापूर

वर्धा नदी ही मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आली आहे. मध्य प्रदेशातील मुलताईजवळ वर्धा नदीवर चंदोरा बांधाची निर्मिती करण्यात आली होती. मध्य प्रदेशातही सतत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे चंदोरा बांधाच्या क्षमतेपेक्षा पाणी जास्त जमा झाल्यामुळे तो २९ जुलैच्या मध्यरात्रीनंतर फुटला व वर्धा नदीला महापूर आला. वर्धा नदीवर मोवाड गावाच्या वरच्या भागात रोजगार हमी योजनेतून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती. परंतु पुनर्बांधणीचे काम रेंगाळतच राहिले. इथेच घात झाला.

नदीने पात्र बदलेले तासाभरात सारे संपले !

चंदोरा बांध फुटल्यामुळे नदीच्या पात्रात पहाटे साडेचार पाचच्या दरम्यान पाण्याचा मोठ्या प्रमाणात लोंढा आला व त्यामुळे धक्का फुटून नदीने आपले पात्रच बदलविले. दुसरीकडे सततच्या मुसळधार पावसामुळे कोलार नदीलाही पूर आला होता. गाव चोहीबाजूने पुराच्या पाण्याने वेढले. पहाटे ५.३०च्या दरम्यान गावकऱ्यामध्ये खळबळ उडाली. प्रत्येक जण जीव वाचविण्याकरिता आश्रय शोधायला लागला. अवघ्या तासाभरात होत्याचे नव्हते झाले. कित्येक लोक पाण्यावर तरंगत वाहून जाऊ लागली.

आश्रयित ग्रामस्थांसह इमारतही वाहून गेली

मोवाड येथे पोलीस चौकीच्या समोरील भागात बंडू गुप्ता यांची तीन मजली इमारत होती. त्या इमारतीमध्ये १०० ते १५० लोकांनी आश्रय घेतला होता. ती इमारत ज्याप्रमाणे बांबूचे ताबूत पाण्यावर तरंगत वाहून जाते अगदी तशीच फाउंडेशनसह वाहून गेली होती. काहींनी मारोतराव ठोंबरे यांच्या इमारतीवरही अनेकांनी आश्रय घेतला होता. तिही इमारत पूर्णत: वाहून गेली. कुटुंबीयांसह आश्रयितांना जलसमाधी मिळाली.