शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

उष:काल होता होता काळरात्र झाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:07 IST

श्याम नाडेकर/अविनाश गजभिये मोवाड : महापूर आणि भुस्खलनामुळे देशात मृत्यूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोल्हापूर, कोकण, चिपळून परिसरातील गावे ...

श्याम नाडेकर/अविनाश गजभिये

मोवाड : महापूर आणि भुस्खलनामुळे देशात मृत्यूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोल्हापूर, कोकण, चिपळून परिसरातील गावे पुराने उद्ध्वस्त केली आहेत. हे भीषण चित्र डोळ्यासमोरून जात असताना ३० वर्षांपूर्वीच्या मोवाडच्या (जि.नागपूर) भयकारी आठवणी ताज्या केल्या. २९ जुलै १९९१ ला मध्यरात्रीच्या कोसळधार पावसामुळे वर्धा नदीचा बांध पहाटे (दि.३०) फुटला आणि सकाळ होता होताच मोवाड एखादे मिसाईल टाकल्याप्रमाणे बेचिराख झाले ! हजारो कुटुंबांना उद्ध्वस्त करणाऱ्या या महापुराच्या आठवणी आजही अंगावर काटा उभा करतात.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या मोवाड गावात महापुराने काही क्षणात होत्याचे नव्हते केले. यात २०४ जणांना जलसमाधी मिळाली होती.

या गावाला वर्धा माय (नदी) चा आशीर्वाद. गावात संपन्नता व समृद्धी होती. ‘मोवाड सोन्याचं कवाड’ अशी ख्याती पंचक्रोशीत होती. दही, दुधाची मोठी बाजारपेठ, नदी परिसरातील सुपीक शेतजमिनीमुळे शेतकरी सधन, मजुरांच्या हातालाही काम, बेरोजगारीचा गंध नाही. हातमागाचे जवळपास ४५० मानके सतत सुरू असायचे.

जिल्ह्यातील पहिली नगर परिषद मोवाडच. वर्धा व कोलार नदीच्या मधोमध एखाद्या बेटाप्रमाणे मोवाड वर्धा नदीच्या काठावर वसले होते. दरवर्षी वर्धा नदीला पूर यायचा. पुरापासून गावाच्या संरक्षणाकरिता १९१८ साली मोवाड येथील समाजसेवक पापामियाँ यांनी मरामाय ते विठ्ठल मंदिरापर्यंत दगड चुन्याचा धक्का बांधला. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९५९ मध्ये विठ्ठल मंदिरापासून गावकऱ्यांच्या श्रमदानातून तीन किलोमीटर लांब, १२ फुट रुंद व १६ फुट उंच धक्का (बांध) निर्माण केला होता. यापूर्वी आलेल्या दोन पुरांना या दोन्ही धक्क्यांनी थोपवून गावाचे संरक्षण केले होते.

यामुळे आला महापूर

वर्धा नदी ही मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आली आहे. मध्य प्रदेशातील मुलताईजवळ वर्धा नदीवर चंदोरा बांधाची निर्मिती करण्यात आली होती. मध्य प्रदेशातही सतत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे चंदोरा बांधाच्या क्षमतेपेक्षा पाणी जास्त जमा झाल्यामुळे तो २९ जुलैच्या मध्यरात्रीनंतर फुटला व वर्धा नदीला महापूर आला. वर्धा नदीवर मोवाड गावाच्या वरच्या भागात रोजगार हमी योजनेतून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती. परंतु पुनर्बांधणीचे काम रेंगाळतच राहिले. इथेच घात झाला.

नदीने पात्र बदलेले तासाभरात सारे संपले !

चंदोरा बांध फुटल्यामुळे नदीच्या पात्रात पहाटे साडेचार पाचच्या दरम्यान पाण्याचा मोठ्या प्रमाणात लोंढा आला व त्यामुळे धक्का फुटून नदीने आपले पात्रच बदलविले. दुसरीकडे सततच्या मुसळधार पावसामुळे कोलार नदीलाही पूर आला होता. गाव चोहीबाजूने पुराच्या पाण्याने वेढले. पहाटे ५.३०च्या दरम्यान गावकऱ्यामध्ये खळबळ उडाली. प्रत्येक जण जीव वाचविण्याकरिता आश्रय शोधायला लागला. अवघ्या तासाभरात होत्याचे नव्हते झाले. कित्येक लोक पाण्यावर तरंगत वाहून जाऊ लागली.

आश्रयित ग्रामस्थांसह इमारतही वाहून गेली

मोवाड येथे पोलीस चौकीच्या समोरील भागात बंडू गुप्ता यांची तीन मजली इमारत होती. त्या इमारतीमध्ये १०० ते १५० लोकांनी आश्रय घेतला होता. ती इमारत ज्याप्रमाणे बांबूचे ताबूत पाण्यावर तरंगत वाहून जाते अगदी तशीच फाउंडेशनसह वाहून गेली होती. काहींनी मारोतराव ठोंबरे यांच्या इमारतीवरही अनेकांनी आश्रय घेतला होता. तिही इमारत पूर्णत: वाहून गेली. कुटुंबीयांसह आश्रयितांना जलसमाधी मिळाली.