शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

उष:काल होता होता काळरात्र झाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:07 IST

श्याम नाडेकर/अविनाश गजभिये मोवाड : महापूर आणि भुस्खलनामुळे देशात मृत्यूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोल्हापूर, कोकण, चिपळून परिसरातील गावे ...

श्याम नाडेकर/अविनाश गजभिये

मोवाड : महापूर आणि भुस्खलनामुळे देशात मृत्यूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोल्हापूर, कोकण, चिपळून परिसरातील गावे पुराने उद्ध्वस्त केली आहेत. हे भीषण चित्र डोळ्यासमोरून जात असताना ३० वर्षांपूर्वीच्या मोवाडच्या (जि.नागपूर) भयकारी आठवणी ताज्या केल्या. २९ जुलै १९९१ ला मध्यरात्रीच्या कोसळधार पावसामुळे वर्धा नदीचा बांध पहाटे (दि.३०) फुटला आणि सकाळ होता होताच मोवाड एखादे मिसाईल टाकल्याप्रमाणे बेचिराख झाले ! हजारो कुटुंबांना उद्ध्वस्त करणाऱ्या या महापुराच्या आठवणी आजही अंगावर काटा उभा करतात.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या मोवाड गावात महापुराने काही क्षणात होत्याचे नव्हते केले. यात २०४ जणांना जलसमाधी मिळाली होती.

या गावाला वर्धा माय (नदी) चा आशीर्वाद. गावात संपन्नता व समृद्धी होती. ‘मोवाड सोन्याचं कवाड’ अशी ख्याती पंचक्रोशीत होती. दही, दुधाची मोठी बाजारपेठ, नदी परिसरातील सुपीक शेतजमिनीमुळे शेतकरी सधन, मजुरांच्या हातालाही काम, बेरोजगारीचा गंध नाही. हातमागाचे जवळपास ४५० मानके सतत सुरू असायचे.

जिल्ह्यातील पहिली नगर परिषद मोवाडच. वर्धा व कोलार नदीच्या मधोमध एखाद्या बेटाप्रमाणे मोवाड वर्धा नदीच्या काठावर वसले होते. दरवर्षी वर्धा नदीला पूर यायचा. पुरापासून गावाच्या संरक्षणाकरिता १९१८ साली मोवाड येथील समाजसेवक पापामियाँ यांनी मरामाय ते विठ्ठल मंदिरापर्यंत दगड चुन्याचा धक्का बांधला. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९५९ मध्ये विठ्ठल मंदिरापासून गावकऱ्यांच्या श्रमदानातून तीन किलोमीटर लांब, १२ फुट रुंद व १६ फुट उंच धक्का (बांध) निर्माण केला होता. यापूर्वी आलेल्या दोन पुरांना या दोन्ही धक्क्यांनी थोपवून गावाचे संरक्षण केले होते.

यामुळे आला महापूर

वर्धा नदी ही मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आली आहे. मध्य प्रदेशातील मुलताईजवळ वर्धा नदीवर चंदोरा बांधाची निर्मिती करण्यात आली होती. मध्य प्रदेशातही सतत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे चंदोरा बांधाच्या क्षमतेपेक्षा पाणी जास्त जमा झाल्यामुळे तो २९ जुलैच्या मध्यरात्रीनंतर फुटला व वर्धा नदीला महापूर आला. वर्धा नदीवर मोवाड गावाच्या वरच्या भागात रोजगार हमी योजनेतून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती. परंतु पुनर्बांधणीचे काम रेंगाळतच राहिले. इथेच घात झाला.

नदीने पात्र बदलेले तासाभरात सारे संपले !

चंदोरा बांध फुटल्यामुळे नदीच्या पात्रात पहाटे साडेचार पाचच्या दरम्यान पाण्याचा मोठ्या प्रमाणात लोंढा आला व त्यामुळे धक्का फुटून नदीने आपले पात्रच बदलविले. दुसरीकडे सततच्या मुसळधार पावसामुळे कोलार नदीलाही पूर आला होता. गाव चोहीबाजूने पुराच्या पाण्याने वेढले. पहाटे ५.३०च्या दरम्यान गावकऱ्यामध्ये खळबळ उडाली. प्रत्येक जण जीव वाचविण्याकरिता आश्रय शोधायला लागला. अवघ्या तासाभरात होत्याचे नव्हते झाले. कित्येक लोक पाण्यावर तरंगत वाहून जाऊ लागली.

आश्रयित ग्रामस्थांसह इमारतही वाहून गेली

मोवाड येथे पोलीस चौकीच्या समोरील भागात बंडू गुप्ता यांची तीन मजली इमारत होती. त्या इमारतीमध्ये १०० ते १५० लोकांनी आश्रय घेतला होता. ती इमारत ज्याप्रमाणे बांबूचे ताबूत पाण्यावर तरंगत वाहून जाते अगदी तशीच फाउंडेशनसह वाहून गेली होती. काहींनी मारोतराव ठोंबरे यांच्या इमारतीवरही अनेकांनी आश्रय घेतला होता. तिही इमारत पूर्णत: वाहून गेली. कुटुंबीयांसह आश्रयितांना जलसमाधी मिळाली.