शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पुन्हा वाढला ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:07 IST

नागपूर : प्लास्टिकवर लावलेले निर्बंध आता कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष हाेत असल्याने १० मायक्राॅनपेक्षा कमी वजनाच्या सिंगल ...

नागपूर : प्लास्टिकवर लावलेले निर्बंध आता कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष हाेत असल्याने १० मायक्राॅनपेक्षा कमी वजनाच्या सिंगल यूज प्लास्टिकचा वापर सर्रासपणे केला जात आहे. बाजारातील किरकाेळ विक्रेते बिनदिक्कतपणे ग्राहकांना प्लास्टिक पिशव्यांमध्ये सामान देत असून, वेळेत मिळणाऱ्या सुविधेसाठी ग्राहकही पर्यावरणाला हाेणाऱ्या धाेक्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

लाेकांच्या घरातून दरराेज प्लास्टिकचा कचरा बाहेर पडत आहे. याचा अर्थ ताे बाहेर मिळत आहे. आजघडीला कुठलाही भाजी विक्रेता, फळविक्रेता किंवा किराणा दुकानात सहजपणे प्लास्टिकच्या पिशव्या सामानासाठी दिल्या जात आहेत. आधी नाही म्हटले जाते, पण नंतर ग्राहकांकडून आग्रह केल्यानंतर तुम्हाला त्या पिशव्यात साहित्य दिले जाते. एवढेच नाही तर सिंगल यूज प्लास्टिकपासून बनलेले पात्र व इतर साहित्याचीही विक्री जाेरात सुरू आहे. काही वर्षांपूर्वी कडक निर्बंध लावण्यात आले. मनपा व जिल्हा प्रशासनाद्वारे प्लास्टिकमुक्त अभियान चालविण्यात आले. धडक कारवाई सुरू झाली. त्यामुळे प्लास्टिक वापरावर काही प्रमाणात अंकुश आले हाेते. मात्र आता पुन्हा परिस्थिती बदलली आहे. गेल्या वर्षीपासून काेराेना काळात कारवाई शिथिल झाल्याने पुन्हा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. किरकाेळ माल विक्रेते, फळ विक्रेत्यांकडून तर खुलेआम वापर केला जात आहे. यामुळे पुन्हा पर्यावरणावर विपरीत परिणाम हाेत आहे. विशेषत: जनावरांवर आणि जंगलातील झाडांवर याचे प्रदूषणाचे परिणाम हाेत आहेत.

काेराेनामुळे कारवाई शिथिल

सध्या नागपुरातही काेराेनाने थैमान घातले आहे. दरराेज निघणारा रुग्णांचा आकडा थरकाप उडविणारा आहे. त्यामुळे महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा महामारीवर नियंत्रण मिळविण्याच्या कामी लागली आहे. त्यामुळे साहजिकच इतर गाेष्टींकडे दुर्लक्ष हाेत आहे. काेराेना निपटू द्या, मग बघू काय करायचे, अशी भावना मनपाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त हाेत आहे.

दुकानदारांकडून खुलेआम वाटप

किरकाेळ साहित्य विक्रेते, भाजी विक्रेते, फळे विक्रेते, दूध, खाद्यसामग्री, घरगुती साहित्य प्लास्टिक पिशव्यांमधून दिल्या जात आहेत. प्रशासनाकडून कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याने यांचे चांगलेच फावले आहे. उपयाेगानंतर फेकल्याने तेच प्लास्टिक डाेकेदुखी ठरत आहे. जनावरांच्या पाेटात जात आहे. नदी, नाल्यांचा प्रवाह राेखत आहे.

नागरिकही तेवढेच जबाबदार

प्रशासनाची कारवाई थांबली असल्याने दुकानदार वापर करीत आहेत. पण यात नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. प्रतिबंध लावल्याशिवाय एखादी वस्तू नाकारण्याचा प्रामाणिकपणा आपल्याला सुचत नाही. लाेक मागतात म्हणून दुकानदार देतात आणि दुकानदार देतात म्हणून बिनदिक्कतपणे आपण ती घेताे. प्लास्टिक पर्यावरणासाठी हानीकारक आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण त्यानुसार कुणी वागत नाही. पर्याय उपलब्ध असताना बेजबाबदारपणा का करण्यात येताे, असा सवाल तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.