शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पुन्हा वाढला ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:07 IST

नागपूर : प्लास्टिकवर लावलेले निर्बंध आता कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष हाेत असल्याने १० मायक्राॅनपेक्षा कमी वजनाच्या सिंगल ...

नागपूर : प्लास्टिकवर लावलेले निर्बंध आता कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष हाेत असल्याने १० मायक्राॅनपेक्षा कमी वजनाच्या सिंगल यूज प्लास्टिकचा वापर सर्रासपणे केला जात आहे. बाजारातील किरकाेळ विक्रेते बिनदिक्कतपणे ग्राहकांना प्लास्टिक पिशव्यांमध्ये सामान देत असून, वेळेत मिळणाऱ्या सुविधेसाठी ग्राहकही पर्यावरणाला हाेणाऱ्या धाेक्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

लाेकांच्या घरातून दरराेज प्लास्टिकचा कचरा बाहेर पडत आहे. याचा अर्थ ताे बाहेर मिळत आहे. आजघडीला कुठलाही भाजी विक्रेता, फळविक्रेता किंवा किराणा दुकानात सहजपणे प्लास्टिकच्या पिशव्या सामानासाठी दिल्या जात आहेत. आधी नाही म्हटले जाते, पण नंतर ग्राहकांकडून आग्रह केल्यानंतर तुम्हाला त्या पिशव्यात साहित्य दिले जाते. एवढेच नाही तर सिंगल यूज प्लास्टिकपासून बनलेले पात्र व इतर साहित्याचीही विक्री जाेरात सुरू आहे. काही वर्षांपूर्वी कडक निर्बंध लावण्यात आले. मनपा व जिल्हा प्रशासनाद्वारे प्लास्टिकमुक्त अभियान चालविण्यात आले. धडक कारवाई सुरू झाली. त्यामुळे प्लास्टिक वापरावर काही प्रमाणात अंकुश आले हाेते. मात्र आता पुन्हा परिस्थिती बदलली आहे. गेल्या वर्षीपासून काेराेना काळात कारवाई शिथिल झाल्याने पुन्हा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. किरकाेळ माल विक्रेते, फळ विक्रेत्यांकडून तर खुलेआम वापर केला जात आहे. यामुळे पुन्हा पर्यावरणावर विपरीत परिणाम हाेत आहे. विशेषत: जनावरांवर आणि जंगलातील झाडांवर याचे प्रदूषणाचे परिणाम हाेत आहेत.

काेराेनामुळे कारवाई शिथिल

सध्या नागपुरातही काेराेनाने थैमान घातले आहे. दरराेज निघणारा रुग्णांचा आकडा थरकाप उडविणारा आहे. त्यामुळे महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा महामारीवर नियंत्रण मिळविण्याच्या कामी लागली आहे. त्यामुळे साहजिकच इतर गाेष्टींकडे दुर्लक्ष हाेत आहे. काेराेना निपटू द्या, मग बघू काय करायचे, अशी भावना मनपाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त हाेत आहे.

दुकानदारांकडून खुलेआम वाटप

किरकाेळ साहित्य विक्रेते, भाजी विक्रेते, फळे विक्रेते, दूध, खाद्यसामग्री, घरगुती साहित्य प्लास्टिक पिशव्यांमधून दिल्या जात आहेत. प्रशासनाकडून कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याने यांचे चांगलेच फावले आहे. उपयाेगानंतर फेकल्याने तेच प्लास्टिक डाेकेदुखी ठरत आहे. जनावरांच्या पाेटात जात आहे. नदी, नाल्यांचा प्रवाह राेखत आहे.

नागरिकही तेवढेच जबाबदार

प्रशासनाची कारवाई थांबली असल्याने दुकानदार वापर करीत आहेत. पण यात नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. प्रतिबंध लावल्याशिवाय एखादी वस्तू नाकारण्याचा प्रामाणिकपणा आपल्याला सुचत नाही. लाेक मागतात म्हणून दुकानदार देतात आणि दुकानदार देतात म्हणून बिनदिक्कतपणे आपण ती घेताे. प्लास्टिक पर्यावरणासाठी हानीकारक आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण त्यानुसार कुणी वागत नाही. पर्याय उपलब्ध असताना बेजबाबदारपणा का करण्यात येताे, असा सवाल तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.