शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे संत्री पिकाच्या मृग बहरावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : मागील वर्षी संत्र्यांच्या अंबिया व मृग बहराचे उत्पादन कमी झाल्याने यावर्षी मृग बहराच्या संत्र्यांचे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : मागील वर्षी संत्र्यांच्या अंबिया व मृग बहराचे उत्पादन कमी झाल्याने यावर्षी मृग बहराच्या संत्र्यांचे चांगले उत्पादन हाेण्याची आशा पल्लवित झाली हाेती. मात्र, एप्रिल व मेमध्ये काेसळलेल्या अवकाळी व मान्सूनपूर्व पावसामुळे संत्रा बागांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ताण पडला नाही. त्यामुळे संत्र्याच्या मृग बहराच्या फुटीवर विपरीत परिणाम हाेऊ शकताे, अशी माहिती काटाेल येथील प्रादेशिक फळ संशाेधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली आहे.

यासंदर्भात डाॅ. प्रदीप दवणे यांनी सांगितले की, उन्हाळ्यात पाेषक हवामान निर्माण हाेत नसल्याने संत्र्याच्या झाडाला नवीन फूट येत नाही. नवीन वाढीसाठी लागणारी साखर या काळात शिल्लक राहून त्याचा झाडांच्या फांद्यांमध्ये संचय हाेताे. हवामान अनुकूल असल्यास जून-जुलैमध्ये मृग बहराची तर ऋतू बदल झाल्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अंबिया बहराची फूट हाेते. त्यासाठी प्रथम फांद्यांमध्ये अन्नद्रव्यांचा संचय हाेणे आवश्यक असते. या काळात झाडांना ताण बसल्यास मृग अथवा अंबिया बहराची चांगली फूट हाेते.

अवकाळी पाऊस येऊन गेल्यास तसेच झाडांची २० ते २५ टक्के पानगळ न झाल्यास सर्वप्रथम जमिनीची उभी व आडवी वखरणी करावी. संत्रा व माेसंबीच्या झाडांवर लिव्हाेसिन हारमाेनची फवारणी करावी. हे वाढवर्धक असल्याने झाडे फुटण्यास मदत हाेते. १५ ते २० जूननंतर तसेच जुलै व सप्टेंबरमध्ये झाडांना रासायनिक खतांच्या अर्थात एक किलाे नत्र व अर्धा किलाे स्फूरद या प्रमाणात दाेन मात्रा द्याव्या. त्यानंतर प्रत्येक झाडाला ३० ते ५० किलाे शेणखत द्यावे. या शेणखतात ट्रायकाेडर्मा हर्जालियम मिसळवावे. पालाशची मात्रा जमिनीच्या परिक्षणानुसार द्यावी. जूनमध्ये पाऊस न आल्यास झाडांना थाेडे पाणी द्यावे. फळधारणा झाल्यानंतर ती टिकवण्यासाठी झाडांवर नत्र व प्लॅनाेफिक्सची फवारणी करावी, असा सल्लाही कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांना दिला आहे.

....

चुनखडीमुळे झाडांना कमी ताण

विदर्भातील माती काळी व भारीची असून, चिकन माती दाेन ते तीन फुटांपर्यंत आहे. शिवाय, या जमिनीत चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे संत्रा झाडांना ताण कमी बसताे. त्यात अवकाळी पाऊस आल्यास किंवा मान्सूनचा पाऊस ९० मिमीपेक्षा अधिक झाल्यास झाडांना पुरेसा ताण बसत नाही. जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यास झाडांचा तंतुमय (मुळांचा जाळवा) सडताे, असेही डाॅ. प्रदीप दवणे यांनी सांगितले.