शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
2
"मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफची 'वकिली'
3
"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार
4
चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'; 'या' दिग्गजाला आपल्यावर इतका का भरवसा?
5
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
6
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला?
7
झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार
8
नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?
9
नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..."
10
वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले
11
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
12
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
13
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
14
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
15
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
16
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
17
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
18
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
19
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
20
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल

अवकाळी पावसामुळे संत्री पिकाच्या मृग बहरावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : मागील वर्षी संत्र्यांच्या अंबिया व मृग बहराचे उत्पादन कमी झाल्याने यावर्षी मृग बहराच्या संत्र्यांचे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : मागील वर्षी संत्र्यांच्या अंबिया व मृग बहराचे उत्पादन कमी झाल्याने यावर्षी मृग बहराच्या संत्र्यांचे चांगले उत्पादन हाेण्याची आशा पल्लवित झाली हाेती. मात्र, एप्रिल व मेमध्ये काेसळलेल्या अवकाळी व मान्सूनपूर्व पावसामुळे संत्रा बागांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ताण पडला नाही. त्यामुळे संत्र्याच्या मृग बहराच्या फुटीवर विपरीत परिणाम हाेऊ शकताे, अशी माहिती काटाेल येथील प्रादेशिक फळ संशाेधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली आहे.

यासंदर्भात डाॅ. प्रदीप दवणे यांनी सांगितले की, उन्हाळ्यात पाेषक हवामान निर्माण हाेत नसल्याने संत्र्याच्या झाडाला नवीन फूट येत नाही. नवीन वाढीसाठी लागणारी साखर या काळात शिल्लक राहून त्याचा झाडांच्या फांद्यांमध्ये संचय हाेताे. हवामान अनुकूल असल्यास जून-जुलैमध्ये मृग बहराची तर ऋतू बदल झाल्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अंबिया बहराची फूट हाेते. त्यासाठी प्रथम फांद्यांमध्ये अन्नद्रव्यांचा संचय हाेणे आवश्यक असते. या काळात झाडांना ताण बसल्यास मृग अथवा अंबिया बहराची चांगली फूट हाेते.

अवकाळी पाऊस येऊन गेल्यास तसेच झाडांची २० ते २५ टक्के पानगळ न झाल्यास सर्वप्रथम जमिनीची उभी व आडवी वखरणी करावी. संत्रा व माेसंबीच्या झाडांवर लिव्हाेसिन हारमाेनची फवारणी करावी. हे वाढवर्धक असल्याने झाडे फुटण्यास मदत हाेते. १५ ते २० जूननंतर तसेच जुलै व सप्टेंबरमध्ये झाडांना रासायनिक खतांच्या अर्थात एक किलाे नत्र व अर्धा किलाे स्फूरद या प्रमाणात दाेन मात्रा द्याव्या. त्यानंतर प्रत्येक झाडाला ३० ते ५० किलाे शेणखत द्यावे. या शेणखतात ट्रायकाेडर्मा हर्जालियम मिसळवावे. पालाशची मात्रा जमिनीच्या परिक्षणानुसार द्यावी. जूनमध्ये पाऊस न आल्यास झाडांना थाेडे पाणी द्यावे. फळधारणा झाल्यानंतर ती टिकवण्यासाठी झाडांवर नत्र व प्लॅनाेफिक्सची फवारणी करावी, असा सल्लाही कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांना दिला आहे.

....

चुनखडीमुळे झाडांना कमी ताण

विदर्भातील माती काळी व भारीची असून, चिकन माती दाेन ते तीन फुटांपर्यंत आहे. शिवाय, या जमिनीत चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे संत्रा झाडांना ताण कमी बसताे. त्यात अवकाळी पाऊस आल्यास किंवा मान्सूनचा पाऊस ९० मिमीपेक्षा अधिक झाल्यास झाडांना पुरेसा ताण बसत नाही. जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यास झाडांचा तंतुमय (मुळांचा जाळवा) सडताे, असेही डाॅ. प्रदीप दवणे यांनी सांगितले.