लॉकडाऊनमुळे गतवर्षभरापासून ऑटो चालकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. रोजगार बंद असल्याने अनेक ऑटो चालकांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. अशावेळी शासनाने हलाखीचे जीवन जगणाऱ्या ऑटो चालक-मालकांना मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने ऑटोचालकासाठी जी योजना आणली आहे, तिचा लाभ केवळ परवानाधारक ऑटोचालकांना मिळतो आहे. मात्र ग्रामीण भागात ही संख्या कमी आहे. त्यामुळे शासकीय योजनांसाठी विनापरवाना धारक ऑटो चालक-मालकांचा विचार व्हावा अशी मागणी आहे. तहसीलदारांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात ऑटो चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अर्जुन गोसावी, उपाध्यक्ष शेखर जंगम, सचिव अफसर शेख, सहसचिव रवींद्र बागडे, राहुल कठाने, घनश्याम गायधने, सलीम शेख, धीरज सोमकुवर, रियाज शेख, जगदीश ढोके, चरण बारई, आदींचा समावेश होता.
विनापरवानाधारक ऑटो चालक-मालकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST