शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

विद्यापीठात मूल्यांकनाचे ‘मॅजिक’?

By admin | Updated: August 4, 2014 00:49 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरळीतपणे संपल्याचे दावे करण्यात येत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र दिव्याखाली अंधारच असल्याचे चित्र आहे.

एलएलबी अभ्यासक्रम : दोन विषयांत विद्यार्थ्यांना ‘सेम टू सेम’ गुणनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरळीतपणे संपल्याचे दावे करण्यात येत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र दिव्याखाली अंधारच असल्याचे चित्र आहे. तीन वर्षीय ‘एलएलबी’च्या चौथ्या सेमिस्टरच्या (सीबीएस) निकालात एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चक्क दोन विषयांत सारखे गुण देण्याची बाब समोर आली आहे. या मागे विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रणालीचे ‘मॅजिक’ आहे की घाईगडबडीत झालेला सावळागोंधळ असा संभ्रम निर्माण झाला आहे. शंभराव्या दीक्षांत समारंभाची तयारी करणाऱ्या विद्यापीठाने अजूनही काही धडा घेतला नाही का असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे. ‘एलएलबी’च्या चौथ्या सेमिस्टरची परीक्षा मे च्या दुसऱ्या पंधरवड्यात संपली. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांनंतर २८ जुलै रोजी विद्यार्थ्यांचा निकाल लागला. परंतु संकेतस्थळावर गुणपत्रिका पाहताच विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. जे विद्यार्थी परीक्षेत अनुपस्थित होते, त्यांना चक्क गुण देण्यात आले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच चांगले गुण मिळत होते, त्यांना अनुपस्थित दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकमेकांना विचारणा केल्यानंतर त्यांना आणखी एक धक्का बसला. ‘लेबर लॉ-२’ आणि ‘पब्लिक इंटरनॅशनल लॉ’ या दोन्ही विषयांत विद्यार्थ्याला सारखे गुण देण्यात आले आहेत. म्हणजेच ‘लेबर लॉ-२’मध्ये ४५ गुण असतील तर ‘पब्लिक इंटरनॅशनल लॉ’ या विषयातही तितकेच गुण आहेत. एक-दोन विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा योगायोग होऊ शकतो. परंतु ६० ते ७० विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालेला हा योगायोग की विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा नमुना असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंबंधात संकेतस्थळावर पाहणी केली असता रविवारी संबंधित निकाल काढून घेतला असल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)