शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विद्यापीठात मूल्यांकनाचे ‘मॅजिक’?

By admin | Updated: August 4, 2014 00:49 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरळीतपणे संपल्याचे दावे करण्यात येत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र दिव्याखाली अंधारच असल्याचे चित्र आहे.

एलएलबी अभ्यासक्रम : दोन विषयांत विद्यार्थ्यांना ‘सेम टू सेम’ गुणनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरळीतपणे संपल्याचे दावे करण्यात येत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र दिव्याखाली अंधारच असल्याचे चित्र आहे. तीन वर्षीय ‘एलएलबी’च्या चौथ्या सेमिस्टरच्या (सीबीएस) निकालात एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चक्क दोन विषयांत सारखे गुण देण्याची बाब समोर आली आहे. या मागे विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रणालीचे ‘मॅजिक’ आहे की घाईगडबडीत झालेला सावळागोंधळ असा संभ्रम निर्माण झाला आहे. शंभराव्या दीक्षांत समारंभाची तयारी करणाऱ्या विद्यापीठाने अजूनही काही धडा घेतला नाही का असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे. ‘एलएलबी’च्या चौथ्या सेमिस्टरची परीक्षा मे च्या दुसऱ्या पंधरवड्यात संपली. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांनंतर २८ जुलै रोजी विद्यार्थ्यांचा निकाल लागला. परंतु संकेतस्थळावर गुणपत्रिका पाहताच विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. जे विद्यार्थी परीक्षेत अनुपस्थित होते, त्यांना चक्क गुण देण्यात आले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच चांगले गुण मिळत होते, त्यांना अनुपस्थित दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकमेकांना विचारणा केल्यानंतर त्यांना आणखी एक धक्का बसला. ‘लेबर लॉ-२’ आणि ‘पब्लिक इंटरनॅशनल लॉ’ या दोन्ही विषयांत विद्यार्थ्याला सारखे गुण देण्यात आले आहेत. म्हणजेच ‘लेबर लॉ-२’मध्ये ४५ गुण असतील तर ‘पब्लिक इंटरनॅशनल लॉ’ या विषयातही तितकेच गुण आहेत. एक-दोन विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा योगायोग होऊ शकतो. परंतु ६० ते ७० विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालेला हा योगायोग की विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा नमुना असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंबंधात संकेतस्थळावर पाहणी केली असता रविवारी संबंधित निकाल काढून घेतला असल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)