शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
5
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
6
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
7
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
8
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
9
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
10
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
11
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
12
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
13
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
14
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
15
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
16
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
17
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
18
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
19
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
20
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार

अभियांत्रिकीच्या परीक्षेत विद्यापीठ पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:09 IST

नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी शनिवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. आज अभियांत्रिकी, बीएस्सी व बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या परीक्षा ...

नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी शनिवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. आज अभियांत्रिकी, बीएस्सी व बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या परीक्षा अडचणीविना पार पडल्या. २०२० च्या हिवाळी परीक्षेच्या तिसऱ्या दिवशी ३५ हजार २७१ पैकी ३३ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिली. यामधून ३१ हजार १४८ म्हणजे ९८.५८ टक्के विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका जमा केल्या.

उल्लेखनीय म्हणजे जुना अनुभव बघता विद्यापीठाचा परीक्षा विभाग परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी तणावात हाेता. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला हाेता. त्यामुळे पहिल्या दिवशीची परीक्षा रद्द करावी लागली. माहितीनुसार परीक्षेच्या वेळी अडचणी येऊ नये म्हणून ऑनलाईन परीक्षेत विद्यापीठाची मदत करणाऱ्या प्राेमार्क कंपनीच्या टेक्निकल टीमला बाेलावण्यात आले हाेते. परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी व परीक्षेच्या वेळी सातत्याने सर्व्हरवर लक्ष ठेवण्यात आले. साेबतच हेल्पलाईन क्रमांकालाही सक्रिय ठेवण्यात आले हाेते, जेणेकरून काेणत्याही विद्यार्थ्याला अडचण आली तर तत्काळ दुरुस्त करता येईल.

सूत्रानुसार ९७ टक्के विद्यार्थ्यांनी माेबाईलवरच प्रश्नपत्रिका साेडविली. काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या, पण त्यांना तत्काळ दूर करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणे साेपे गेले. विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ वाजताच्या सत्रात १६ हजार ८५४ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधून १५ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका जमा केली. दुसरे सत्र सकाळी ११.३० वाजता सुरू करण्यात आले. यामध्ये १४,६६० पैकी १४,२२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व सर्वांनी यशस्वीपणे सबमीटही केले. तिसऱ्या सत्रात ३,७५५ पैकी ३,४७४ विद्यार्थी सहभागी झाले. ३,४४५ विद्यार्थ्यांनी सबमीट केले.

पुनर्परीक्षेवर हाेणार विचार

याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले, परीक्षा आणखी अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. काही विद्यार्थी परीक्षा का देऊ शकले नाही, यावर विचार हाेईल. साेबतच डेटाचे विश्लेषण करून ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यांची परीक्षा पुन्हा घेण्याबाबत विचार करण्यात येईल.