शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या परीक्षेत विद्यापीठ पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:09 IST

नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी शनिवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. आज अभियांत्रिकी, बीएस्सी व बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या परीक्षा ...

नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी शनिवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. आज अभियांत्रिकी, बीएस्सी व बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या परीक्षा अडचणीविना पार पडल्या. २०२० च्या हिवाळी परीक्षेच्या तिसऱ्या दिवशी ३५ हजार २७१ पैकी ३३ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिली. यामधून ३१ हजार १४८ म्हणजे ९८.५८ टक्के विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका जमा केल्या.

उल्लेखनीय म्हणजे जुना अनुभव बघता विद्यापीठाचा परीक्षा विभाग परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी तणावात हाेता. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला हाेता. त्यामुळे पहिल्या दिवशीची परीक्षा रद्द करावी लागली. माहितीनुसार परीक्षेच्या वेळी अडचणी येऊ नये म्हणून ऑनलाईन परीक्षेत विद्यापीठाची मदत करणाऱ्या प्राेमार्क कंपनीच्या टेक्निकल टीमला बाेलावण्यात आले हाेते. परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी व परीक्षेच्या वेळी सातत्याने सर्व्हरवर लक्ष ठेवण्यात आले. साेबतच हेल्पलाईन क्रमांकालाही सक्रिय ठेवण्यात आले हाेते, जेणेकरून काेणत्याही विद्यार्थ्याला अडचण आली तर तत्काळ दुरुस्त करता येईल.

सूत्रानुसार ९७ टक्के विद्यार्थ्यांनी माेबाईलवरच प्रश्नपत्रिका साेडविली. काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या, पण त्यांना तत्काळ दूर करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणे साेपे गेले. विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ वाजताच्या सत्रात १६ हजार ८५४ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधून १५ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका जमा केली. दुसरे सत्र सकाळी ११.३० वाजता सुरू करण्यात आले. यामध्ये १४,६६० पैकी १४,२२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व सर्वांनी यशस्वीपणे सबमीटही केले. तिसऱ्या सत्रात ३,७५५ पैकी ३,४७४ विद्यार्थी सहभागी झाले. ३,४४५ विद्यार्थ्यांनी सबमीट केले.

पुनर्परीक्षेवर हाेणार विचार

याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले, परीक्षा आणखी अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. काही विद्यार्थी परीक्षा का देऊ शकले नाही, यावर विचार हाेईल. साेबतच डेटाचे विश्लेषण करून ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यांची परीक्षा पुन्हा घेण्याबाबत विचार करण्यात येईल.