शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या परीक्षेत विद्यापीठ पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:09 IST

नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी शनिवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. आज अभियांत्रिकी, बीएस्सी व बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या परीक्षा ...

नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी शनिवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. आज अभियांत्रिकी, बीएस्सी व बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या परीक्षा अडचणीविना पार पडल्या. २०२० च्या हिवाळी परीक्षेच्या तिसऱ्या दिवशी ३५ हजार २७१ पैकी ३३ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिली. यामधून ३१ हजार १४८ म्हणजे ९८.५८ टक्के विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका जमा केल्या.

उल्लेखनीय म्हणजे जुना अनुभव बघता विद्यापीठाचा परीक्षा विभाग परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी तणावात हाेता. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला हाेता. त्यामुळे पहिल्या दिवशीची परीक्षा रद्द करावी लागली. माहितीनुसार परीक्षेच्या वेळी अडचणी येऊ नये म्हणून ऑनलाईन परीक्षेत विद्यापीठाची मदत करणाऱ्या प्राेमार्क कंपनीच्या टेक्निकल टीमला बाेलावण्यात आले हाेते. परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी व परीक्षेच्या वेळी सातत्याने सर्व्हरवर लक्ष ठेवण्यात आले. साेबतच हेल्पलाईन क्रमांकालाही सक्रिय ठेवण्यात आले हाेते, जेणेकरून काेणत्याही विद्यार्थ्याला अडचण आली तर तत्काळ दुरुस्त करता येईल.

सूत्रानुसार ९७ टक्के विद्यार्थ्यांनी माेबाईलवरच प्रश्नपत्रिका साेडविली. काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या, पण त्यांना तत्काळ दूर करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणे साेपे गेले. विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ वाजताच्या सत्रात १६ हजार ८५४ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधून १५ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका जमा केली. दुसरे सत्र सकाळी ११.३० वाजता सुरू करण्यात आले. यामध्ये १४,६६० पैकी १४,२२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व सर्वांनी यशस्वीपणे सबमीटही केले. तिसऱ्या सत्रात ३,७५५ पैकी ३,४७४ विद्यार्थी सहभागी झाले. ३,४४५ विद्यार्थ्यांनी सबमीट केले.

पुनर्परीक्षेवर हाेणार विचार

याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले, परीक्षा आणखी अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. काही विद्यार्थी परीक्षा का देऊ शकले नाही, यावर विचार हाेईल. साेबतच डेटाचे विश्लेषण करून ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यांची परीक्षा पुन्हा घेण्याबाबत विचार करण्यात येईल.