शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

ज्ञानरचनेचा सिद्धांत मांडणारी काव्यक्रांती एकतेची

By admin | Updated: August 11, 2014 00:54 IST

विषमतेची भिंत तोडून, परंपरेच्या सीमा ओलांडनू, जातीयतेची चौकट नष्ट करून, वैचारिक क्रांतीचा परीघ विस्तारित करणारी, ज्ञानरचनेचा सिद्धांत मांडणारी, काव्यक्रांती एकतेची असावी,

सम्यक साहित्य मंच : क्रांतिदिनाला काव्याभिवादन नागपूर : विषमतेची भिंत तोडून, परंपरेच्या सीमा ओलांडनू, जातीयतेची चौकट नष्ट करून, वैचारिक क्रांतीचा परीघ विस्तारित करणारी, ज्ञानरचनेचा सिद्धांत मांडणारी, काव्यक्रांती एकतेची असावी, असे विधान आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले. सम्यक साहित्य मंचच्यावतीने क्रांतिदिनानिमित्त शनिवारी ‘काव्यक्रांती एकतेची’ या विषयावर चर्चा आणि कविता सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रूपाताई कुळकर्णी, डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश खरात उपस्थित होते.डॉ. मनोहर म्हणाले, या मंचमुळे काव्यसागराचे किनारे विस्तारित झाले आहेत. कवींसोबत सामाजिक बांधिलकी जोपासणारे श्रोतेही संघटित होत आहेत. डॉ. कुळकर्णी म्हणाल्या, या कार्यक्रमात कवींनी सामाजिक विसंगतीच्या विकृतींवर प्रकाश टाकला आहे. माणसामाणसात भेद करणाऱ्या संस्कृतीबद्दल निषेधाचा सूर मांडला, तर काहींनी सकारात्मकही बाजू मांडली आहे. यामुळे या मंचावर ‘काव्यक्रांती’ घडून आली आहे.डॉ. खरात म्हणाले, माणसाला केंद्रस्थानी ठेवून आंबेडकरी चळवळीला तेवढ्याच ताकदीने पुढे नेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात सहभागी कवींनी आपल्या कवितेतून केला आहे. संचालन कथालेखिका डॉ. मंजूषा सावरकर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ कवी भाऊ पंचभाई, नीलकांत ढोले, इ.मो. नारनवरे, अमर रामटेके, हृदय चक्रधर, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, मनीषा साधू, हेमलता ढवळे, प्राजक्ता खांडेकर, ज्ञानेश्वर वांढरे, प्रकाश दुलेवाले, प्रसेनजित ताकसांडे, संजय गोडघाटे, मधुकर कडू यांनी एकापेक्षा एक सरस रचना सादर करून क्रांतिदिनाला काव्याभिवादन केले. प्रास्ताविक सम्यक साहित्य मंचचे अध्यक्ष प्रा. हृदय चक्रधर यांनी केले तर आभार प्रकाश दुलेवाले यांनी मानले.(प्रतिनिधी)