शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

ज्ञानरचनेचा सिद्धांत मांडणारी काव्यक्रांती एकतेची

By admin | Updated: August 11, 2014 00:54 IST

विषमतेची भिंत तोडून, परंपरेच्या सीमा ओलांडनू, जातीयतेची चौकट नष्ट करून, वैचारिक क्रांतीचा परीघ विस्तारित करणारी, ज्ञानरचनेचा सिद्धांत मांडणारी, काव्यक्रांती एकतेची असावी,

सम्यक साहित्य मंच : क्रांतिदिनाला काव्याभिवादन नागपूर : विषमतेची भिंत तोडून, परंपरेच्या सीमा ओलांडनू, जातीयतेची चौकट नष्ट करून, वैचारिक क्रांतीचा परीघ विस्तारित करणारी, ज्ञानरचनेचा सिद्धांत मांडणारी, काव्यक्रांती एकतेची असावी, असे विधान आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले. सम्यक साहित्य मंचच्यावतीने क्रांतिदिनानिमित्त शनिवारी ‘काव्यक्रांती एकतेची’ या विषयावर चर्चा आणि कविता सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रूपाताई कुळकर्णी, डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश खरात उपस्थित होते.डॉ. मनोहर म्हणाले, या मंचमुळे काव्यसागराचे किनारे विस्तारित झाले आहेत. कवींसोबत सामाजिक बांधिलकी जोपासणारे श्रोतेही संघटित होत आहेत. डॉ. कुळकर्णी म्हणाल्या, या कार्यक्रमात कवींनी सामाजिक विसंगतीच्या विकृतींवर प्रकाश टाकला आहे. माणसामाणसात भेद करणाऱ्या संस्कृतीबद्दल निषेधाचा सूर मांडला, तर काहींनी सकारात्मकही बाजू मांडली आहे. यामुळे या मंचावर ‘काव्यक्रांती’ घडून आली आहे.डॉ. खरात म्हणाले, माणसाला केंद्रस्थानी ठेवून आंबेडकरी चळवळीला तेवढ्याच ताकदीने पुढे नेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात सहभागी कवींनी आपल्या कवितेतून केला आहे. संचालन कथालेखिका डॉ. मंजूषा सावरकर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ कवी भाऊ पंचभाई, नीलकांत ढोले, इ.मो. नारनवरे, अमर रामटेके, हृदय चक्रधर, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, मनीषा साधू, हेमलता ढवळे, प्राजक्ता खांडेकर, ज्ञानेश्वर वांढरे, प्रकाश दुलेवाले, प्रसेनजित ताकसांडे, संजय गोडघाटे, मधुकर कडू यांनी एकापेक्षा एक सरस रचना सादर करून क्रांतिदिनाला काव्याभिवादन केले. प्रास्ताविक सम्यक साहित्य मंचचे अध्यक्ष प्रा. हृदय चक्रधर यांनी केले तर आभार प्रकाश दुलेवाले यांनी मानले.(प्रतिनिधी)