शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

संघ परधर्म द्वेषामुळे मोठा झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 02:06 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवार स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्म द्वेषामुळे मोठा झाला. त्यांचा प्रभाव वाढण्याला बाबरी मशीद विध्वंसापासून सुरुवात झाली, असे स्पष्ट मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुरेश द्वादशीवार : राष्ट्रपित्याची समाधी उखडण्याच्या कृत्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवार स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्म द्वेषामुळे मोठा झाला. त्यांचा प्रभाव वाढण्याला बाबरी मशीद विध्वंसापासून सुरुवात झाली, असे स्पष्ट मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.मध्य प्रदेशातील राष्ट्रपिता महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या समाधी जेसीबीने उखडण्याच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी दक्षिणायन महाराष्ट्र संस्थेच्यावतीने गुरुवारी बजाजनगरातील कस्तुरबा भवन येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार आणि विदर्भावादी नेते व अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.भारतात ८० टक्के नागरिक हिंदू आहेत. असे असतानाही बाबरी मशीद विध्वंसापूर्वी संघ व भाजपाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. महात्मा गांधी हिंदू होते. परंतु, त्यांनी कधीच दुसºया धर्माचा द्वेष केला नाही. त्यांच्यासाठी सर्व धर्म समान होते. संघ परिवाराचे हिंदुत्व स्वार्थी आहे. त्यांनी दुसºया धर्माचा द्वेष करून देशातील वातावरण धर्मांध केले आहे. त्यांचे विचार धोकादायक असल्यामुळे नागरिकांनी सावध होण्याची गरज आहे असे, द्वादशीवार यांनी सांगितले. देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस दुबळा व हवालदिल झाला आहे. त्यांच्याकडे पैसा, प्रभावी प्रवक्ते व ताकदीचे नेते नाहीत. अन्य पक्ष प्रादेशिक आहेत. त्यामुळे संघ व संघ परिवाराला रोखणारा कुणीच नाही. महात्मा गांधी लोकनेते होते. त्यांनी उभा केलेला लोकसंघर्ष त्यांच्या मृत्यूसोबतच हरवला. तरुणांना अशा संघर्षाचे आकर्षणअसून ते आता काँग्रेसकडे नाही. संघ परिवाराच्या विध्वंसक विचारांचा विरोध करण्यासाठी निषेध सभा घेण्यापेक्षा जनआंदोलन करण्याची गरज आहे असे द्वादशीवार यांनी स्पष्ट केले.भाजपा सरदार पटेल यांचा उपयोग सोईने करीत आहे. पंडित नेहरू यांनी पटेल यांच्यावर अन्याय केला असा खोटा प्रचार केला जात आहे, असेही द्वादशीवार यांनी सांगितले.भाजपा शासनाच्या काळात देशातील सांस्कृतिक मूल्यांचा संहार होत आहे अशी टीका खांदेवाले यांनी केली तर, संघ परिवाराचे खाण्याचे व दाखविण्याचे दात वेगळे आहेत, असे केदार यांनी सांगितले. संस्थेचे प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविक तर अरुणा सबाने यांनी संचालन केले.