शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

संघ परधर्म द्वेषामुळे मोठा झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 02:06 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवार स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्म द्वेषामुळे मोठा झाला. त्यांचा प्रभाव वाढण्याला बाबरी मशीद विध्वंसापासून सुरुवात झाली, असे स्पष्ट मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुरेश द्वादशीवार : राष्ट्रपित्याची समाधी उखडण्याच्या कृत्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवार स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्म द्वेषामुळे मोठा झाला. त्यांचा प्रभाव वाढण्याला बाबरी मशीद विध्वंसापासून सुरुवात झाली, असे स्पष्ट मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.मध्य प्रदेशातील राष्ट्रपिता महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या समाधी जेसीबीने उखडण्याच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी दक्षिणायन महाराष्ट्र संस्थेच्यावतीने गुरुवारी बजाजनगरातील कस्तुरबा भवन येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार आणि विदर्भावादी नेते व अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.भारतात ८० टक्के नागरिक हिंदू आहेत. असे असतानाही बाबरी मशीद विध्वंसापूर्वी संघ व भाजपाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. महात्मा गांधी हिंदू होते. परंतु, त्यांनी कधीच दुसºया धर्माचा द्वेष केला नाही. त्यांच्यासाठी सर्व धर्म समान होते. संघ परिवाराचे हिंदुत्व स्वार्थी आहे. त्यांनी दुसºया धर्माचा द्वेष करून देशातील वातावरण धर्मांध केले आहे. त्यांचे विचार धोकादायक असल्यामुळे नागरिकांनी सावध होण्याची गरज आहे असे, द्वादशीवार यांनी सांगितले. देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस दुबळा व हवालदिल झाला आहे. त्यांच्याकडे पैसा, प्रभावी प्रवक्ते व ताकदीचे नेते नाहीत. अन्य पक्ष प्रादेशिक आहेत. त्यामुळे संघ व संघ परिवाराला रोखणारा कुणीच नाही. महात्मा गांधी लोकनेते होते. त्यांनी उभा केलेला लोकसंघर्ष त्यांच्या मृत्यूसोबतच हरवला. तरुणांना अशा संघर्षाचे आकर्षणअसून ते आता काँग्रेसकडे नाही. संघ परिवाराच्या विध्वंसक विचारांचा विरोध करण्यासाठी निषेध सभा घेण्यापेक्षा जनआंदोलन करण्याची गरज आहे असे द्वादशीवार यांनी स्पष्ट केले.भाजपा सरदार पटेल यांचा उपयोग सोईने करीत आहे. पंडित नेहरू यांनी पटेल यांच्यावर अन्याय केला असा खोटा प्रचार केला जात आहे, असेही द्वादशीवार यांनी सांगितले.भाजपा शासनाच्या काळात देशातील सांस्कृतिक मूल्यांचा संहार होत आहे अशी टीका खांदेवाले यांनी केली तर, संघ परिवाराचे खाण्याचे व दाखविण्याचे दात वेगळे आहेत, असे केदार यांनी सांगितले. संस्थेचे प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविक तर अरुणा सबाने यांनी संचालन केले.