शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

ग्रामपंचायत सदस्यांचा सभेपूर्वीच ‘यू टर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : आर्थिक व्यवहार करताना विश्वासात घेत नसल्याचा आराेप करीत बाेखारा (ता. नागपूर ग्रामीण) ग्रामपंचायतच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : आर्थिक व्यवहार करताना विश्वासात घेत नसल्याचा आराेप करीत बाेखारा (ता. नागपूर ग्रामीण) ग्रामपंचायतच्या १७ पैकी आठ सदस्यांनी सदस्यपदाचा सामूहिक राजीनामा दिला हाेता. यावर निर्णय घेण्यासाठी आयाेजित केलेल्या मासिक सभेच्या एक दिवस आधीच या सदस्यांनी ‘यू टर्न’ घेत आपापले राजीनामे मागे घेतले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.

सामूहिक राजीनामे देणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये वर्षा सहारे, डॉ. सुमित घोंगडे, ईशान कुर्वे, पूनम डवले, अजय बारई, सीमा मानवटकर, सुप्रिया आवळे व शकील अन्वर शेख या आठ सदस्यांचा समावेश हाेता. त्यांनी १५ जुलैला त्यांचे राजीनामे सरपंच अनिता पंडित यांच्याकडे साेपविले हाेते. यावर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (दि. २२) ग्रामपंचायतची विशेष मासिक सभा बाेलावण्यात आली हाेती. मात्र, या आठही सदस्यांनी ‘यू टर्न’ घेत साेमवारी (दि. १९) आपापले राजीनामे मागे घेतले आहेत.

ग्रामपंचायतने पाणीटंचाई संदर्भात केलेल्या खर्चावर संशय व्यक्त करीत या सदस्यांनी राजीनामे दिले हाेते. त्यावर अंतिम निर्णय व्हायचा हाेता. मात्र, आठही सदस्यांनी आपण राजीनामा मागे घेत असल्याचे वैयक्तिक पत्रही ग्रामपंचायतकडे सादर केले आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. २०) विशेष सभा बाेलावण्यात आली हाेती. त्यात सर्व राजीनामे नामंजूर करण्यात आल्याची औचारिकताही पूर्ण करण्यात आली. या बैठकीला पूनम डवले वगळता राजीनामा देणारे अन्य सदस्य हजर हाेते.

...

मतदारांच्या विनंतीमुळे माघार

आपण वाॅर्डाचे लाेकप्रतिनिधी आहाेत. नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकास कामे हाेत नसल्याने याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामे दिले हाेते. याची माहिती मिळताच मतदारांनी राजीनामे मागे घेऊन पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली. त्यामुळे आपण माघार घेतली, अशी प्रतिक्रिया आठही सदस्यांनी व्यक्त केली. आर्थिक घाेटाळ्यासंदर्भात खंडविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, त्यांची चाैकशी करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

...

आर्थिक घाेटाळा केल्याचा आराेप निराधार आहे. ग्रामपंचायतचे सर्व व्यवहार व निर्णय नियमानुसार आहेत. असले आराेप करून ग्रामपंचायतला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित व्यक्तींनी आराेप सिद्ध करावे. सामाजिक मानहानी झाल्याने आपण मानहानीचा दावा करणार आहे.

- अनिता पंडित,

सरपंच, बाेखारा.