शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

ग्रामपंचायत सदस्यांचा सभेपूर्वीच ‘यू टर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : आर्थिक व्यवहार करताना विश्वासात घेत नसल्याचा आराेप करीत बाेखारा (ता. नागपूर ग्रामीण) ग्रामपंचायतच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : आर्थिक व्यवहार करताना विश्वासात घेत नसल्याचा आराेप करीत बाेखारा (ता. नागपूर ग्रामीण) ग्रामपंचायतच्या १७ पैकी आठ सदस्यांनी सदस्यपदाचा सामूहिक राजीनामा दिला हाेता. यावर निर्णय घेण्यासाठी आयाेजित केलेल्या मासिक सभेच्या एक दिवस आधीच या सदस्यांनी ‘यू टर्न’ घेत आपापले राजीनामे मागे घेतले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.

सामूहिक राजीनामे देणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये वर्षा सहारे, डॉ. सुमित घोंगडे, ईशान कुर्वे, पूनम डवले, अजय बारई, सीमा मानवटकर, सुप्रिया आवळे व शकील अन्वर शेख या आठ सदस्यांचा समावेश हाेता. त्यांनी १५ जुलैला त्यांचे राजीनामे सरपंच अनिता पंडित यांच्याकडे साेपविले हाेते. यावर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (दि. २२) ग्रामपंचायतची विशेष मासिक सभा बाेलावण्यात आली हाेती. मात्र, या आठही सदस्यांनी ‘यू टर्न’ घेत साेमवारी (दि. १९) आपापले राजीनामे मागे घेतले आहेत.

ग्रामपंचायतने पाणीटंचाई संदर्भात केलेल्या खर्चावर संशय व्यक्त करीत या सदस्यांनी राजीनामे दिले हाेते. त्यावर अंतिम निर्णय व्हायचा हाेता. मात्र, आठही सदस्यांनी आपण राजीनामा मागे घेत असल्याचे वैयक्तिक पत्रही ग्रामपंचायतकडे सादर केले आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. २०) विशेष सभा बाेलावण्यात आली हाेती. त्यात सर्व राजीनामे नामंजूर करण्यात आल्याची औचारिकताही पूर्ण करण्यात आली. या बैठकीला पूनम डवले वगळता राजीनामा देणारे अन्य सदस्य हजर हाेते.

...

मतदारांच्या विनंतीमुळे माघार

आपण वाॅर्डाचे लाेकप्रतिनिधी आहाेत. नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकास कामे हाेत नसल्याने याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामे दिले हाेते. याची माहिती मिळताच मतदारांनी राजीनामे मागे घेऊन पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली. त्यामुळे आपण माघार घेतली, अशी प्रतिक्रिया आठही सदस्यांनी व्यक्त केली. आर्थिक घाेटाळ्यासंदर्भात खंडविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, त्यांची चाैकशी करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

...

आर्थिक घाेटाळा केल्याचा आराेप निराधार आहे. ग्रामपंचायतचे सर्व व्यवहार व निर्णय नियमानुसार आहेत. असले आराेप करून ग्रामपंचायतला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित व्यक्तींनी आराेप सिद्ध करावे. सामाजिक मानहानी झाल्याने आपण मानहानीचा दावा करणार आहे.

- अनिता पंडित,

सरपंच, बाेखारा.