शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

ग्रामपंचायत सदस्यांचा सभेपूर्वीच ‘यू टर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : आर्थिक व्यवहार करताना विश्वासात घेत नसल्याचा आराेप करीत बाेखारा (ता. नागपूर ग्रामीण) ग्रामपंचायतच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : आर्थिक व्यवहार करताना विश्वासात घेत नसल्याचा आराेप करीत बाेखारा (ता. नागपूर ग्रामीण) ग्रामपंचायतच्या १७ पैकी आठ सदस्यांनी सदस्यपदाचा सामूहिक राजीनामा दिला हाेता. यावर निर्णय घेण्यासाठी आयाेजित केलेल्या मासिक सभेच्या एक दिवस आधीच या सदस्यांनी ‘यू टर्न’ घेत आपापले राजीनामे मागे घेतले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.

सामूहिक राजीनामे देणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये वर्षा सहारे, डॉ. सुमित घोंगडे, ईशान कुर्वे, पूनम डवले, अजय बारई, सीमा मानवटकर, सुप्रिया आवळे व शकील अन्वर शेख या आठ सदस्यांचा समावेश हाेता. त्यांनी १५ जुलैला त्यांचे राजीनामे सरपंच अनिता पंडित यांच्याकडे साेपविले हाेते. यावर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (दि. २२) ग्रामपंचायतची विशेष मासिक सभा बाेलावण्यात आली हाेती. मात्र, या आठही सदस्यांनी ‘यू टर्न’ घेत साेमवारी (दि. १९) आपापले राजीनामे मागे घेतले आहेत.

ग्रामपंचायतने पाणीटंचाई संदर्भात केलेल्या खर्चावर संशय व्यक्त करीत या सदस्यांनी राजीनामे दिले हाेते. त्यावर अंतिम निर्णय व्हायचा हाेता. मात्र, आठही सदस्यांनी आपण राजीनामा मागे घेत असल्याचे वैयक्तिक पत्रही ग्रामपंचायतकडे सादर केले आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. २०) विशेष सभा बाेलावण्यात आली हाेती. त्यात सर्व राजीनामे नामंजूर करण्यात आल्याची औचारिकताही पूर्ण करण्यात आली. या बैठकीला पूनम डवले वगळता राजीनामा देणारे अन्य सदस्य हजर हाेते.

...

मतदारांच्या विनंतीमुळे माघार

आपण वाॅर्डाचे लाेकप्रतिनिधी आहाेत. नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकास कामे हाेत नसल्याने याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामे दिले हाेते. याची माहिती मिळताच मतदारांनी राजीनामे मागे घेऊन पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली. त्यामुळे आपण माघार घेतली, अशी प्रतिक्रिया आठही सदस्यांनी व्यक्त केली. आर्थिक घाेटाळ्यासंदर्भात खंडविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, त्यांची चाैकशी करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

...

आर्थिक घाेटाळा केल्याचा आराेप निराधार आहे. ग्रामपंचायतचे सर्व व्यवहार व निर्णय नियमानुसार आहेत. असले आराेप करून ग्रामपंचायतला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित व्यक्तींनी आराेप सिद्ध करावे. सामाजिक मानहानी झाल्याने आपण मानहानीचा दावा करणार आहे.

- अनिता पंडित,

सरपंच, बाेखारा.