शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

भरधाव कारचालकांनी घेतले दोन बळी

By admin | Updated: April 20, 2015 02:13 IST

भरधाव कारचालकांनी दोन वेगवेगळ्या अपघातात दोन मुलांचे बळी घेतले. वाडी आणि नंदनवनमध्ये हे अपघात घडले.

नागपूर : भरधाव कारचालकांनी दोन वेगवेगळ्या अपघातात दोन मुलांचे बळी घेतले. वाडी आणि नंदनवनमध्ये हे अपघात घडले.अन्मय ज्योतिसिंग रवींद्रसिंग काला (वय ११, रा. वडधामना, सुराबर्डी) हा बालक रविवारी दुपारी १.३० वाजता वाडी गुरुद्वाराजवळ रस्ता ओलांडत होता. तेवढ्यात त्याला एमएच ३४/एएम ४५७८ क्रमांकाच्या कारचालकाने जोरदार धडक मारली. अन्मय गंभीर जखमी झाला. त्याला डॉक्टरकडे नेले असता मृत घोषित केले. या अपघातामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. अपघातानंतर दोषी कारचालक पळून गेला. गुरुमितसिंग अविनाशसिंग काला (वय ४५) यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी दोषी कारचालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी आरोपी कारचालकाला अटक केलेली नव्हती. नंदनवनमधील अपघात १४ एप्रिलच्या सायंकाळी ६ च्या सुमारास झाला होता. हरीश शैलेंद्र शाहू (वय १५) सायकलने जात होता. कोहिनूर लॉनजवळ त्याला भरधाव कारचालकाने (एमएच १२/जेयू ०१९६) जोरदार धडक मारली. त्यामुळे हरीश गंभीर जखमी झाला. त्याला न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना हरीशचा मृत्यू झाला. हे प्रकरण दडपण्यासाठी आरोपीकडून काही जणांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे काही वेळ रुग्णालयातही वातावरण संतप्त झाले होते. दरम्यान, नंदनवन पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)