शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशासाठी दोन नियम क से?

By admin | Updated: March 26, 2016 02:57 IST

आरटीई अंतर्गत नर्सरीमध्ये प्रवेशासाठी ३१ जुलै २०१६ पर्यंत तीन वर्ष पूर्ण व पहिल्या वर्गासाठी पाच वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे.

आरटीई नियमात : इतर प्रवेशात मनमानीनागपूर : आरटीई अंतर्गत नर्सरीमध्ये प्रवेशासाठी ३१ जुलै २०१६ पर्यंत तीन वर्ष पूर्ण व पहिल्या वर्गासाठी पाच वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे ३१ जुलैपर्यंत आरटीईने निर्धारित केलेले वर्ष पूर्ण होण्यास एक दिवससुद्धा बाकी असेल, तर विद्यार्थ्याला प्रवेशासाठी एका वर्षाची वाट बघावी लागणार आहे. परंतु तोच विद्यार्थी प्रवेशासाठी इतर कुठल्याही शाळेत गेल्यास त्याला वयाची अडचण नाही. प्रवेशासाठी दोन नियम का? असा सवाल आरटीईच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांनी केला आहे. आरटीई अ‍ॅक्शन कमिटीकडे यासंदर्भातील पालकांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शासनाने बालकांच्या प्रवेशासंदर्भात किमान वय निर्धारित केले आहे. हा नियम आरटीईचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच इतरही विद्यार्थ्यांसाठी आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पत्र सर्व विभागीय उपसंचालकांना पाठविण्यात आले आहे. नियमानुसार नर्सरीसाठी विद्यार्थ्यांचे ३१ जुलै २०१६ रोजी तीन वर्ष पूर्ण व पहिल्या वर्गासाठी पाच वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाच्या या नियमाचे तंतोतंत पालन आरटीईमध्ये होते. कारण आरटीई प्रक्रिया आॅनलाईन असल्याने, निर्धारित केलेल्या तारखेला विद्यार्थ्याचे वय पूर्ण होत नसले तर, अर्जच स्वीकारला जात नाही. आरईटी अ‍ॅक्शन कमिटीकडे आकाश वसू व ज्ञानेंद्र तिवारी या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. आकाशला नर्सरीत प्रवेश हवा आहे. त्याला ३१ जुलै २०१६ ला तीन वर्ष पूर्ण होण्यासाठी आठ दिवस शिल्लक आहे. तर ज्ञानेंद्र तिवारी या विद्यार्थ्याला पहिल्या वर्गात प्रवेश घ्यायाचा आहे. त्याला पाच वर्ष पूर्ण होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी आहे. परंतु हे विद्यार्थी इतर शाळेत प्रवेशासाठी गेले असता, त्यांना वयाचे बंधन आड आले नाही. आरटीईच्या प्रक्रियेत येण्यासाठी त्यांना आणखी एक वर्ष वाट बघावी लागणार आहे. अशा अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी पुढे येत असल्याचे आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष मो. शाहिद शरीफ यांनी सांगितले. मुलांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षण विभागाने किमान दोन महिन्यांची सूट द्यावी, अशी मागणी कमिटीतर्फे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)