शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

दोन दिवस ‘वीकेण्ड लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण यावे यासाठी राज्य शासनाच्या निर्देशांनुसार उपराजधानीत कडक निर्बंध लागू करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण यावे यासाठी राज्य शासनाच्या निर्देशांनुसार उपराजधानीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शनिवार व रविवारी ‘वीकेण्ड लॉकडाऊन’ राहणार असून, शुक्रवारी रात्री ८ पासूनच त्याची सुरुवात झाली. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. विनाकारण घराबाहेर पडलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यादृष्टीने शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत दोन दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन राहणार असल्याचे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार कडक नियमावली जारी करण्यात आली होती. नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवाअंतर्गत येणाऱ्या आस्थापनाच सुरू राहणार आहेत. ठोस कारणाविना कुणालाही घराबाहेर फिरता येणार नाही. कुणी घराबाहेर पडलेच तर संबंधित पुरावा सोबत बाळगावा लागणार आहे.

रेस्टॉरेन्ट्समधून केवळ ‘फूड डिलिव्हरी’

कडक निर्बंधांदरम्यान नागरिकांना रेस्टॉरेन्ट्समध्ये जाऊन ‘पार्सल’ घेण्याची मुभा होती. परंतु शनिवार व रविवारी केवळ होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत ‘डिलिव्हरी’ सेवा सुरू राहणार आहे.

६६ ठिकाणी नाकाबंदी

शुक्रवारी रात्रीपासूनच शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. शहरात ६६ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली, तर अडीच हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी ‘वीकेण्ड लॉकडाऊन’ला बंदोबस्तावर राहतील.

विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांवरदेखील कारवाई : पोलीस आयुक्त

‘वीकेण्ड लॉकडाऊन’दरम्यान विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कडक निर्बंधांचा विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. गुरुवार-शुक्रवारी पोलिसांनी शहरात जागोजागी ‘रूट मार्च’ काढून कडेकोट बंदोबस्ताचे संकेत दिले आहेत. ‘वीकेण्ड लॉकडाऊन’च्या माध्यमातून संसर्गावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांनी व्यापारी संघटनांची चर्चा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस व प्रशासनाला सहकार्य करणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या विरोधामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे व लोक विनाकारण रस्त्यांवर येत आहे. आता जर विनाकारण विरोध किंवा आंदोलन झाले तर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या लोकांनाच घराबाहेर निघण्याची परवानगी

- वैद्यकीय इमर्जन्सी

- लसीकरण

- उपचार

- विमान, रेल्वे, बसचे प्रवासी

- परीक्षार्थी