शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पेयजल योजनेचे वाजले बारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:09 IST

भिवापूर (नांद) : तालुक्यातील नांद येथे मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत करण्यात आलेली सर्व कामे निकृष्ट व नियोजन शून्य असल्यामुळे, ...

भिवापूर (नांद) : तालुक्यातील नांद येथे मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत करण्यात आलेली सर्व कामे निकृष्ट व नियोजन शून्य असल्यामुळे, भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कुठे लीकेज तर कुठे पॅनल बोर्डही लागलेला नाही. त्यामुळे योजनेंतर्गत १ कोटी ६३ लाख रुपयांच्या निधीचे केले तरी काय, असा प्रश्न नांदवासीयांना पडला आहे. ४,५६१ लोकसंख्येच्या नांदमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष असल्यामुळे २०१७-१८ मध्ये शासनाने मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत १ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यात पाणी पुरवठ्याच्या दोन विहिरींची निर्मिती व संपूर्ण गावात पाणीपुरवठ्याची पाइपलाइन आदी कामांचा समावेश आहे. संबंधित कंत्राटदाराने व्यवस्थित नियोजन न करता, ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची केली. ही ओबडधोबड योजना पूर्णाकृत होत असताना, अचानक कंत्राटदार एजन्सी बेपत्ता झाली. पॅनल बोर्ड, विहिरीला निशाणी, व्हॉल आदी साहित्य लावण्यात आलेले नाही. पाणीपुरवठ्याची पाइपलाइन योग्य खोलीत टाकण्यात आले नाही. पाइपही निकृष्ट वापरण्यात आले आहे. काही ठिकाणी जोडणी झालेली नसल्यामुळे पाणीपुरवठा होत नाही. अनेक ठिकाणी लीकेजेस आहे. दोन विहिरीवर दोन मोटारपंप आहे. यातील एकच पंप सुरू आहे. अशा भोंगळ कारभारामुळे १ कोटी ६३ लाख रुपयांच्या निधीतून निर्मित या योजनेचे अक्षरश: बारा वाजले आहेत. याबाबत आ.राजू पारवे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांकडे डझनावर तक्रारी करण्यात आल्यात. मात्र, साधी चौकशी करून कारवाई करण्याचे कौशल्यही दाखविले गेले नाही.

विद्युत पुरवठा खंडित

निकृष्ट दर्जाच्या या योजनेचे ९० टक्क्याहून अधिक काम पूर्ण झालेले आहे. काही किरकोळ कामे शिल्लक आहे. त्यामुळे ही योजना ग्रामपंचायतीला हस्तांतरित झालेली नाही. अशात दोन्ही योजनांची ७० हजार रुपये थकीत विद्युत देयके कंत्राटदाराने अदा न केल्यामुळे महावितरणने मार्च महिन्यात या योजनांचा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे नांदवासीयांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. अखेरीस पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामपंचायतीने आता जुन्या योजनेतून नांदवासीयांची तहान भागविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

अन्यथा मोटारपंप काढतो?

संबंधित कंत्राटदाराने एका दुकानातून मोटारपंप खरेदी केले. मात्र, त्या दुकानदाराचे पैसे दिलेले नाही. त्यामुळे सदर दुकानदार आता ग्रामपंचायतीकडे पैशाची मागणी करत आहे. पैसे न दिल्यास विहिरीतील दोन्ही मोटरपंप काढतो, असा इशारा देत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराच्या बोगसबाजीचे करायचे तरी काय, असा प्रश्न ग्रामपंचायतला पडला आहे.

२०१७-१८ मध्ये ही योजना करण्यात आली. नियोजन शून्य कारभार व निकृष्ट दर्जामुळे संपूर्ण योजना बासनात गुंडाळली गेली आहे. या योजनेतून नागरिकांना अद्यापही पाण्याचा थेंब मिळालेला नाही. त्यामुळे योजनेच्या संपूर्ण कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.

- तुळशीदास चुटे, सरपंच नांद