शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शहरात स्वच्छतेचे वाजले बारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:07 IST

भिवापूर : पावसाळ्याच्या दिवसात अस्वच्छतेतून संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता अधिक असताना, भिवापूर शहरात मात्र स्वच्छतेचे बारा वाजले आहेत. नगरपंचायतीने ...

भिवापूर : पावसाळ्याच्या दिवसात अस्वच्छतेतून संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता अधिक असताना, भिवापूर शहरात मात्र स्वच्छतेचे बारा वाजले आहेत. नगरपंचायतीने लावलेल्या कचराकुंड्या तुडुंब भरल्या आहेत. सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. मात्र, कचराकुंडी किंवा खाली पडलेला कचरा स्वच्छ करण्याचे कौशल्य नगरपंचायतीकडून अद्यापही दाखविले गेलेले नाही.

स्थानिक धर्मापूर पेठेतील इंदिरा गांधी चौकात स्वच्छतेचा बोजवारा उडला आहे. नगरपंचायतीकडून शहरात कचरा टाकण्यासाठी महागड्या कचराकुंड्या लावण्यात आल्यात. नागरिकांनीही स्वच्छतेला साथ देत, कचरा उघड्यावर न फेकता, कचराकुंडीमध्ये टाकण्यास सुरुवात केली. मात्र, कचराकुंडी कचऱ्याने तुडुंब भरल्यानंतर, ती स्वच्छ करण्याचे कौशल्य नगरपंचायतीकडून दाखविले जात नाही. परिणामी, नागरिकांनी आता कचराकुंडीच्या परिसरात कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार केवळ धर्मापूर पेठेत नसून, शहरातील इतरही प्रभागात होताना दिसत आहे. कचरा संकलनाचे कार्य नियमित होत नसल्याने, जनावरे या कचराकुंड्यांना तोंड लावतात. त्यामुळे त्यांच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण शहराची स्वच्छता कंत्राटी पद्धतीने सुरू आहे. मात्र, कंत्राटदाराच्या कामावर नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे स्वच्छतेचा देखावा करत, शासनाच्या तिजोरीतून निव्वळ पैसे उकळण्याचे काम सुरू आहे, असा आरोप आता होत आहे.

शहरातील अस्वच्छता सोशल मीडियावर?

धर्मापूर पेठेतील अस्वच्छतेबाबत येथील नागरिक दररोज ओरडत आहे. त्यांनी तोंडी तक्रारीही केल्यात. मात्र, त्याचा काहीही फायदा झालेला नाही. अखेरीस येथील नागरिकांनी अस्वच्छता व घाणीचे फोटो काढून सो‌शल मीडियावर वाचा फोडली. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाविरुद्ध चांगलाच असंतोष खदखदत आहे.

070721\img-20210703-wa0136.jpg

धर्मापूर पेठेतील कचराकुंड्या कच-याने अशा तुडूंब भरल्या असुन घाणीचे साम्राज्य पसरले आहे.