शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

पत्रकारितेतून विकासाला गती देण्याचा प्रयत्न व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2016 02:40 IST

स्व. प्रकाश देशपांडे प्रतिभावंत आणि प्रभावी लेखन करणारे पत्रकार होते. ते कवी ग्रेस यांचे लाडके विद्यार्थी होते.

नितीन गडकरी : प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार राजू मिश्रा यांना प्रदाननागपूर : स्व. प्रकाश देशपांडे प्रतिभावंत आणि प्रभावी लेखन करणारे पत्रकार होते. ते कवी ग्रेस यांचे लाडके विद्यार्थी होते. पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारितेतून समाजाला समोर नेणाऱ्या विकासाला गती देणाऱ्या बातम्या यायला हव्यात पण सध्याच्या २४ बाय ७ मुळे चांगल्या बाबींसोबत वाईट बाबींनाही प्रसिद्धी मिळते. माध्यमांनी चांगल्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न करावा, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी देण्यात येणारा ‘प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार’ यंदा डॉ. राजू मिश्रा यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खा. दत्ता मेघे, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी, ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयी, ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद आणि डॉ. गिरीश गांधी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी गडकरी म्हणाले, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना आपण भाजपचे अध्यक्ष होतो. त्यावेळी किंगफिशर एअरलाईन्स अडचणीत आली. ही कंपनी बंद पडू नये म्हणून आपण मुखर्जी यांना विनंती केली होती. कारण एखादी कंपनी बंद पडते तेव्हा त्यात काम करणारे हजारो लोक बेरोजगार होतात. या कंपनीशी व्यक्तीश: आपला कुठलाही संबंध नव्हता. माल्यांबद्दलही आता बोलले जात असले तरी गेल्या २५ वर्षात बँकांनी माल्यांकडून लाभही कमाविला. व्यवसायात वाईट स्थिती येते. पण कर्ज परत करता आले नाही तर सर्वांच्याच नजरेत तो उद्योगपती गुन्हेगार ठरतो. पण अशाने उद्योग उभे कसे राहतील. एल अँड टी कंपनीला अमरावती ते जळगाव रस्ता तयार करण्याचे काम दिले होते. त्यावेळी कंपनीच्या चेअरमनने काही काळानंतर कंपनीची स्थिती वाईट असून ते काम करण्यास नकार दिला. यामागे त्यांची व्यावसायिक उद्विग्नता होती. काही काळाने कंपनीची स्थिती सुधारली आणि आता ते १५ हजार कोटींच्या नऊ प्रोजेक्टवर काम करीत आहेत. या कंपनीशीही माझा काहीही संबंध नाही पण कुठलाच उद्योग बंद पडू नये, यासाठी माझा प्रयत्न आहे. नागपुरात मॉडेल मिल, एम्प्रेस मिल बंद पडली. यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले. गरिबी दूर करण्यासाठी उद्योग उभे राहणे आवश्यक आहे. राजू मिश्रा यांनी अशा प्रश्नांवर सातत्याने लिहीत राहावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. पुण्यप्रसून वाजपेयी म्हणाले, साधारणत: ८९ साली मी नागपुरात आलो. त्यावेळी लोकमत समाचारचा प्रारंभ होता. तेव्हापासून सातत्याने नागपुरातील स्थित्यंतराकडे माझे लक्ष आहे. बाळासाहेब देवरस, भाई बर्धन यांच्यासह अनेकदा चर्चा करता आली. या काळात राजकारणात झालेला बदल अनुभविला. पत्रकार म्हणून स्थित्यंतरे अनुभवताच आज झालेले आणि होत असलेले बदलही दिसत आहेत. पण पत्रकारांना सातत्याने योग्य वैचारिक संतुलन साधणे आवश्यक ठरते. जो सत्तेसह राहतो तो पत्रकारच नाही. या दृष्टीने पत्रकारिता जवळपास संपते की काय? अशी स्थिती आहे. दिल्लीतले शेकडो पत्रकार पत्रकारिता सोडून कॉर्पोरेट्ससाठी काम करीत आहेत. अशा वेळी एका पत्रकाराला पुरस्कृत करण्यात येत आहे, याचे समाधान वाटते, असे ते म्हणाले. लक्ष्मणराव जोशी म्हणाले, प्रकाश देशपांडे आणि राजू मिश्रा या दोघांसोबतही मी काम केले आहे. हे दोघेही प्रामाणिकपणे काम करणारे आणि प्रभावी लेखन करणारे पत्रकार. पत्रकार सहनिवास निर्माण करण्यात प्रकाश देशपांडे यांनी संघर्ष केला. त्यांच्या नावाचा हा पुरस्क ार एका योग्य व्यक्तीला देताना समाधान वाटते, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी तर संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. आभार अ‍ॅड. निशांत गांधी यांनी मानले. याप्रसंगी राजू मिश्रा यांनी सत्काराला उत्तर देताना सर्वांचेच आभार मानले. (प्रतिनिधी)