शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पत्रकारितेतून विकासाला गती देण्याचा प्रयत्न व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2016 02:40 IST

स्व. प्रकाश देशपांडे प्रतिभावंत आणि प्रभावी लेखन करणारे पत्रकार होते. ते कवी ग्रेस यांचे लाडके विद्यार्थी होते.

नितीन गडकरी : प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार राजू मिश्रा यांना प्रदाननागपूर : स्व. प्रकाश देशपांडे प्रतिभावंत आणि प्रभावी लेखन करणारे पत्रकार होते. ते कवी ग्रेस यांचे लाडके विद्यार्थी होते. पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारितेतून समाजाला समोर नेणाऱ्या विकासाला गती देणाऱ्या बातम्या यायला हव्यात पण सध्याच्या २४ बाय ७ मुळे चांगल्या बाबींसोबत वाईट बाबींनाही प्रसिद्धी मिळते. माध्यमांनी चांगल्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न करावा, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी देण्यात येणारा ‘प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार’ यंदा डॉ. राजू मिश्रा यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खा. दत्ता मेघे, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी, ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयी, ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद आणि डॉ. गिरीश गांधी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी गडकरी म्हणाले, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना आपण भाजपचे अध्यक्ष होतो. त्यावेळी किंगफिशर एअरलाईन्स अडचणीत आली. ही कंपनी बंद पडू नये म्हणून आपण मुखर्जी यांना विनंती केली होती. कारण एखादी कंपनी बंद पडते तेव्हा त्यात काम करणारे हजारो लोक बेरोजगार होतात. या कंपनीशी व्यक्तीश: आपला कुठलाही संबंध नव्हता. माल्यांबद्दलही आता बोलले जात असले तरी गेल्या २५ वर्षात बँकांनी माल्यांकडून लाभही कमाविला. व्यवसायात वाईट स्थिती येते. पण कर्ज परत करता आले नाही तर सर्वांच्याच नजरेत तो उद्योगपती गुन्हेगार ठरतो. पण अशाने उद्योग उभे कसे राहतील. एल अँड टी कंपनीला अमरावती ते जळगाव रस्ता तयार करण्याचे काम दिले होते. त्यावेळी कंपनीच्या चेअरमनने काही काळानंतर कंपनीची स्थिती वाईट असून ते काम करण्यास नकार दिला. यामागे त्यांची व्यावसायिक उद्विग्नता होती. काही काळाने कंपनीची स्थिती सुधारली आणि आता ते १५ हजार कोटींच्या नऊ प्रोजेक्टवर काम करीत आहेत. या कंपनीशीही माझा काहीही संबंध नाही पण कुठलाच उद्योग बंद पडू नये, यासाठी माझा प्रयत्न आहे. नागपुरात मॉडेल मिल, एम्प्रेस मिल बंद पडली. यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले. गरिबी दूर करण्यासाठी उद्योग उभे राहणे आवश्यक आहे. राजू मिश्रा यांनी अशा प्रश्नांवर सातत्याने लिहीत राहावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. पुण्यप्रसून वाजपेयी म्हणाले, साधारणत: ८९ साली मी नागपुरात आलो. त्यावेळी लोकमत समाचारचा प्रारंभ होता. तेव्हापासून सातत्याने नागपुरातील स्थित्यंतराकडे माझे लक्ष आहे. बाळासाहेब देवरस, भाई बर्धन यांच्यासह अनेकदा चर्चा करता आली. या काळात राजकारणात झालेला बदल अनुभविला. पत्रकार म्हणून स्थित्यंतरे अनुभवताच आज झालेले आणि होत असलेले बदलही दिसत आहेत. पण पत्रकारांना सातत्याने योग्य वैचारिक संतुलन साधणे आवश्यक ठरते. जो सत्तेसह राहतो तो पत्रकारच नाही. या दृष्टीने पत्रकारिता जवळपास संपते की काय? अशी स्थिती आहे. दिल्लीतले शेकडो पत्रकार पत्रकारिता सोडून कॉर्पोरेट्ससाठी काम करीत आहेत. अशा वेळी एका पत्रकाराला पुरस्कृत करण्यात येत आहे, याचे समाधान वाटते, असे ते म्हणाले. लक्ष्मणराव जोशी म्हणाले, प्रकाश देशपांडे आणि राजू मिश्रा या दोघांसोबतही मी काम केले आहे. हे दोघेही प्रामाणिकपणे काम करणारे आणि प्रभावी लेखन करणारे पत्रकार. पत्रकार सहनिवास निर्माण करण्यात प्रकाश देशपांडे यांनी संघर्ष केला. त्यांच्या नावाचा हा पुरस्क ार एका योग्य व्यक्तीला देताना समाधान वाटते, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी तर संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. आभार अ‍ॅड. निशांत गांधी यांनी मानले. याप्रसंगी राजू मिश्रा यांनी सत्काराला उत्तर देताना सर्वांचेच आभार मानले. (प्रतिनिधी)